AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेदर स्टेशनच शेतकऱ्यांच्या मुळावर, ‘या’ एका निकषामुळे नुकसान भरपाईपासून वंचित?

नांदेड जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र वेदर स्टेशन आता या शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे.

वेदर स्टेशनच शेतकऱ्यांच्या मुळावर, 'या' एका निकषामुळे नुकसान भरपाईपासून वंचित?
nanded farmers and weather stations
| Updated on: Jun 18, 2025 | 7:57 PM
Share

नांदेडमध्ये शेतकऱ्यांची चांगीलच कोंडी झाली आहे. नुकसान भरपाईच्या एका निकषामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नुकसान भरपाईसाठी वाऱ्याचा वेग ताशी 40 किमी असायला हवा. मात्र त्या भागात असलेल्या वेदर स्टेशनमध्ये हा वेग तासी 38 किमी नोंदवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी हे वेदर स्टेशन चुकीचा वेग दाखवते. त्यात तांत्रिक बिघाड झालेली आहे, असा आरोप केला आहे. त्यामुळे आता चुकीची माहिती संकलित झाल्यामुळे हे वेदर स्टेशन शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

संपूर्ण नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान

नांदेड जिल्ह्यात 9 जून रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे फळबागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. विशेषत: केळी आणि पपईच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. नांदेडच्या अर्धापूर, मुदखेड व भोकर तालुक्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. वादळी वाऱ्याचा वेग जास्त असतानाही वेदर स्टेशनमध्ये केवळ ताशी 38 किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली आहे. याच कारणामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार की नाही असा प्रश्न उभा राहिला आहे.

वादळी वाऱ्याचे मोजमाप व्यवस्थित झाले नाही

जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे 4 हजार हेक्टरवरील फळबागायतींना फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे. वेदर स्टेशन चुकीच्या जागी लावल्याने वादळी वाऱ्याचे मोजमाप व्यवस्थित झाले नसल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. वेदर स्टेशन नियमानुसार लावावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने पाहणी करून वादळी वाऱ्याचा वेग ताशी 40 किलोमीटर पेक्षा अधिक असल्याचा प्रस्ताव पाठवला आहे.

पीकविमा कंपन्या कोणता निकष लावणार?

मात्र आता पिकविमा कंपन्या जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव ग्राह्य धरणार की, वेदर स्टेशनमध्ये नोंद झालेलाच वाऱ्याचा वेग ग्राह्य धरणात असा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, पावसात आमचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?