AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजार समिती बंद, तरीही 15 हजार क्विंटल शेतीमालाची आवक अन् अडीच कोटींचे व्यवहार

आहो खरंच गेल्या आठ दिवसांमध्ये 15 हजार क्विंटल शेतीमालाची आवक झाली आहे आणि त्याबदल्यात 2 कोटी 25 लाखांचे व्यवहारही झाले आहेत. पण ही सर्व उलाढाल आहे ती नव्याने सुरु केलेल्या शेतीमाल तारण योजनेतील.

बाजार समिती बंद, तरीही 15 हजार क्विंटल शेतीमालाची आवक अन् अडीच कोटींचे व्यवहार
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 02, 2021 | 3:21 PM
Share

लातूर : सध्या दिवाळीमुळे (Agricultural Income Market Committee) बाजार समित्या बंद असताना कसली आलीय शेतीमालाची आवक असे तुम्हाला वाटणे साहजिक आहे. पण लातूरात हे घंडलंय. आहो खरंच गेल्या आठ दिवसांमध्ये 15 हजार क्विंटल शेतीमालाची आवक झाली आहे आणि त्याबदल्यात 2 कोटी 25 लाखांचे व्यवहारही झाले आहेत. पण ही सर्व उलाढाल आहे ती नव्याने सुरु केलेल्या (Agricultural Mortgage Scheme) शेतीमाल तारण योजनेतील. आतापर्यंत या योजनेकडे (Farmer) शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते मात्र, यंदा खरीपातील शेतीमालाला चांगला दर नसल्याने शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिलेला आहे. या शेतीमाल तारण योजनेचा लाभ शेतकरी घेच आहेत.

वखार महामंडळाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या शेतीमाल तारण योजनेला यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण परस्थितीही तशी अनुकूल झाली आहे. खरीपातील पिकाच्या दरात कायम चढ-उतार राहिलेला आहे. त्यामुळे कमी किंमतीमध्ये माल विक्री करण्यापेक्षा साठवणूकीवर भर दिला जात आहे. गेल्या 10 दिवसांपासूनच वखार महामंडळाची ही गोदामे खुली करण्यात आली आहेत. त्याचा लाभही शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहेत. लातूर येथील कृषी बाजार समितीच्या परिसरातील या गोदामात गेल्या 8 दिवसांमध्ये तब्बल 15 हजार क्विंटल शेतीमालाची आवक झाली असून यामध्ये सोयाबीन अधिक आहे.

शेतकरी योग्य दराच्या प्रतिक्षेत

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन या मुख्य पिकाच्या दरात कमालीची घट झाली होती. उत्पादनावर अधिकचा खर्च आणि कवडीमोल दराने त्याची विक्री हे न परवडणारे असल्याने शेतकरी दिवाळीपूर्वीपासूनच साठवणूकीवर भर देत आहे. शिवाय सध्याचे दर हे काही कायमचे राहणार नाहीत असेही सांगितले जात असल्याने सोयाबीनला चांगला दर मिळाल्यावरच त्याची विक्री करायची ही भावना आता शेतकऱ्यांची झाली आहे.

दिवसाकाठी 100 शेतकऱ्यांच्या शेतीमालाची आवक

ज्याप्रमाणे दर अधिकचे असल्यावर बाजार समितीमध्ये धान्याची आवक वाढते अगदी त्याप्रमाणेच दर कमी झाल्याने साठवणूकीसाठी दिवसाला 100 शेतकरी हे शेतीमाल तारण्यासाठी घेऊन येत असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीमधीला बिरजदार यांनी tv9 मराठी शी बोलताना सांगितले आहे. शिवाय सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या देखील बंद आहेत. त्याचाही थोडाबहुत परिणाम माल साठवणुकीवर झाल्याचे चित्र आहे. मात्र, गेल्या 8 दिवसांमध्ये या शेतीमाल तारण योजनेअंतर्गत 2 कोटी 25 लाखांचे व्यवहार झाले आहेत. शेतकऱ्यांनाही याचा फायदा झालेला आहे.

शेतीमालावर मिळते कर्ज

1.शेतमाल प्रकार : सुर्यफूल, सोयाबीन, तुर, उडिद, भात , करडई, मुग, हळद, चना या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

2. शेतमाल प्रकार : मका,ज्वारी, गहू, बाजरी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

3. शेतमाल प्रकार : काजू बी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

4. शेतमाल प्रकार : बेदाणा या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे. (Response to agricultural mortgage scheme in Latur, turnover of crores)

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांना आता महावितरणचा ‘शॅाक’, कृषीपंपासाठी वेगळा नियम, ऐन रब्बीच्या तोंडावर निर्णय

अनियमितता टाळण्यासाठी पीएम किसान योजनेत अणखीन बदल, अन्यथा मिळणार नाहीत पैसे

सोयाबीनचा दर स्थिर पण विक्री करायची कुठे ? शेतकऱ्यांकडे आहेत हे पर्याय

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?