AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निरक्षर शेतकऱ्याचा व्यापाऱ्यांना धक्का, असे मिळवले ८० लाखांचे उत्पन्न

२०१६ पासून ते डाळिंबाची शेती करत आहेत. यातून त्यांचे भविष्य बदलले. डाळिंबाची विक्री ते महाराष्ट्र, कोलकाता आणि बांग्लादेशात करतात.

निरक्षर शेतकऱ्याचा व्यापाऱ्यांना धक्का, असे मिळवले ८० लाखांचे उत्पन्न
| Updated on: Aug 25, 2023 | 8:19 PM
Share

नवी दिल्ली : बहुतेक लोकं म्हणतात शेती तोड्यात आहे. खर्चाच्या मानाने उत्पन्न निघत नाही. बहुतेक वेळा भाव मिळत नसल्याने फायदा होत नाही. परंतु, योग्य पद्धतीने शेती केल्यास जमिनीतून सोना उगवतो. यासाठी थोडा धीर धरावा लागतो. आता आपण पाहणार आहोत एका राजस्थानच्या शेतकऱ्याबाबत. त्यांनी शेतीतून लाखो रुपयांची कमाई सुरू केली आहे. बाडमेर जिल्ह्यातील भईमडा येथील जेठाराम कोडेचा यांची ही गोष्ट. आधी ते पारंपरिक शेती करत होते. परंतु, त्यांना पाहिजे तसा नफा मिळत नव्हता. त्यानंतर त्यांनी शेती करण्याची पद्धती बदलवली. शेतात फळबाग लावली. २०१६ पासून ते डाळिंबाची शेती करत आहेत. यातून त्यांचे भविष्य बदलले. डाळिंबाची विक्री ते महाराष्ट्र, कोलकाता आणि बांग्लादेशात करतात.

दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न

२०१६ मध्ये जेठाराम यांनी १५ लाख रुपयांचे कर्ज घेऊन स्टार्टअप म्हणून डाळिंबाची लागवड केली. यासाठी त्यांनी नाशिकमधील ४ हजार रोपं मागवली. यानंतर कोडेचा यांनी मागे फिरून पाहिले नाही.

असे मिळते उत्पन्न

विशेष म्हणजे जेठाराम कोडेचा हे शिकलेले नाहीत. निरक्षर शेतकरी आहेत. परंतु, मोठ-मोठ्या व्यवसायिकांना त्यांनी मागे टाकले. भगवा आणि सेंद्री रंगाचे डाळिंब त्यांनी शेतात लावले. एका रोपापासून सुमारे २५ किलो डाळिंब त्यांना मिळतात. डाळिंब लागवड केल्यानंतर एका वर्षाने त्यांना उत्पन्न मिळणे सुरू झाले. डाळिंब विक्रीतून दुसऱ्या वर्षी त्यांना सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तिसऱ्या वर्षी १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. चौथ्या वर्षी त्यांना २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर पाचव्या वर्षी त्यांना ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या पाच वर्षांत त्यांनी सुमारे ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

शेतीची योग्य मशागत करावी. खत व्यवस्थापन करून कीड नियंत्रित ठेवावी. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. फळबाग आणि भाजीपाला पिकातून उत्पन्नात वाढ होते. परंतु, त्यासाठी पिकांची योग्य काळजी घ्यावी लागते. पारंपरिक पीक पद्धतीत उत्पन्नाची हमी असते. पण, फारच कमी प्रमाणात फायदा होतो. फळबाग आणि भाजीपाला लागवडीमध्ये धोका असतो. पण, तो धोका पत्करल्यास त्याचा मोबदलाही तसा मिळतो.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.