AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Soybean Crop : उगवण झालेल्या सोयाबीनवर गोगलगायीचा ताव, धनंजय मुंडेंनी मांडले सरकारसमोर शेतकऱ्यांचे गऱ्हाणे

खरीप हंगामातील पेरण्या आता अंतिम टप्प्यात आहेत. असे असताना पेरणी झालेल्या क्षेत्रावर पिकांची उगवणही झाली आहे. पण पीक कोवळे असतानाच गोगलगायी त्यावर ताव मारत आहेत. त्यामुळे उगवताच पिके नष्ट होत असून याचा बंदोबस्त तरी करावा कसा असा प्रश्न आहे. गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली सोयाबीन पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत.

Soybean Crop : उगवण झालेल्या सोयाबीनवर गोगलगायीचा ताव, धनंजय मुंडेंनी मांडले सरकारसमोर शेतकऱ्यांचे गऱ्हाणे
सोयाबीन उगवता त्यावर गोगलगायीचा प्रादुर्भाव होत आहे.
| Edited By: | Updated on: Jul 11, 2022 | 12:05 PM
Share

बीड : उशिरा का होईना पण दमदार (Rain) पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात (Kharif Sowing) खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन भर दिला असून गेल्या 10 दिवसातील पोषक वातावरणामुळे पिकांची उगवणही झाली आहे. मात्र, पिकांवर नवीनच संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली (Soybean Crop) सोयाबीन पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत, तर सोयाबीन सह इतरही पिकांना गोगलगाईच्या नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांपुढे समस्या कायम असून आता राज्य सरकारने पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत जाहीर करावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

नेमके पिकांचे नुकसान काय ?

खरीप हंगामातील पेरण्या आता अंतिम टप्प्यात आहेत. असे असताना पेरणी झालेल्या क्षेत्रावर पिकांची उगवणही झाली आहे. पण पीक कोवळे असतानाच गोगलगायी त्यावर ताव मारत आहेत. त्यामुळे उगवताच पिके नष्ट होत असून याचा बंदोबस्त तरी करावा कसा असा प्रश्न आहे. गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली सोयाबीन पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत. त्यामुळे वाढ आणि उत्पादन ह्या गोष्टी तर दूरच राहत असून उगवलेले जोपासावे कसे हाच मोठा प्रश्न आहे.

हेक्टरी 50 हजार रुपयांची मागणी

कृषी विभागाने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन-कार्यशाळा आदी उपाययोजना केल्या परंतु त्याला खूप उशीर झाला होता. यंदा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खरिपाचा पेरा केला होता. असे असताना हे नवे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करुन त्वरीत हेक्टरी 50 हजाराची मदत करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारची बाजू सांगणारे मुंडे आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरीत आहेत. शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन त्यांनी ही मागणी केली आहे.

शेतकऱ्यांकडे काय आहे उपाय

पिकांची उगवण होताच किडीचा प्रादुर्भाव झाला तर मात्र वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांध हे तणविरहीत ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे गोगलगाईला थांबण्यासाठी सुरक्षित जागा राहणार नाही. सकाळी किंवा संध्याकाळी ह्या गोगलगायी ह्या साबणाचे किंवा मिठाचे पाणी घेऊन त्यामध्ये मारुन टाकाव्यात. पिकाच्या क्षेत्रात 7 ते 8 मीटरवर वाळलेल्या गवताचे बुचाडे उभा करावेत. जेणेकरुन गोगलगायी त्याच्या आश्रयाला येतील आणि मग त्या अंडी घालण्यास एकत्र आल्यावर त्या नष्ट कराव्या लागणार आहेत.

Follow Us
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?.
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा.
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?.