AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon : पावसाचा जोर कायम, हतनुरचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले, तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हतनुर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने आणि 20 दरवाजे हे 1 मीटरने उघडण्यात आल्याने तापी नदीपात्रात अचानक पाणी वाढले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात नदीकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Jalgaon : पावसाचा जोर कायम, हतनुरचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले, तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
हतनुर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 11, 2022 | 10:44 AM
Share

जळगाव : हंगामाच्या सुरवातीला (Monsoon) मान्सूनचा लहरीपणा अनुभवयास मिळाला असला तरी जुलैच्या 1 तारखेपासून सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. त्याचेच परिणाम आता राज्यात पाहवयास मिळत आहेत. उत्तर महाराष्ट्रात सुरवातीपासूनच वरुणराजाची कृपादृष्टी राहिलेली आहे. त्यामुळेच भुसावळ तालुक्यातील  (Hatnur Dam) हतनुर धरणाचे 4 दरवाजे हे आता पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. यापूर्वी कमी प्रमाणात (Discharge of water) पाण्याचा विसर्ग सुरु होता पण गेल्या 8 दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असल्याने 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्याल आले आहेत तर 20 दरवाजे एक मीटरने उघडले आहेत.

38 हजार 105 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

धरणातील अधिकच्या पाणीसाठ्याने नुकसान होऊ नये म्हणून एक विशिष्ट पातळी ओलांडल्यानंतर दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु केला जातो. सध्या हतनुर धरणामध्ये पाणीपातळी ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे 38 हजार 105 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सुरु करण्यात आला आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला असून आता तापी नदीकाठच्या 26 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

26 गावांना सतर्कतेचा इशारा

हतनुर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने आणि 20 दरवाजे हे 1 मीटरने उघडण्यात आल्याने तापी नदीपात्रात अचानक पाणी वाढले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात नदीकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पाणी साठ्यात वाढ होत असल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. शिवाय अजूनही विदर्भात पावसाचा जोर वाढला तर परस्थितीनुसार निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

काय आहे हतनुर धरणाची स्थिती?

हतनुर धरणातील पाणी पातळी क्षमता ही 209.68 मीटर एवढी आहे. तर सध्या 184.40 दलघमी पाणीसाठा धरणात आहे. एकूण क्षमतेच्या 47 टक्के पाणीसाठा असला तरी ज्या तुलनेत पाण्याची आवक आहे त्यामुळे विसर्ग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे 1079 क्युमेक्स व 38105 क्युसेसने विसर्ग करण्यात आला आहे. अशा स्थितीमध्ये 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने तर 20 दरवाजे हे 1 मीटरने उघडण्यात आले आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.