AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळात तेरावा : सोयाबीनचे दर घसरताच पुन्हा सोयापेंड आयातीचा मुद्दा चर्चेत

दोन दिवसांपासून 400 रुपयांनी सोयाबीनचे दर हे घसरलेले आहेत. यातच पुन्हा (Soypend imports) सोयापेंडच्या आयातीचा मुद्दा समोर आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण सोयापेंड आयातीची मुदत ही वाढवून मार्च 2022 करावी अशी मागणीच (Union Animal Husbandry Minister) केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री यांनी विदेशी महासंचालकांकडे केली आहे.

दुष्काळात तेरावा : सोयाबीनचे दर घसरताच पुन्हा सोयापेंड आयातीचा मुद्दा चर्चेत
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 11:24 AM
Share

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घट होत आहे. दिवाळीनंतर तब्बल दीड हजार रुपयांनी सोयाबीनच्या दरात वाढ झाली होती. शिवाय ही वाढ अशीच कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, दोन दिवसांपासून 400 रुपयांनी सोयाबीनचे दर हे घसरलेले आहेत. यातच पुन्हा (Soypend imports) सोयापेंडच्या आयातीचा मुद्दा समोर आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण सोयापेंड आयातीची मुदत ही वाढवून मार्च 2022 करावी अशी मागणीच (Union Animal Husbandry Minister) केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री यांनी विदेशी महासंचालकांकडे केली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात अणखीन घट होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कधी नव्हे ते यंदाच्या हंगामात सोयाबीन उत्पादकांना ‘अच्छे दिन’ येण्यास सुरवात झाली होती. खरीपाच्या सुरवातीपासून सुरु असलेली संकटाची मालिका आता तरी संपेन असे चित्र निर्माण झाले होते. कारण सोयाबीनच्या दरात दिवसाकाठी 100 ते 150 रुपयांची वाढ होत होती. मात्र, दोन दिवसांपासून सोयापेंडची मागणी, कोमोडीटीवर घसरलेले दर आणि ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातीस होणाऱ्या अडचणीमुळे हे दर घसरले आहेत.

उर्वरीत सोयापेंडचीही होणार आयात

ऑगस्ट महिन्यात खाद्यतेलाच्या दरावर नियंत्रण रहावे म्हणून सोयापेंडची आयात करण्यात आली होती. तब्बल 12 लाख टन सोयापेंड हे आयात केले जाणार होते. मात्र, पहिल्या टप्प्यात 6 लाख 50 हजार टनच सोयापेंड आयात झाले होते. असे असताना त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला होता. व्यापारी, प्रक्रिया उद्याोजक यांना सोयापेंडचा पर्याय उपलब्ध झाल्याने सोयाबीन हे थेट 4 हजार 500 वर येऊन ठेपले होते. पण घटती आवक सोयापेंडचा साठा अंतिम टप्प्यात असताना सोयाबीनचे दर हे वाढत गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी सोयाबीनला 6 हजार 800 चा दर होता. मात्र, दर घटत असतानाच पुन्हा उर्वरीत 5 लाख 50 हजार टन सोयापेंड आयातीच्या चर्चेचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होत आहे.

अखेर पोल्ट्री ब्रीडर्सच्या मागण्यांकडेच पशूसंवर्धन मंत्र्याचे लक्ष

मध्यंतरी पोल्ट्री ब्रीडर्सचे अध्यक्ष बहादूर अली यांनी सोयाबीनचे दर वाढताच सोयापेंडची आयात करुन हे दर नियंत्रणात ठेवण्याबाबत पशूसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे पत्र लिहून केली होती. मात्र, त्यानंतर शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी याचा तीव्र विरोध केला होता. त्यामुळे सोयापेंडच्या आयातीला परवानगीच दिली जाणार नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण आता पुन्हा पशूसंवर्धन मंत्री यांनी थेट विदेश व्यापार महासंचालक यांनाच पत्र लिहून सोयापेंड आयातीसाठी मुदतवाढीची मागणी केली आहे. त्यामुळे सोयापेंडची आयात होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम थेट सोयाबीनच्या दरावर होऊ लागला आहे. आता सोयाबीनच्या दराला उतरती कळा लागली का असा देखील सवाल उपस्थित होत आहे.

केंद्रीय स्तरावरील हलचालीचा परिणाम थेट बाजारपेठेतील दरावर

सोयाबीन हे जागतिक स्तरावरील मुख्य पीक आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीचा थेट परिणाम येथील बाजार समितीवर देखील होतो. आता गेल्या दोन दिवसांमध्ये दरात जी घट होत आहे ती शेतकऱ्यांच्या लक्षात न येण्यासारखी आहे. कारण कोमोडीटीवर घसरलेले दर आणि ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातीस होणाऱ्या अडचणीमुळे दर घटले असल्याचे व्यापारी सांगत आहेत. यातच आता केंद्रीय पशूसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सोयापेंडच्या आयातीच्या अनुशंगाने लिहलेल्या पत्राचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झालेला आहे. सोयाबीनचे दर हे आता 6 हजारावर येऊन ठेपले आहेत.

संबंधित बातम्या :

ऊसाच्या पाचटाचे राजकारण : बिलात 5 टक्के कपात होत असल्याने शेतकरी मागणार न्यायालयात दाद

गंधकाच्या वापरामुळे पिके बहरात अन् उत्पादनातही वाढ, पहा काय आहेत फायदे ?

शेतीमालाच्या निर्यातीची प्रक्रिया नेमके असते तरी कशी? प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.