AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिसरं जागतिक महायुद्ध झालं तर फक्त दोनच देश वाचतील; भारताचं तर…

तिसरं जागतिक महायुद्ध झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. न्यूक्लिअर युद्धामुळे ‘न्यूक्लिअर विंटर’ची शक्यता आहे, ज्यात जगातील बहुतेक देशांना मोठा फटका बसेल. संशोधनानुसार, फक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच न्यूक्लिअर युद्धाच्या भीषण संकटातून वाचण्याची अधिक शक्यता आहे. भारतासह अनेक देशांवर त्याचे विनाशकारी परिणाम होतील.

तिसरं जागतिक महायुद्ध झालं तर फक्त दोनच देश वाचतील; भारताचं तर...
world MapImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 09, 2026 | 4:42 PM
Share

गेल्या काही वर्षांपासून जगात कुठे ना कुठे युद्ध सुरू आहे. युक्रेन आणि रशियाचं युद्ध जगाने पाहिलं. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानचं पाहिलं. आता इस्रायल आणि इराणचं युद्ध सुरू आहे. या युद्धात महासत्ता अमेरिकेने इस्रायलच्या बाजूने उडी घेतली आहे. इराणनेही अमेरिका आणि इस्रायलला जशास तसे प्रत्युत्तर दिलं आहे. दुसरीकडे इराणने इतर सहा देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या तळांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे या सहाही देशांना मोठी झळ पोहोचली आहे. त्यामुळे या युद्धाचं रुपांतर महायुद्धात होतेय की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. तिसरं जागतिक महायुद्ध होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तिसरं जागतिक महायुद्ध झालं तर जगातील फक्त दोनच देश वाचतील. इतर सर्व देशांना या जागतिक महायुद्धाची मोठी झळ पोहोचेल. भारतालाही या जागतिक महायुद्धाची मोठी झळ पोहोचू शकते.

एक्सपर्टच्या इशाऱ्यानुसार, मोठ्या प्रमाणावर न्यूक्लिअर लढाई सुरू झाली तर त्याचा सर्वच जगाला मोठा फटका बसू शकतो. शास्त्रीय अभ्यासानुसार, जर न्यूक्लिअर युद्ध झालं तर त्याचा परिणाम भारतासह जगभरातील पर्यावरणावर होऊ शकतो. त्याला न्यूक्लिअर विंटरही म्हणतात. सायंटिफिक जनरल नेचरमध्ये एक स्टडी पेपर प्रकाशित झाला आहे. त्यात ग्लोबल न्यूक्लिअर वॉरपासून वाचण्यासाठी कदाचित काही देशातच चांगली परिस्थिती राहू शकते. रिसर्चर्सच्या मते, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशातच लोक वाचू शकतील. भारतासह जगातील कोणताही देश वाचू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांचं जिओग्राफिकल आयसोलेशन, मजबूत कृषी यंत्रणा आणि आजूबाजूचे समुद्र त्यांना न्यूक्लिअर विंटरच्या वेळी मोठ्या प्रमाणात क्लायमेट चेंजचा मुकाबला करणअयास मदत करू शकतात. न्यूक्लिअर युद्धामुळे या दोन्ही देशांनाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. पण भाजीपाला उगवण्यापासून ते लोकसंख्या मर्यादित ठेवण्याची क्षमता या दोन्ही देशांकडेच राहील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

गोठवणारी थंडी

न्यूक्लिअर वॉरमुळे सर्वाधिक मोठा धोका स्फोटाचा होणार नाही. तर त्यानंतर होणाऱ्या पर्यावरणाच्या अतोनात नुकसानीचा सर्वाधिक धोका होणार आहे. न्यूक्लिअर वॉरफेअर विश्लेषक एनी जॅकबसॅन यांच्या मते, न्यूक्लिअर स्फोटामुळे निर्माण होणारे मोठे आगीचे गोळे 100 मिलियन डिग्री सेल्सिअसपर्यंतच्या तापमानापर्यंत पोहोचतात. तात्काळ निर्माण होणाऱ्या तंबाखूमुळे लाखो लोग मारले जाऊ शकतात. परंतु, दीर्घकाळ भेडसावणारे परिणाम तर त्याहून भयानक असतील, असं जॅकबसॅन यांनी सांगितलं. आयोवा आणि यूक्रेनसारख्या कृषी परिसरात सुमारे एक दशकापर्यंत हिमवृष्टी आणि गोठवणारी थंडी पडू शकते. त्यामुळे शेती करणं जवळपास शक्यच होणार नाही.

न्यूक्लिअर विंटर काय असते?

न्यूक्लिअर विंटर केवळ अधिक थंडी नसते. खरं तर ही एक ग्लोबल क्लायमेट कोलॅप्स आहे. तो न्यूक्लिअर स्फोटानंतर वातावरणातील प्रचंड धूऱ आणि काळोखाने सुरु होतो. तज्ज्ञांच्या मते, सुमारे दीडशे मिलियन टन काजळी वरच्या अॅटमॉस्फिअरमधून निघते. त्यामुळे सूर्य प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे जागतिक तापमान खूपच कमी होईल. तर प्लॅनेटची क्लायमेट सिस्टिम पूर्णपणे विस्कळीत होऊन जाईल. जगभरात 90 टक्के पाऊस कमी होऊ शकतो. जे लोक सुरुवातीला बॉम्बच्या वर्षवातून वाचले, त्यांनाही नंतर अन्न पदार्थांची कमतरता भासू शकते.

अब्जावधी लोक भूकबळी होतील

तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीला न्यूक्लिअर स्फोटातून वाचणारे दोन ते तीन बिलियन लोक नंतर दुष्काळामुळे मरतील. कारण जागतिक कृषी संयत्रणा नष्ट झाल्याने ही परिस्थिती ओढवणार आहे. सूर्य प्रकाशच ब्लॉक झाल्याने तापमानात निचांकी पातळीवर जाईल. त्यामुळे जगभरात अनेक वर्ष अन्न पदार्थाचं उत्पादनच होणार नाही. त्यामुळेच तज्ज्ञांना, केवळ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच वाचण्याची अधिक शक्यता वाटते. कारण त्यांच्याकडील समुद्र तापमानातील घसरण कमी करू शकतात. तसेच त्यामुळे मर्यादित का होईना पण तिथलं कृषी उत्पादन सुरू राहिल.

जिवंत राहणं कठिन होईल

ज्या देशांना सर्वाधिक सुरक्षित मानलं जात आहे. त्या देशांमध्ये जिवंत राहणंही कठिण होईल. कारण अन्न पदार्थांची कमतरता होईल. रेडिएशनचा धोका राहील. हवेत धूर असल्याने बराच काळ अंधाराचा सामना करावा लागेल. जिवंत राहिलेल्या लोकांना रेडिएशन आणि खराब हवामानापासून वाचण्यासाठी जमिनीच्या खालील शेल्टरमध्ये राहावे लागू शकते. परंतु, तरी सुद्धा या लोकांचं जगणं कठिण होणार आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.