AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugarcane Fire : गाळपापेक्षा फडातच होतेय ऊसाची होळी, महावितरणने हिसकावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

ऊस गाळप हंगामाचा सुरवातीचा काळ शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखान्यांसाठी अगदी सुखकर होता. पण अंतिम टप्प्यात सर्वकाही व्यर्थ ठरत आहे. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न तर कायम आहेच पण ऊसाला आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यंदाच्या हंगमात सर्वाधिक ऊसाला आगीच्या घटना घडल्या आहेत शिवाय याला महावितरणच जबाबदार असल्याचे पाहवयास मिळत आहे. बीड जिल्ह्यामध्ये 500 हून अधिक घटना घडल्या आहेत. हे सुरु असतानाच इंदापूर तालु्क्यातील लासुर्णे येथे उसाच्या शेतामध्ये विद्युत तारांचे घर्षण झाल्यामुळे लागलेल्या आगीमध्ये 7 एकर ऊस व ठिबक सिंचन जळून खाक झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Sugarcane Fire : गाळपापेक्षा फडातच होतेय ऊसाची होळी, महावितरणने हिसकावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास
विद्युत तारांच्या घर्षणामुळे इंदापूर तालुक्यात ऊसाला आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 7 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Mar 29, 2022 | 12:20 PM
Share

इंदापूर :  (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगामाचा सुरवातीचा काळ शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखान्यांसाठी अगदी सुखकर होता. पण अंतिम टप्प्यात सर्वकाही व्यर्थ ठरत आहे. (Excess sugarcane) अतिरिक्त ऊसाचा प्रश्न तर कायम आहेच पण ऊसाला आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यंदाच्या हंगमात सर्वाधिक (Sugarcane Fire) ऊसाला आगीच्या घटना घडल्या आहेत शिवाय याला महावितरणच जबाबदार असल्याचे पाहवयास मिळत आहे. बीड जिल्ह्यामध्ये 500 हून अधिक घटना घडल्या आहेत. हे सुरु असतानाच इंदापूर तालु्क्यातील लासुर्णे येथे उसाच्या शेतामध्ये विद्युत तारांचे घर्षण झाल्यामुळे लागलेल्या आगीमध्ये 7 एकर ऊस व ठिबक सिंचन जळून खाक झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे अशा दुर्घटनांमध्ये शेतकऱ्यांचेच नुकसान होत आहे.

नागरिकांचा प्रयत्नही व्यर्थ

भोसले यांच्या शेतामध्ये विद्युत रोहित्र आहे शिवाय विद्युत तारांची वहिवाटही यांच्या शेतामधूनच आहे. अचानक विद्युत तारामध्ये घर्षण झाल्यामुळे आगीचे गोळी उसामध्ये पडल्याने उसाने पेट घेतला. अवघ्या काही वेळात आगीने रोद्र रुप धारण केले होती. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र उन व वाऱ्यामुळे आग आटोक्यात आली नाही.

जळालेल्या ऊसाचे होते काय?

आगीच्या दुर्घटनेत होरपळलेल्या ऊसाचे काय होते असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.आगीमध्ये ऊस जळाला तर कारखान्याकडून त्याची लागलीच तोड होते. शिवाय तो गाळपासाठीही नेला जातो. पण नियमित दरामपेक्षा 30 टक्के रक्कम ही कमी दिली जाते.जळालेल्या ऊसाचे वजन हे कमी भरते. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून केवळ महावितरणकडून पंचनामे आणि मदतीची प्रक्रिया पूर्ण झाली तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळतो.

ऊसाच्या क्षेत्रावरुनच विद्युत तारा

लासुर्णे शिवारात भोसले यांचा 7 एकरामध्ये ऊस असून तोडणीला आला होता. याच उस क्षेत्रावरुन विद्युत तारा गेलेल्या आहेत. सोमवारी वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण झाल्याने शॉर्टसर्किटमुळे 7 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. शेती क्षेत्रातून विद्युत तारांची वहिवाट असली तरी योग्य संरक्षण असणे गरजेचे असते. यासंबंधी शेतकऱ्यांनी अनेक वेळा महावितरणकडे विनंती अर्जही केले होते. मात्र, महावितरणच्या दुर्लक्षाचा परिणाम काय होतो याची अनुभती शेतकरी भोसले यांना आली आहे.

ऊसासह शेती साहित्य जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे भोसले यांच्या शेतातील 7 एकरातील ऊस तर जळून खाक झालाच आहे पण इतर शेती साहित्याचेही नुकसान झाले आहे. ऊस पिकाला पाणी देण्यासाठी भोसले यांनी तब्बल 7 एकरामध्ये ठिबकची सोय केली होती. शिवाय याकरिता लाखो रुपयांची खर्च त्यांनी केला होता. पण अवघ्या काही वेळात सर्वकाही होत्याचे नव्हते झाले आहे. ऊसाचे तर नुकसान झालेच पण इतर शेती साहित्याजी नुकसान भरपाई मिळणार तरी कशी असा सवाल आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : उन्हाच्या झळा अन् पीक काढणीची लगबग, शेतशिवारातलं नेमकं चित्र काय?

फेब्रुवारीतच खाद्यतेलाला महागाईची फोडणी, दर भडकण्याची शक्यता

कापसाला Record Break दर, हंगामाच्या अंतिम टप्प्यात ‘पांढऱ्या सोन्या’ला अधिक झळाळी, आवकही वाढली

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?.

‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं