कर्टुला लागवडीतून शेतकरी झाला मालामाल, तीन महिन्यांत ९ लाखांचे उत्पन्न

हळदा येथील शेतकरी आनंद बोईनवाड या शेतकऱ्याने कर्टुल्याची शेती फुलवलीय. या शेतीतून बोईनवाड हे लाखो रुपयांची कमाई करीत आहेत.

कर्टुला लागवडीतून शेतकरी झाला मालामाल, तीन महिन्यांत ९ लाखांचे उत्पन्न
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 7:05 PM

नांदेड : पावसाळ्यात रानभाज्या मोठ्या प्रमाणात येत असतात. या रानभाज्यांना बाजारात मोठी मागणी असते. कर्टुले ही एक त्यातील रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेली भाजी माळरानावर उगवत असते. या भाजीला बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे आता शेतकरी या कर्टुल्याच्या शेतीकडे वळले आहेत. कर्टुल्याच्या या रानभाजीला तेलंगणा, हैदराबाद, विदर्भातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नांदेड जिल्ह्यातील काही शेतकरी कर्टुल्याची शेती करीत आहेत. 11 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळते. कर्टुल्याची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे .

नांदेडच्या भोकर तालुक्यातील हळदा येथील शेतकरी आनंद बोईनवाड या शेतकऱ्याने कर्टुल्याची शेती फुलवलीय. या शेतीतून बोईनवाड हे लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. आनंद बोईनवाड यांनी मागील तीन वर्षापूर्वी आपल्या तीन एकर शेतात कर्टुल्याची लागवड केली. भोकर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी गंगाधर हणमांगे यांच्या मार्गदर्शनाखाली बोईनवाड यांनी कर्टुल्याची लागवड केली.

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ही भाजी तोडणीला येते. आरोग्यदायक, अनेक रोगांवर रामबाण उपाय असल्याने बाजारात या रानभाजीला मोठी मागणी आहे. बाजारात तीनशे रुपये किलो दराने ही भाजी विकली जात आहे. बोईनवाड यांनी तीन एकरात कुर्टुल्याची लागवड केली. लागवडीचा खर्च जाऊन बोईनवाड यांना 8 लाख रुपयांचा निवळ नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.

तीन एकरातून ९ लाखांचे उत्पन्न

आनंदा बोईनवाड म्हणाले, कर्टुले ही रानभाजी आहे. नांदेड येथे रानभाजी महोत्सव घेण्यात आला होता. कार्यक्रमाच्या उद्घाटनापूर्वी कर्टुले राहिले नाही. १०० रुपये किलोच्या भावाने विकले गेले. त्यामुळे तीन एकर कर्टुल्याची लागवड केली. एकरी १५ ते २० क्विंटल उत्पन्न येते. आंध्र, तेलंगणातील लोकं घरी येऊन १०० ते दीडशे रुपये किलोने घेऊन जातात. तीन एकरमध्ये ९ ते १० लाख रुपयांचे उत्पन्न होते. शिवाय मी बियाणेसुद्धा विकतो, असं आनंदा बोईनवाड यांनी सांगितलं.

श्रावण महिन्यात येते

ग्राहक स्वाती कुलकर्णी म्हणाल्या, कर्टुल्यातून व्हीटॅमीन ए मिळते. कर्टुले श्रावण महिन्यात येते. श्रावण सोमवारी कर्टुले खाऊन उपवास सोडावा, असं म्हणतात. ऑगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यातच कर्टुल्याचे उत्पादन निघते. आरोग्यदायी असल्याने ग्राहक चवीने खातात.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.