AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळात तेरावा..! पावसाच्या पाण्यात शेतकऱ्यांचे सोयाबीन, नुकसानभरपाई मिळणार तरी कशी?

पावसामुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान तर झालेच पण आता सोयाबीनची मळणी करुन विक्रीसाठी आणलेले शेकडो क्विंटल सोयाबीन पावसाने भिजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, बाजार समितीमध्ये वेळेत वजन झाले नाही.

दुष्काळात तेरावा..! पावसाच्या पाण्यात शेतकऱ्यांचे सोयाबीन, नुकसानभरपाई मिळणार तरी कशी?
वाशिम बाजार समिती
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 2:12 PM
Share

वाशिम : सोयाबीनची पेरणी झाल्यापासून हे पीक बाजारात आणल्यानंतरही यावर धोक्याची घंटा कायम राहिलेली आहे. पावसामुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान तर झालेच पण आता सोयाबीनची मळणी करुन विक्रीसाठी आणलेले शेकडो क्विंटल सोयाबीन पावसाने भिजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, (Washim, Market Committee) बाजार समितीमध्ये वेळेत वजन झाले नाही. त्यामुळेच सोयाबीनची राख रांगोळी झाली असून या अवस्थेतील सोयाबीनची खरेदी करुन शेतकऱ्यांना मात्र, मोबदला देण्याची मागणी होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. असे असतानाच वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सुरु होती. मात्र, शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात आणले असता वेळेत वजन आणि विक्री झाली नाही. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात ठेवलेले सोयाबीन हे पावसाने भिजले आहे. त्यामुळे आहे त्या परस्थितीमध्ये सोयाबीनची खरेदी करुन शेतकऱ्यांना मोबदला देण्याची मागणी होत आहे.

पावसाच्या पाण्यात सोयाबीनची वहीवाट

ढगाळ वातावरण असतानाही येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही सुरुच आहे. दिवाळीनंतर आता कुठे सोयाबीनची आवक वाढत आहे. मात्र, बाजार समितीमध्ये दाखल झालेल्या सोयाबनचे योग्य व्यवस्थापन केले जात नाही. शेतीमाल हा निवाऱ्याला न ठेवता उघड्यावरच असतो. त्यामुळे पावसाने शेकडो क्विंटल सोयाबीन भिजले आहे. आतापर्यंत एक ना अनेक समस्यांना तोंड देत शेतकऱ्यांनी हे सोयबीन बाजार पेठेपर्यंत पोहचते केले आहे मात्र, बाजारपेठेत शेतीमाल दाखल झाला असतानाही शेतकऱ्यांचा जीव मात्र, टांगणीलाच आहे. विक्रीसाठी आणलेले सोयाबीनची पावसाच्या पाण्याने वहीवाट झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सोयाबीन आहे त्या परस्थितीमध्ये खरेदी करावे व बाजार समितीने त्याची नुकसानभरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत.

दर वाढल्याने वाढली होती आवक

हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनचे दर हे घटलेले होते. दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. सोयाबीनचे दर हे 6 हजार क्विंटलवर गेले आहेत. त्यामुळे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येत आहे. यंदाच्या हंगामातील हा विक्रमी दर आहे. त्यामुळे उत्पादनावरील खर्च पदरी पडेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र, वाशिमच्या बाजार समितीमध्ये अनोख्याच संकटाला सामोरे जावे लागले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनची खरेदी तर करावीच शिवाय बाजार सिमतीच्या प्रशासनाने त्याची नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी तर केली आहे. मात्र, बाजार समितीचे प्रशासक काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

ढगाळ वातावरण कायम

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तर आहेच परंतू दोन दिवसांपासून पावसानेही हजेरी लावली आहे. मात्र, वाढता दर पाहता सोयाबीनची आवक ही सुरुच आहे. पण असेच वातावरण असेल तर शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी कमी प्रमाणात आणावा असे अवाहन करण्यात आले आहे. परंतू, झालेल्या नुकसानभरपाईबाबत अद्यापही बाजार समितीच्या प्रशासनाने कोणतेही आश्वासन दिलेले नाही.

संबंधित बातम्या :

फळबागांमध्ये साचलेले पाणी धोकादायकच, आंबा बागेची घ्या अशी काळजी

शेतकरीच करणार आता कृषीचा विस्तार, राज्य समितीवर शेतकऱ्यांचीच निवड

महासाथीनंतरच्या काळात किसानक्राफ्ट अ‍ॅप ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.