AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Watermelon : कलिंगडला ‘विकेल ते पिकेल’ अभियानाचा आधार, शेतकऱ्यांनी कसा घ्यायचा लाभ? वाचा सविस्तर

यंदा शेतकऱ्यांना मुख्य पिकातून नाही पण हंगामी पिकातून अधिकचे उत्पादन मिळाले आहे. उन्हाळी हंगामात याची प्रचिती अधिक आली आहे. कांदा, लिंबू आणि आता कलिंगडातून अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. हंगामी पिकांचे दर वाढत असतानाच विकेल ते पिकेल या राज्य सरकारच्या अभियानाचाही फायदा शेतकऱ्यांना होत आहे. कृषी विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या या अभियानाचा सध्या कलिंगड उत्पादकांना होत आहे.

Watermelon : कलिंगडला 'विकेल ते पिकेल' अभियानाचा आधार, शेतकऱ्यांनी कसा घ्यायचा लाभ? वाचा सविस्तर
कलिंगडच्या किंमतीमध्ये वाढ झाली असून आता 'विकेल ते पिकेल' या अभियानाचाही फायदा होत आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 15, 2022 | 1:29 PM
Share

नाशिक : यंदा शेतकऱ्यांना (Main Crop) मुख्य पिकातून नाही पण हंगामी पिकातून अधिकचे उत्पादन मिळाले आहे. उन्हाळी हंगामात याची प्रचिती अधिक आली आहे. कांदा, लिंबू आणि आता (Watermelon) कलिंगडातून अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. हंगामी पिकांचे दर वाढत असतानाच विकेल ते पिकेल या राज्य सरकारच्या अभियानाचाही फायदा शेतकऱ्यांना होत आहे. (Agricultural Department) कृषी विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या या अभियानाचा सध्या कलिंगड उत्पादकांना होत आहे. कारण याच अभियानाचा आधार घेत मालेगाव तालुक्यातील कलिंगड हे काश्मिरच्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून गुणवत्तापुर्वक मालच पाठवला जात असून शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होत आहे. मालेगाव तालुक्यातील लेंडाणे येथील शेतकऱ्याचा माल पाठवण्यात आला आहे.

असा नोंदवा अभियनात सहभाग

‘विकेल ते पिकेल’ हे अभियान कृषी विभागाच्या माध्यमातून राबवले जात आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठेच्या अनुशंगाने पिकाबद्दल माहिती द्यावयाची आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांना या अभियानाच्या माध्यमातून शेती मालाची विक्री करायची आहे त्यांना तालुका कृषी कार्यालयात पिक लागवड करण्यापूर्वी नोंदणी करावी लागणार आहे. कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन शेतीमाल दर्जेदार कसे होईल यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. यानंतर सानुग्र अनुदान म्हणून शेतकऱ्यांना मार्केटींग, डिजीटल बॅनर, शिवाय मार्केट उभे करुन देण्यासाठीचे प्रयत्न हे कृषी विभागाच्या माध्यमातून केले जातात. याचाच लाभ मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यास झाला आहे.

‘विकेल ते पिकेल’ अभियानाचा उद्देश काय?

शेतीमालास हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे, यासाठी राज्य शासनाने ‘विकेल ते पिकेल’ हे अभियान 2020 मध्ये हाती घेतले आहे. हे अभियान सुरु करतानाच गटशेतीच्या माध्यमातून बाजारात कुठल्या शेतीमालास मागणी आहे, याचे शेतकऱ्यांनीच नियोजन करुन विभागवार शेती करावी, दर्जेदार उत्पादन घ्यावे तसेच थेट शेतीमाल विक्रीसाठी कृषी विभागाने प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यातून शेतीमाल विक्रीतील दलाल, मध्यस्थ हद्दपार होतील, शेतीमालाचा दर शेतकऱ्यांना ठरविता येईल, यात ग्राहकांनाही रास्त दरात शेतीमाल मिळेल. परंतू हे सर्व शेतकऱ्यांनी जे पिकविले तेच विक्रीसाठीचे प्रयत्न आहेत.

रमजान महिन्यामुळे कलिंगडच्या मागणीत वाढ

वाढते ऊन आणि सध्याचा पवित्र रमजान महिन्यामुळे कलिंगडच्या मागणीत वाढ होत आहे. नाशिक गिरणाई शेतकरी उत्पादक कंपनीचे किरण शिंदे यांनी निर्यातक्षम कलिंगडची निवड करुन काश्मिर अनंतनाग बाजारपेठेत पाठविण्यात आला होते. त्यामुळे अधिकचा दर तर मिळाला आहे शिवाय कलिंगडचा दर्जा चांगला असल्याने मागणीत वाढ होत आहे. शेतकऱ्याला जागेवर 10 ते 11 रुपये किलो असा दर देऊन खरेदी केली जात आहे.

संबंधित बातम्या :

Success Story : पानमळ्याने फुलले शेतकऱ्यांचे जीवन, 20 गुंठ्यामध्ये 10 कुटुंबाचा उदरनिर्वाह

Kharif Season : खत पुरवठ्यापासून पेरणीपर्यंत कृषी विभागाचे नियोजन, शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?

Sugarcane Fire : महावितरणचा असा हा ‘शॉक’, गतवर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती, उसाचे क्षेत्रही अ्न कारणही तेच

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.