AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery : उन्हाच्या झळा अन् पीक काढणीची लगबग, शेतशिवारातलं नेमकं चित्र काय?

नांदेड : उन्हाळी हंगाम म्हणलं की पारंपरिक ज्वारी, गव्हाची काढणी केली की हंगामाच संपुष्टात असेच दरवर्षी चित्र असते. यंदा मात्र, भर उन्हाळ्यातही शिवार हिरवागार होता तर आता पीक कापणीच्या कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पारा 41 अंशावर असताना शेती कामे उरकून घेतली जात आहेत. जिल्ह्यात सध्या करडई पिकाच्या काढणीला वेग आलाय, करडईची कापणी करून यंत्राद्वारे पीक काढणीचे काम सुरू आहे. वाढत्या ऊन्हामुळे शेतीकामे उरकून शेतीमाल घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.

| Edited By: | Updated on: Mar 29, 2022 | 11:30 AM
Share
यंत्राच्या सहाय्याने शेती कामे : मजुरांची टंचाई आणि वेळेची बचत व्हावी म्हणून शेतीकामात यंत्राचा वापर वाढला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या मळणीची कामे ही यंत्राच्या सहाय्याने केली जात आहेत. यामुळे धान्याची नासाडीही होत नाही. शिवाय अधिकचा खर्च टळला जात आहे.

यंत्राच्या सहाय्याने शेती कामे : मजुरांची टंचाई आणि वेळेची बचत व्हावी म्हणून शेतीकामात यंत्राचा वापर वाढला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या मळणीची कामे ही यंत्राच्या सहाय्याने केली जात आहेत. यामुळे धान्याची नासाडीही होत नाही. शिवाय अधिकचा खर्च टळला जात आहे.

1 / 4
वाढत्या उन्हामध्ये रब्बीची कामे: आतापर्यंत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. पण गेल्या आठ दिवसांपासून मराठवाड्यात उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे रब्बीतील कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. पोषक वातावरणामुळे रब्बी पिकांचे उत्पन्न वाढेल असा आशावाद आहे.

वाढत्या उन्हामध्ये रब्बीची कामे: आतापर्यंत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. पण गेल्या आठ दिवसांपासून मराठवाड्यात उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे रब्बीतील कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. पोषक वातावरणामुळे रब्बी पिकांचे उत्पन्न वाढेल असा आशावाद आहे.

2 / 4
करडई उत्पादनात घट : करडईवर जानेवारी महिन्यात चिकटा मावा आणि खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने करडईच्या उत्पन्नात घट आलीय. सध्या करडई पिकाला बाजारात चांगला भाव असल्याने बळीराजा तळपत्या उन्हात करडईची काढणी करतोय.

करडई उत्पादनात घट : करडईवर जानेवारी महिन्यात चिकटा मावा आणि खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने करडईच्या उत्पन्नात घट आलीय. सध्या करडई पिकाला बाजारात चांगला भाव असल्याने बळीराजा तळपत्या उन्हात करडईची काढणी करतोय.

3 / 4
करडई होते मुख्य पीक : मराठवाड्यातील बहुतांश भागात अगदी 2000 साला पर्यंत उडीद, मुंग, ज्वारी, कापूस, हरभरा आणि करडई हे प्रमुख पिके होती. उन्हाळी हंगामात करडई ने शेत शिवार बहरून गेलेले दिसत असे, मात्र रासायनिक खतांच्या माऱ्याने जमिनीचा पोत बिघडला आणि करडईचे उत्पन्न घटत गेले. त्यामुळे गेल्या 20 वर्षात करडईचे पीक हे दुर्मिळ बनत गेलय. मात्र आता पुन्हा शेतकरी ह्या जुन्या पिकाकडे वळताना दिसतायत.

करडई होते मुख्य पीक : मराठवाड्यातील बहुतांश भागात अगदी 2000 साला पर्यंत उडीद, मुंग, ज्वारी, कापूस, हरभरा आणि करडई हे प्रमुख पिके होती. उन्हाळी हंगामात करडई ने शेत शिवार बहरून गेलेले दिसत असे, मात्र रासायनिक खतांच्या माऱ्याने जमिनीचा पोत बिघडला आणि करडईचे उत्पन्न घटत गेले. त्यामुळे गेल्या 20 वर्षात करडईचे पीक हे दुर्मिळ बनत गेलय. मात्र आता पुन्हा शेतकरी ह्या जुन्या पिकाकडे वळताना दिसतायत.

4 / 4
Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.