AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural Pump : राज्य सरकारचा निर्णय अन् स्थानिक पातळीवर अंमलबजावणी, रब्बी पिकांना मिळणार का संजीवनी?

कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने सबंध राज्यभर शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीव्र विरोध करण्यात आला होता. शिवाय विरोधकांच्या रेट्यामुळे कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यास तात्पूरती स्थगिती देण्यात आली आहे. शिवाय विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेशच उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिल्याने आता स्थानिक पातळीवर निर्णयाची अंमलबजावणी होऊ लागली आहे.

Agricultural Pump : राज्य सरकारचा निर्णय अन् स्थानिक पातळीवर अंमलबजावणी, रब्बी पिकांना मिळणार का संजीवनी?
कृषीपंप
| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 11:33 AM
Share

नांदेड : कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने सबंध (Maharashtra) राज्यभर शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीव्र विरोध करण्यात आला होता. शिवाय विरोधकांच्या रेट्यामुळे (Agricultural Pump) कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यास तात्पूरती स्थगिती देण्यात आली आहे. शिवाय विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेशच उर्जामंत्री (Nitin Raut) नितीन राऊत यांनी दिल्याने आता स्थानिक पातळीवर निर्णयाची अंमलबजावणी होऊ लागली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये एकाच दिवसामध्ये तब्बल 1 हजार 608 रोहित्रांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. निर्णय घेण्यास सरकारला उशिर झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

तीन महिन्याची मुदत, पुन्हा काय?

सध्या शेतकऱ्यांची अवस्था आणि रब्बी हंगामातील पिकांची स्थिती पाहून कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत कऱण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी कृषीपंपाच्या थकबाकीतून शेतकऱ्यांची सुटका ही होणारच नाही. सध्या तीन महिन्याकरिता ही मोहीम खंडीत करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी वीजबिल अदा केले नाही तर पुन्हा कृषीपंपाचा विद्युत पुरवठा हा खंडीत केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही वाढीव मुदतीचा फायदा घेणे गरजेचे असल्याचे महावितरणच्या वतीने मांडण्यात आले आहे.

आदेश मिळताच कारवाईला सुरवात

शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवन्याचा निर्णय सभागृहात झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात वीज तोडणी बंद झाली असून तोडलेले वीज कनेक्शन जोडणी सुरू झाली . एका दिवसात महावितरणने जिल्ह्यात 1 हजार 608 डीपी सुरू केल्या. नांदेड जिल्ह्यात एकूण कृषी पंपधारक शेतकऱ्यांची संख्या 1 लाख 33 हजार 188 इतकी आहे . त्यांच्याकडे 1 हजार 732 कोटी 88 लाख रुपये थकबाकी आहे . थकबाकी वसुलीसाठी महावितरणने जिल्ह्यात 1 हजार 728 डीपी बंद केल्या होत्या . त्यापैकी एका दिवसात 1 हजार 608 डीपी सुरू करण्यात आल्या .

रब्बी पिकांची काय अवस्था?

यंदा पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके बहरत आहेत. शिवाय शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणीसाठाही आहे. असे असतानाही ऐन दाणे भरण्याच्या प्रसंगीच महावितरणने विद्युत पुरवठा हा खंडीत केला होता. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी हतबल झाला होता. तर राज्यभर सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला जात होता. मध्यंतरीच्या कारवाईमुळे पिकांना दोन पाळ्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे याचा थोड्याबहूत प्रमाणात उत्पादनावर परिणाम होईल अशी शंका उपस्थित केली जात आहे.

संबंधित बातम्या :

Gadchiroli : ठसका उठण्यापूर्वीच मिरची पिकाला रोगराईने घेरले, कृषितज्ञांचा महत्वपूर्ण सल्ला?

Soybean Crop : सोयाबीन दरात चढ-उतार, शेतकऱ्यांसह व्यापारीही अडचणीत, काय आहे बाजारपेठेतले वास्तव?

Onion Rate : कांद्याची विक्रमी आवक, चाकण बाजार समितीमध्ये दिवसागणिक दरात होतेय घट..!

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.