AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीनच्या दरही वाढले अन् आवकही, 7 हजाराकडे वाटचाल

गेल्या तीन दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर होते. तर दुसरीकडे आवक कमी असतानाही ही परस्थिती असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. पण शुक्रवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितामध्ये आवकही वाढली आणि 100 रुपयांनी दरातही वाढ झाली आहे.

सोयाबीनच्या दरही वाढले अन् आवकही, 7 हजाराकडे वाटचाल
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 1:53 PM
Share

लातूर : गेल्या तीन दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर होते. तर दुसरीकडे आवक कमी असतानाही ही परस्थिती असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. पण शुक्रवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितामध्ये आवकही वाढली आणि 100 रुपयांनी दरातही वाढ झाली आहे. आता सोयाबीन साठ्यावर सरकारची मर्यादा राहणार नाही. यामुळे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योजक हे सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात करीत आहेत. तीन दिवसांपासून या बाजार समितीमध्ये 6 हजार 450 वरच दर ठप्प होते.

सोयाबीन दराबाबत सर्वकाही पोषक वातावरण आहे. आवक कमी-जास्तीचाही परिणाम आता किंमतीवर होत नाही. मागणीपेक्षा पुरवठा हा कमी असल्याने दरात दिवसाकाठी 100 ते 150 रुपायांची वाढ होत आहे. दिवाळीनंतर सुरु झालेला बदल आतापर्यंत तर कायम आहे. भविष्यातही सोयाबीनचा दर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

प्रक्रिया उद्योजक सक्रिय

लातूरमध्ये सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. दाळमीलचे जाळे आहे. आता पर्यंत सोयाबीनच्या साठवणुकीवर मर्यादा ठरवून देण्यात आली होती. त्यामुळे व्यापारी आणि उद्योजक हे कारवाईच्या भितीने साठवणुक करुन ठेवत नव्हते. पण आता हे निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे सोयाबीनला मागणी वाढली आहे. शिवाय आता सोयापेंडच्या आयातीचा निर्णयही रखडला असल्याने सोयाबीन शिवाय पर्यायच उरलेला नाही. सोयाबीनची मागणी वाढली असली तरी पाहिजे त्या प्रमाणात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढलेली नाही.

अजूनही दर वाढीचे संकेत

सोयाबीनची मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी अवस्था झाली आहे. तर दुसरीकडे शेतकरी हे गरजेनुसारच विक्री करीत आहेत. दरवर्षी या दिवसांमध्ये लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 50 ते 60 हजार पोत्यांची आवक होत असते. यंदा मात्र, हंगाम सुरु झाल्यापासून एकदाही अशाप्रकारे आवक ही झालेली नाही. शेतकऱ्यांना अजूनही दर वाढीची अपेक्षा आहे आणि वाढती मागणी पाहता सोयाबीनचे दर वाढणार असल्याचे व्यापारीही सांगत आहेत. शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे पण ते गरजेप्रमाणेच विक्री करीत आहेत. हेच दरवाढीचे सर्वात महत्वाचे कारणही असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शुक्रवारी लाल तूर- 6260 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5950 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6261 रुपये क्विंटल, जानकी चना 4916 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4800, सोयाबीन 7100, चमकी मूग 7300, मिल मूग 6350 तर उडीदाचा दर 7370 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

…अखेर कृषी आयुक्तांचे भाकित खरे ठरले, काय होते केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात?

खरीप अंतिम टप्प्यात तरीही शेतकऱ्यांना विमा रकमेचीच प्रतिक्षा, वाढीव विमा रकमेसाठी राष्ट्रवादीचा रास्तारोको

E-Shram Yojna : आता शेतमजुरांनाही मिळणार अपघात विम्याचे कवच ; असे मिळवा ई-श्रम कार्ड…!

Follow Us
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.