AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्ह्याबाहेरील ऊसाला बीडच्या शेतकऱ्यांचा विरोध, काय आहेत कारणं?

गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून एफआरपी रकमेसाठी आंदोलने सुरु होत आहेत, बीडच्या शेतकऱ्यांनी मात्र, वेगळीच भूमिका घेतलेली आहे. जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र हे वाढलले आहे. त्यामुळे प्रथम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला प्राधान्य देण्यात यावे व नंतर इतर जिल्ह्यातील ऊसउत्पादकांचा विचार करण्यात यावा अशी मागणी शेतकरी आणि शेतकरी नेते यांनी केली आहे.

जिल्ह्याबाहेरील ऊसाला बीडच्या शेतकऱ्यांचा विरोध, काय आहेत कारणं?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 11:44 AM
Share

बीड : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम पुढील महिन्यात सुरु होत आहे. त्याअनुशंगाने मंत्रीमंडळाची बैठकही पार पडलेली आहे. गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून एफआरपी रकमेसाठी आंदोलने सुरु होत आहेत, बीडच्या शेतकऱ्यांनी मात्र, वेगळीच भूमिका घेतलेली आहे. जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र हे वाढलले आहे. त्यामुळे प्रथम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला प्राधान्य देण्यात यावे व नंतर इतर जिल्ह्यातील ऊसउत्पादकांचा विचार करण्यात यावा अशी मागणी शेतकरी आणि शेतकरी नेते यांनी केली आहे.

गेल्या दोन वर्षापासून मराठवाड्यात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे सोयाबीन बरोबरच ऊसाच्या क्षेत्रातही वाढ होत आहे. मात्र, कारखानदारांकडून ऊस गाळप प्रसंगी राजकारण केले जाते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाजूला सारुन इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप केला जातो. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाचे नुकसान होते त्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांनी इतर जिल्ह्यातील ऊस घेतल्यास ऊसाच्या गाड्या आडविल्या जाणार असल्याचा इशारा शेतकरी नेते भाई गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.

अतिरीक्त ऊस कारखान्यावर न गेल्याने 2007 मध्ये नानाभाऊ शिंदे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्या प्रमाणेच पुन्हा परस्थिती होऊ नये याची खबरदारी कारखान्यांनी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आगामी ऊस गाळपाच्या दृष्टीने वडवणी येथे ऊस परिषद पार पडली आहे. या दरम्यान, थावरे यांनी ही भुमिका व्यक्त केली आहे.

काय झाले होते 2007 मध्ये

बीड जिल्हा तसा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षापासून समाधानकारक पाऊस होत असल्याने ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. 2007 मध्येही ऊसाचे क्षेत्र वाढले होते. मात्र, इतर जिल्ह्यातील अतिरीक्त ऊस कारखान्यांवर आल्याने शेतकरी नानाभाऊ शिंदे यांचा ऊस हा फडातच राहिला होता. त्यामुळे त्यांनी आत्मुहत्या केल्याचे थावरे यांनी सांगितले आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप होणार आहे. त्यामुळे कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊसाचा आगोदर विचार करण्याची मागणी केली आहे.

यंदाच्या हंगामात 112 लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित

या गाळप हंगामात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या एफआरपी दराप्रमाणे 10 टक्के उताऱ्यासाठी 2900 रुपये प्रतिटन दर निश्चित करण्यात आला आहे. 2021-22 मध्ये राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र 12.32 लाख हेक्टर असून 97 टन प्रति हेक्टर उत्पादन अपेक्षित आहे. 1096 लाख मे.टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज असून 112 लाख टन साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे. या हंगामात अंदाजे १९३ साखर कारखाने सुरु राहतील असा अंदाज बांधण्यात आला आहे. (Sugar factories should give priority to sugarcane growers in Beed district, Beed Role of farmers in the district)

संबंधित बातम्या :

उभारणीपासून 14 वेळा भरले मांजरा धरण, काय होता उद्देश आणि सध्याचे वास्तव

….म्हणून राज्य सरकारला ई-पीक पाहणीची गरज भासली, पडद्यामागची गोष्ट

कांदा उत्पादकांचे योग्य टाईमिंग, साठवलेल्या कांद्यातून शेतकऱ्यांची चांदी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.