AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ढबू घ्या ढबू…. फुकट घ्या ढबू, ट्रॉलीभर ढबू 17 मिनिटात फस्त; सांगलीत नेमंक काय घडलं?

शेतकरी शेतमालाला किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव का मागतो हे दाखवून देणारी घटना सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कुंभारगाव मध्ये घडलीय.

ढबू घ्या ढबू.... फुकट घ्या ढबू,  ट्रॉलीभर ढबू 17 मिनिटात फस्त; सांगलीत नेमंक काय घडलं?
भीमराव साळुंखे
| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 10:49 AM
Share

सांगली: शेतकरी शेतमालाला किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव का मागतो हे दाखवून देणारी घटना सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कुंभारगाव मध्ये घडलीय. कडेगाव तालुक्यातील भीमराव साळुंखे या शेतकऱ्यानं शेतात कष्ट करुन पिकवलेल्या ढबू मिरचीला भाव नसल्यानं फुकट वाटली. भीमराव साळुंखे यांच्याकडील ट्रॉलीभर ढबू मिरची अवघ्या 17 मिनिटांमध्ये फस्त झाली. फुकट मिळणारी ढबू घेताना एकाही व्यक्तीला शेतकऱ्याला थोडीफार रक्कम द्यावी, असं वाटलं नाही.

घ्या घ्या ढबू घ्या फुकट घ्या

कुंडल पासून दोन किलोमीटरवरील कुंभारगावत भीमराव साळुंखे हे दरवर्षी 25 गुंठे ढोबळी मिरचीची लागवड करतात. मुंबई, पुणे येथील बाजार समितीमध्ये ढबू मिरची पॅक करुन पाठवतात. वाहतूक, पॅकिंग, मजुरी यासाठी 6 रुपये किलोला खर्च येतो तेथे त्यांना पंधरा रुपये किलो दर जरी मिळाला तरी 9 रुपये किलोला ढोबळ नफा राहत होता. यातूनही ते समाधानी असत, कारण खर्च वजा जाता तिन ते चार महिन्यात त्यांना लाखांचा तरी फायदा होतच होता. मात्र, यंदा वेगळंचं घडलं. ढबू मिरचीला दर नसल्यानं व्यापाऱ्यांनी बाजारात माल पाठवू नका असं सांगितलं. झाडं जगवण्यासाठी तोडा घेणं आवश्यक असल्यानं भीमराव साळुंखे यांनी ढबू तोडून फुकट वाटण्याचा निर्णय घेतला.

ढबू फुकट वाटण्याचा निर्णय का घेतला?

भीमराव साळुंखे यांच्या पुढं काय करायचं हा प्रश्न पडला होता. अखेर ढबू तोडून झाडे जगवण्याच निर्णय घेतला. बाजारपेठेत गेल्यास वाहतुकीचा खर्चही निघणार नसल्यानं साळुंखे यांनी पंचक्रोशीत ढबू मिरची फुकट वाटण्याचा निर्णय घेतला. भीमराव साळुंखे यांनी अंबक, चिंचणी, देवराष्ट्रे, मोहिते वडगाव, कुंडल येथे ढोबळी मिरची ट्रॉलीतून फुकट वाटली.

शेतकऱ्यांचं आर्थिक गणित विस्कटलं

कोरोना विषाणू संसर्ग, लॉकडाऊन, महापूर या सगळ्या संकटाचा सामना करत शेतकरी आर्थिक अडचणीतून वाट काढतोय. घाट माथ्यावर पिकं चांगली आहेत पण बाजारात मात्र त्याला दर नसल्याने शेतकऱ्यांचे गणित विस्कटलेले आहे.

इतर बातम्या:

खवय्यांना आता जिवंत मासे, मस्त्य उत्पादकांचीही भरभराट, लाईव्ह फिश कॅरियर सिस्टीम नेमकी काय?

बीडवर दुष्काळाचं सावट, सोयाबीन करपू लागलं; पीक विमा कधी मिळणार? कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची मागणी

Sangli farmer Bhimrao Salunkhe distribute capsicum free of cost in kadegaon

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.