AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : आता उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी, पाऊस अन् वातावरणातही निर्माण होणार गारवा

गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे. पण आता (4 डिंसेबर) उद्यापासून बर्फवृष्टी आणि पावसाचाही सामना करावा लागणार आहे. पण ही समस्या उत्तर भारतामध्ये उद्भवणार असल्याचा अंदाज स्कायमेट या हवामान एजन्सीने वर्तवलेला आहे.

Weather Update : आता उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी, पाऊस अन् वातावरणातही निर्माण होणार गारवा
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 3:33 PM
Share

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे. पण आता (4 डिंसेबर) उद्यापासून बर्फवृष्टी आणि पावसाचाही सामना करावा लागणार आहे. पण ही समस्या उत्तर भारतामध्ये उद्भवणार असल्याचा अंदाज (skymet weather ) स्कायमेट या हवामान एजन्सीने वर्तवलेला आहे. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी जर उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या प्रवाशांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख या भागातील पर्वतरांगामध्ये हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे तर 5 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेश ते तसेच पुढे उत्तराखंड आणि संपूर्ण डोंगराळ भागात ही अशीच परस्थिती राहणार असल्याचे स्कायमेटच्या वतीने सांगण्यात आले आहे.

उत्तर भारतामध्ये प्रवास करताय मग जपूनच

या आठवड्याचा शेवट तुम्ही जर उत्तर भारतामध्ये करणार असताल तर तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कारण पाऊस तर बरसणार आहेच पण येथील पर्वतरांगावरुन बर्फवृष्टी देखील होणार आहे. त्यामुळे उत्तर भारतामध्ये पाऊस आणि तापमानात देखील अमूलाग्र बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा सर्व बदल पश्चिमात्य भागात झालेल्या अभूतपुर्व परस्थितीमुळे होत असल्याचेही या स्कायमेटने स्पष्ट केले आहे. त्यामुळे 4 डिसेंबरपासून वातावरणात बदल तर होईलच पण पुढे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात बर्फवृष्टी होणार आहे. ही बर्फवृष्टी उच्च किंवा मध्यम भागातील पर्वतरांगावर होणार आहे. एवढेच नाही तर दरम्यानच्या काळात पाऊसही बरसणार असल्याचा वर्तवण्यात आला आहे.

अणखीन तीन दिवस धोक्याचेच

उत्तर भारतामध्ये उद्यापासून वातावरणात बदल होऊन बर्फवृष्टी होणार आहे. सलग तीन दिवस असेच वातावरण हे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश तसेच उत्तराखंडात राहणार आहे. 6 डिसेंबरनंतर ही परस्थिती पुर्वपदावर येणार असून 7 डिसेंबरला या भागात हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे या वातावरणातील बदलाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही पण जे प्रवाशी उत्तर भारतामध्ये जाणार आहेत त्यांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. वातावरणात सातत्याने बदल होत असून याचा सामना आता नागरिकांना करावा लागत आहे.

राजधानी दिल्लीमध्येही पावसाची शक्यता

दरम्यानच्या काळात 5 डिसेंबर रोजी पंजाब, हरियाणा राज्यातील काही भागात पाऊस पडणार आहे तर दिल्लीमध्येही काही भागात याच दिवशी पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर भारतामधील पर्वतरांगामध्ये थंडीची लाट निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या :

गारठा बेतला हजारो मेंढ्यांच्या जीवावर, उघड्यावर संसार असलेल्या मेंढपाळाच्या अडचणीत भर

अवकाळीमुळे आंबा बागांचे गणितच बिघडले, हंगाम लांबणीवर अन् उत्पादनातही घट

नवा पर्यायही ‘फेल’ : सुर्यदर्शनच नाही तर सौरऊर्जा कृषीपंपाचा तरी काय उपयोग ? बांधावरचे वास्तव

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.