AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray: ॲनाकोंडा त्यांना गिळणार; शिंदे सेना-अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अस्तित्व संपणार? उद्धव ठाकरेंचा तो सूचक इशारा काय?

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांची तोफ आज पुन्हा धडाडली. त्यांनी शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा सूचक इशारा दिला आहे. त्यांचा रोख कुणाकडं होता हे वेगळं सांगायला नको? काय म्हणाले उद्धव ठाकरे?

Uddhav Thackeray: ॲनाकोंडा त्यांना गिळणार; शिंदे सेना-अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अस्तित्व संपणार? उद्धव ठाकरेंचा तो सूचक इशारा काय?
उद्धव ठाकरे
| Updated on: Dec 06, 2025 | 3:07 PM
Share

Uddhav Thackeray on BJP: उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा भाजपवर निशाणा साधला. त्यांनी महायुतीतील घटक पक्षांना सावधगिरीची इशारा दिला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची आणि भाजप यामध्ये पक्ष प्रवेशावरून जुंपल्याचे दिसून आले. त्यात शिंदे सेना आणि भाजपमधील पक्ष प्रवेशा वादाचे ठरले. त्यावरून दोन्हीकडील बाजूने थेट युती तुटण्यापर्यंतची भाषा करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कार्यकर्त्यांची ही पळवापळवी दोघांच्याही जिव्हारी लागल्याचे दिसले. त्यावर नेमकं बोट ठेवत उद्धव ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली.

ॲनाकोंडा त्यांना गिळणार

मुंबईचा महापौर हा भाजपचाच असेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्यातील पक्ष चालवतात या विधानाचा त्यांनी समाचार घेतला. हे तीनही पक्ष एकच असल्याचे ते म्हणाले. या पक्षांची नावं आणि निशाण्या वेगळ्या जरी असल्या तरी इतर दोन पक्षं हे भाजपच्या बी टीम असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला. त्यांचा मालिक एक आहे, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला. महायुतीमध्ये प्रवेशावरून नाराजी नाट्य सुरु असल्याबाबत ठाकरे यांनी सूचक इशारा दिला.

यापूर्वी मी ॲनाकोंडा हा शब्द वापरला होता. त्याचा अनुभव महायुतीमधील त्यांच्या मित्र पक्षांना यायला लागल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना गिळल्याशिवाय हा ॲनाकोंडा थांबणार नाही असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. महायुती चा एकसंघपणा म्हणजे गरज सरो वैद्य मरो असे असल्याचा चिमटाही त्यांनी काढला. महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. यामुद्दावर या सरकारला डिकोड करायला हवे, असे ते म्हणाले.

निवडणुकीचा अनुभव अत्यंत वाईट

निवडणुकीचा अनुभव अत्यंत वाईट आहे. निवडणुकीत गडबड घोटाळा सुरू आहे. यावेळी पहिल्या प्रथम ज्या निवडणुका अनुभवतोय, तो वाईट आहे. नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका 31 जानेवारी 2026 रोजी पूर्वी घ्यायचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पण अजूनही मुंबई आणि इतर शहरातील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे. पण त्याविषयी कोणी काहीही बोलत नाही. सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये स्वतः जातीनं लक्ष घालायला पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले. भटके कुत्रे असो वा इतर बाबतीत सर्वोच्च न्यायालय लक्ष देते. ते निवडणुका आणि त्यातील घोळाविषयी सर्वोच्च न्यायालय बोललं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सत्ताधारांमध्ये जे मारामारी सुरू आहे, आधी बूथ कैप्चर व्हायचे पण आता निवडणुका कैप्चर केले जात आहे. स्वत:ची घरे भरण्याची काम सुरू आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. तर गेल्या एक वर्षांपासून मागणी करूनही विरोधी पक्ष नेते पद न दिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकार विरोधी पक्ष नेते पद द्यायला घाबरत असल्याचे ते म्हणाले. तर इंदू मिल स्मारकाबाबत ट्रस्ट नव्हता तो गेल्या महिन्यात पुनर्गठीत केला आहे. दफ्तर दिरंगाई आहे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला उशीर का होत आहे, याचे कारण काय हे सांगायला पाहिजे. भव्य आणि अति सुंदर स्मारक व्हायला हवे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी  केली.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर