AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Letter War : सोयापेंड आयातीवरुन पुन्हा राजकारण तापले, नेत्यांचाही आयातीला विरोध

सोयाबीनच्या दरात वाढ होत असताना पुन्हा सोयापेंड आयातीचा मुद्दा चर्चेत आला आहे. आता यामध्ये केंद्रीय पशूसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनीच सोयापेंड आयातीबाबत थेट विदेश व्यापार महासंचालक यांनाच पत्र लिहून सोयापेंड आयातीसाठी मुदतवाढीची मागणी केली आहे. त्यामुळे सोयापेंडची आयात होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

Letter War : सोयापेंड आयातीवरुन पुन्हा राजकारण तापले, नेत्यांचाही आयातीला विरोध
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 02, 2021 | 2:49 PM
Share

मुंबई : सोयाबीनच्या दरात वाढ होत असताना पुन्हा सोयापेंड आयातीचा मुद्दा चर्चेत आला आहे. आता यामध्ये केंद्रीय पशूसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनीच सोयापेंड आयातीबाबत थेट विदेश व्यापार महासंचालक यांनाच पत्र लिहून सोयापेंड आयातीसाठी मुदतवाढीची मागणी केली आहे. त्यामुळे सोयापेंडची आयात होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्याचा परिणाम थेट सोयाबीनच्या दरावर होऊ लागला आहे. त्याच्या भूमिकेला आता खासदार डॅा. अमोल कोल्हे आणि खासदार प्रतापराव जाधव यांनी विरोध केला असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना पत्र दिले आहे.

सोयापेंड आणि सोयाबीन काय आहे समीकरण ?

सोयापेंडच्या आयातीवरच सोयाबीनचे दर आहेत. मध्यंतरी ऑगस्टच्या दरम्यान, केंद्र सरकारने 12 लाख सोयापेंडच्या आयातीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सोयाबीनचे दर हे हंगामाच्या सुरवातीला घसरले होते. तर काळ्याच्या ओघात सोयापेंड कमी होताच सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे चित्र सबंध देशात निर्माण झाले होते. आता सोयाबीनचे दर वाढताच पुन्हा सोयापेंड आयातीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावेळी मात्र, केंद्रीय पशूसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनीच सोयापेंड आयातीचे महत्व पटवून सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात सोयापेंडची आयात झाली तर सोयाबीनच्या दरावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्र्याच्या या भूमिकेला आता राज्यातील खासदार यांच्याकडूनही विरोध होऊ लागला आहे.

सोयापेंडच्या आयातीबाबत राज्यसरकारची भूमिका

सोयाबीनचे दर स्थिर ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर सोयाबीनचा उठाव होणे गरजेचे आहे. यातच सोयापेंडची आयात झाली तर मात्र, त्याचा परिणाम हा सोयाबीनच्या दरावर होणार आहे. त्यामुळेच मध्यंतरी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलन उभारले होते. दरम्यान, राज्य सरकार हे सोयापेंडच्या आयातीला परवानगी देणार नसल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. आता केंद्रीय पशूसंवर्धन मंत्र्यांनीच सोयापेंडच्या आयातीसंदर्भात विदेश व्यापार महासंचालक यांनाच पत्र लिहल्याने राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्याला विरोध दर्शवत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री तोमर यांना सोयापेंडची आयात करु नये अशी मागणी केली आहे.

सोयाबीनचे वाढलेले दर स्थिरावले

दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात कमालीची वाढ झाली होती. 4 हजार 500 वरील सोयाबीन थेट 6 हजार 600 वर येऊन ठेपले होते. पण सोयापेंडच्या आयातीचा मुद्दा समोर येताच दरात घसरण पाहायला मिळाली आहे. कारण 31 मार्च 2022 पर्यंत सोयापेंड आयातीची मुदत वाढवावी आणि उर्वरीत 5 लाख 50 हजार टन सोयापेंडची आयात करण्याची मागणी पोल्ट्री फार्म धारकांनी केली होती. त्यामुळेच सध्या 6 हजारावर सोयाबीनचे दर स्थिरावले आहेत.

संबंधित बातम्या :

ह्रदय पिळवटून टाकणारं चित्रं, महाराष्ट्रातला गारठा मुक्या प्राण्यांच्या जीवावर, कोकरांच्याही शेवटच्या घटका

पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीमुळे रब्बी पिकांसह फळबागाही उध्वस्त, नुकसानभरपाईच्या मागणीचा जोर

सहा महिने साठवूनही उन्हाळी कांद्याच्या दरात घसरणच, काय आहेत कारणे?

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.