AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आर्थिक संकट येण्यापूर्वी मिळतात हे 4 संकेत, चाणक्य यांनी काय म्हटलंय?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते म्हणतात जेव्हा तुमच्यावर आर्थिक संकट येणार असंत तेव्हा तुम्हाला त्याची जाणीव करून देणारे काही विशिष्ट संकेत मिळतात, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : आर्थिक संकट येण्यापूर्वी मिळतात हे 4 संकेत, चाणक्य यांनी काय म्हटलंय?
CHANKYA Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 15, 2026 | 11:23 AM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत,  ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात तुमच्यावर जेव्हा आर्थिक संकट येतं, तेव्हा त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात. मात्र जेव्हा तुमच्यावर एखादं आर्थिक संकट येणार असतं, तेव्हा त्याची जाणीव करून देण्यासाठी तुम्हाला चार संकेत मिळतात. तुम्ही जर या संकेतांकडे वेळीच लक्ष दिलं आणि त्याप्रमाणे बदल घडवून आणले तर तुम्ही या संकटातून वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

घरात सतत भांडणं – चाणक्य म्हणतात ज्या घरात सतत भांडणं होतात, पती-पत्नीमध्ये पटत नाही. अशा घरात कधीही पैसा टिकत नाही. ज्या घरात सतत भांडणं होतात, त्या घरावर लक्ष्मी माता नाराज होते. अशा घरात कधीच बरकत राहत नाही. त्यामुळे घरावर मोठं आर्थिक संकट ओढावतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.  त्यामुळे घर नेहमी शांत असावं. पती-पत्नीने समजूतदारपणाने वागावे, घरात कलह नसावा असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

महिला, वृद्धाचा अनादर – चाणक्य म्हणतात ज्या घरात महिला आणि वृद्धांचा अनादर होतो, त्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही. लक्ष्मी माता नाराज होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यात खूप सगळे अनुभव घेतलेले असतात, त्यामुळे त्यांचा आदर करा,  त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घ्या असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

पुजा न करणे – चाणक्य म्हणतात ज्या घरातील वातावरण धार्मिक नसतं, ज्या घरात कधीही पूजा केली जात नाही. अशा घरावर देखील लक्ष्मी माता नाराज होते. अशा घरात पैसा टिकत नाही.

तुळस – चाणक्य म्हणतात ज्या घरात तुळस नसते, त्या घराला कधीही आर्थिक स्थैर्य लाभत नाही, त्यामुळे प्रत्येक घरात तुळस असलीच पाहिजे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....