AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजारपेठेत धान्याची आवक वाढली, भावात तेजी कायम असल्याने शेतकरी सुखावला

मागच्या पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. रब्बी हंगामातील अनेक पीकं त्यामुळे उद्धवस्त झाली आहेत. अनेक शेतकरी आपल्या नुकसान झाल्याची तक्रार सरकार दरबारी करीत आहेत.

बाजारपेठेत धान्याची आवक वाढली, भावात तेजी कायम असल्याने शेतकरी सुखावला
BhusavalImage Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 31, 2023 | 11:09 AM
Share

भुसावळ : बाजारपेठेत (Market) धान्यांची आवक वाढली आणि भावही तेजीत अवकाळी पावसाच्या (Unseasonal rain)नुकसानीनंतर हरभरा, मका, केळीने शेतकऱ्यांना तारले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भुसावळ (Bhusaval) जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत यावल, रावेर, भुसावळ मुक्ताईनगर यांच्यापेक्षा भाव अधिक मिळत आहेत. त्यामुळे बाजार समितीत गहू, हरभरा, दादर, सूर्यफूल, मक्याची आवक वाढली आहे. दुसरीकडे, भावात तेजी कायम असल्याने शेतकरी सुखावला असल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसामुळे पीकांचं मोठ नुकसान झालं आहे. अनेक शेतकरी अद्याप त्यातून सावरलेले नाहीत. शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत.

चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदीत

मार्केटला सध्या हरभऱ्यात मॅक्सिको, पी. के. व्हीटू धान्याची आवक मोठ्या प्रमाणावर आवक आहे. यात व्हीटू चण्याला (प्रतिक्विंटल) ७२७६ ते ७७१७ इतका, तर मॅक्सिकोला १० हजार ते ११,३२५ भाव आहे. हा भाव आजवरचा सर्वाधिक असल्याचे जाणकार सांगतात. दादर ३८०० ते ४६००, गहू २ हजार ते २५००, मका १७०० ते २०११, सूर्यफूल ३३२६ ते ४५०० इतका भाव आहे. अवकाळी पाऊस पडल्यानंतर चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदीत असल्याचं चित्र आहे.

डॉलर चण्याला आखाती देशात मागणी

खान्देशातील मॅक्सिको, डॉलर चण्याला आखाती देशात मागणी असते. अवकाळीमुळे काही प्रमाणात शेतमालाचे नुकसान, माल कमी येतो. पण त्यामुळेच भावदेखील वाढतो या वर्षी केळीचे भाव चांगले आहेत. केळीने शेतकऱ्यांना तारले असे म्हणता येईल. सप्टेंबरपासून व्यापारी बाजारपेठेत येणारा कांदेबाग आणि मेपासून निघणारा मृगबाग यांत पिकांचा दर्जा चांगला आहे.

मागच्या पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. रब्बी हंगामातील अनेक पीकं त्यामुळे उद्धवस्त झाली आहेत. अनेक शेतकरी आपल्या नुकसान झाल्याची तक्रार सरकार दरबारी करीत आहेत.

Follow Us
फक्त 20 दिवसांवर लग्न, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.......
फक्त 20 दिवसांवर लग्न, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू........
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने...
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने....
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं.
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक......
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक.......
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP...
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP....
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.