AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडवर दुष्काळाचं सावट, सोयाबीन करपू लागलं; पीक विमा कधी मिळणार? कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची मागणी

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील शेतकरी सध्या भीषण दुष्काळसदृश्य परिस्थितीला सामोरे जात आहेत. सोयाबीनच्या शेतात उभा असलेला बंडू मारुती दिंडे हा शेतकरी पावसाअभावी वाळून गेलेलं पीक दाखवत आहे.

बीडवर दुष्काळाचं सावट, सोयाबीन करपू लागलं; पीक विमा कधी मिळणार? कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची मागणी
बंडू मारुती दिंडे
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 22, 2021 | 4:56 PM
Share

बीड: मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील शेतकरी सध्या भीषण दुष्काळसदृश्य परिस्थितीला सामोरे जात आहेत. सोयाबीनच्या शेतात उभा असलेला बंडू मारुती दिंडे हा शेतकरी पावसाअभावी वाळून गेलेलं पीक दाखवत आहे. ते सरकारला कर्ज माफ करण्याची विनंती करत आहेत. पीक नसताना शेतकरी कर्जाची परतफेड कशी करणार? अलीकडेच, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराचे तांडव आपण पाहिले. यामुळे हजारो हेक्टर पिके नष्ट झाली आहेत. दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या कचाट्यात आहेत. मात्र, आजपर्यंत त्यांना सरकारकडून कोणतीही मदतीचे आश्वासन देण्यात आलेलं नाही.

जालना, औरंगाबदमध्येही पावसाच्या प्रतीक्षेत

केवळ बीडच नाही तर जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातही खूप कमी पाऊस झाला आहे. यामुळे पिके सुकत चालली आहेत. पावसाअभावी शेतकरी कर्जाच्या दलदलीत अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते हताश आणि निराश आहेत. या तीन जिल्ह्यातील शेतकरी तालुक्यांमध्ये पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान बीड जिल्ह्यात सामान्यपेक्षा 19% कमी पाऊस झाला आहे.

बंडू मारुती दिंडे म्हणतात, “गेल्या एक महिन्यापासून पाऊस पडलेला नाही. सोयाबीनच्या लागवडीसाठी रान तयार करण्यापासून बियाणे खरेदीपर्यंत बराच खर्च करावा लागतो. आतापर्यंत आम्ही आमच्या शेतात 70 हजार रुपये खर्च केले आहेत. पीक पाहता,सर्व खर्च वाया जाईल, असं दिसते. गेल्या महिन्यात पहिला पाऊस आला, तेव्हाच आम्ही सोयाबीनची पेरणी केली होती, पण तेव्हापासून आतापर्यंत एक महिना झाला आहे, पावसाचे चिन्ह नाही. पावसाअभावी जनावरांनाही चारा मिळत नाही. त्यांच्या चारासाठीही त्यांना भटकावे लागते. शेतकऱ्यांच्या या समस्येकडे कोण लक्ष देणार? आतापर्यंत सरकारचा एकही प्रतिनिधी आमच्या ठिकाणी आमच्या समस्या बघायला आला नाही, अशी खंत बंडू दिंडे व्यक्त करतात.

शेतकऱ्यांची मदतीसाठी साद

शेतकरी दिंडे राज्य सरकारने आमचे कर्ज माफ करावे, अशी भावना व्यक्त करतात. पीक विम्याचे पैसेही दिले गेले पाहिजेत, अशी मागणी ते करतात. गेल्या वर्षी आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. या वर्षी देखील आम्हाला विम्याचे पैसे मिळतात की नाही हे माहित नाही, असं दिंडे म्हणतात. सरकारनं आमचे संपूर्ण कर्ज माफ करावं अशी आमची सरकारकडे मागणी आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा धोका निर्माण होईल. त्यामुळे सर्वप्रथम शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढले पाहिजे, असं ते म्हणतात.

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात दरवर्षी पाण्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. पावसाअभावी शेतकरी शेती करू शकत नाहीत. येथील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जात आहेत.

दुष्काळ सदृश्य स्थितीमागील कारण

विदर्भ आणि मराठवाडा प्रदेश कमकुवत मान्सूनमुळे सर्वाधिक प्रभावित आहेत. या भागातील शेतकऱ्यांची शेती पावसावर अवलंबून आहे. मराठवाड्याच्या भौगोलिक स्थितीनुसार या भागात चांगला पाऊस पडत नाही. अरबी समुद्रातून वाढणारा मान्सून मध्य महाराष्ट्रापर्यंत चांगला पाऊस देतो, तर तो मराठवाड्यात पोहचेपर्यंत कमकुवत होतो. ज्यामुळे बीड, लातूर, नांदेड आणि औरंगाबाद हे जिल्हे कोरडे राहतात. पावसाअभावी आणि सिंचनाची कमी साधने या भागांमध्ये शेतकरी अडचणीत आहेत.

इतर बातम्या:

Akola DCC Bank Recruitment 2021: अकोला जिल्हा बँकेत क्लार्क पदांवर भरती, पदवीधरांना सुवर्णसंधी

Maharashtra Beed area in the grip of drought soybean crop affected farmers appeal for agri loan waiver

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या