शेतातले सोयाबीन थेट बाजारात, लातूरात आवक दुपटीने वाढली

गुरवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक झाली होती. आवक वाढूनही दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 8 हजार क्विंटल सोयबीनची आवक झाली तर सरासरी दर हा 5800 रुपये मिळाला आहे. तर

शेतातले सोयाबीन थेट बाजारात, लातूरात आवक दुपटीने वाढली
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 3:25 PM

लातूर : पावसाने मराठवाड्यात उघडीप दिली आहे. त्याचा फायदा शेतकरी घेत असून सध्या चिखलाने माखलेल्या सोयाबीनची काढणी कामे जोमात सुरु आहेत. पुन्हा परतीच्या पावसामध्ये पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी (soybean) सोयाबीनची काढणी, मळणी करुन थेट विक्रीसाठी बाजारात दाखल करीत आहे. गुरवारी (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक झाली होती. आवक वाढूनही दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 8 हजार क्विंटल सोयबीनची आवक झाली तर सरासरी दर हा 5800 रुपये मिळाला आहे. तर

दुसरीकडे उडदाची आवक कमी झाली असून दर हा स्थिर आहे. खरीपातूल रखडलेल्या काढणी कामाला आता वेग येत आहे. पावसामुळे सोयाबीनची काढणी ही खोळंबली होती. शिवाय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते. गेल्या चार दिवसांपासून पावसाने ऊसंत घेतली असल्याने उर्वरीत सोयाबीनची काढणी, मळणी करुन थेट बाजार दाखवला जात आहे. कारण आठ दिवसांपासून सोयाबीन हे पाण्यात होते. त्यामुळे उत्पादनावर परिणाम हा झालेला आहे. शिवाय ढगाळ वातावरण असल्याने साठवून ठेवणेही धोक्याचे आहे.

त्यामुळे मिळेल तो स्वीकारत सोयाबीन बाजारात आणले जात आहे. येथीव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उस्मानाबाद, बीड, आंबाजोगाई येथून सोयाबनची आवक आहे. तर परराज्यातील आवक ही कमी झाली आहे. दिवसाकाठी 3 ते 4 हजार क्विंटल होणारी आवक गुरुवारी 8 हजारावर गेलेली होती. त्यामुळे दर कमी होण्याचा धोका होता. मात्र, गुरुवारीही सोयाबनला 5800 चा दर मिळालेला आहे.

अचानक वाढली सोयाबीनची आवक

गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने काढणी झालेल्या सोयाबीनची मळणी कामे ही रखडलेली होती. शिवाय बुधवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद होती. त्यामुळे आजच्या बाजारात सोयाबीनची आवक ही दुपटीने वाढलेली होती. तर हंगामाच्या सुरवातीपासून उडदाची आवक ही 5 हजार क्विंटलच्या घरात होती. ती आवक आता कमी झाली असून केवळ 3 हजार क्विंटल उडीद बाजारात दाखल झालेला होता. खरीपातील या दोन मुख्य पिकावरच शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या नजरा आहेत. मात्र, दोन्हीही पीकाचे दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.

डागाळलेले सोयाबीन बाजारात

पावसामुळे सोयाबीनचे पीक हे पाण्यातच होते. अशाच अवस्थेत काढणी आणि मळणीची कामे झालेली आहेत. त्यामुळे त्याची साठवणूक आणि कोणतीही प्रक्रिया न करता बाजारात आणले जात आहे. मात्र, सध्या आवक सुरु असलेले सोयाबीन हे डागाळलेले आहे. मालाच्या दर्जानुसारच दरही आकारले जात आहे. किमान झालेला खर्च तरी पदरी पडेल या आशेने शेतकरी बाजार जवळ करीत आहे.

हमीभाव नसल्याने उडीद विक्रीत शेतकऱ्याचे नुकसान

राज्यात अद्यापही हमीभाव केंद्र ही सुरु झालेली नाहीत. त्यामुळे व्यापारी ठरवतेल त्याच दरात उडदाची विक्री करावी लागत आहे. केंद्र सरकारने उडदाला 6300 एवढा हमीभाव दिलेला आहे. मात्र, सध्या बाजारपेठेत उडदाला 5800 एवढा सरासरी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. गुरवारी लाल तूर- 6450 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6400 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6400 रुपये क्विंटल, जानकी चना 5100 रुपये क्विंटल, विजय चणा 5100, चना मिल 4950, सोयाबीन 6300, चमकी मूग 7000 , मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7200 एवढा राहिला होता. (Soyabean arrivals increasein Latur’s market committee, rates stable)

संबंधित बातम्या :

दुष्काळात तेरावा : हमीभाव केंद्रच सुरु नसल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

शेतकऱ्यांनो कागदपत्रांची पुर्तता करा अन् ‘पी.एम. किसान सन्मान’ योजनेचा निधी मिळवा, अन्यथा…

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारची 122 कोटींची मदत

Non Stop LIVE Update
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.