AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Market : सततच्या पावसाचा परिणाम थेट भाजीपाल्याच्या दरावर, काय आहे बाजारपेठेचे चित्र?

श्रावण महिना सुरु होताच वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याची मागणी वाढते. असे असताना मार्केटमध्ये केवळ बटाटे, टोमॅटो आणि वांगी हेच मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. याच्या दरामध्येही तब्बल 30 ते 40 टक्वे वाढ झाली आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांनाच होतो असे नाहीतर ग्राहक आणि शेतकरी यांच्या मधला दुवा असलेले व्यापारीच अधिक फायद्यात राहत आहेत.

Nashik Market : सततच्या पावसाचा परिणाम थेट भाजीपाल्याच्या दरावर, काय आहे बाजारपेठेचे चित्र?
Image Credit source: सोशल मीडिया
| Edited By: | Updated on: Aug 03, 2022 | 2:53 PM
Share

नाशिक : राज्यातील काही भागामध्ये (Rain) पावसाने उसंत घेतली असली तरी (Nashik Market) नाशकात मात्र सतंतधार सुरुच आहे. त्यामुळे आतापर्यंत खरीप हंगामातील पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण आता (Vegetable Rate) भाजीपालाही पाण्यातच अशी अवस्था आहे. उत्पादनात घट अन् बाजारपेठेत मागणी यामुळे भाजीपाल्याचे दर 30 ते 40 टक्क्यांनी वाढत आहेत. निसर्गाच्या लहरीपणातून यंदा कोणत्याच पिकाची सुटका झालेली नाही. आतापर्यंतच्या पावसामुळे राज्यातील 10 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले असताना आता भाजीपाल्याच्या उत्पादनातही मोठी घट होत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत आवक घटली आहे. उत्पादन घटल्याने दर वाढूनही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय असेही नाही.

श्रावण महिना सुरु होताच मागणी वाढ

श्रावण महिना सुरु होताच वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याची मागणी वाढते. असे असताना मार्केटमध्ये केवळ बटाटे, टोमॅटो आणि वांगी हेच मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. याच्या दरामध्येही तब्बल 30 ते 40 टक्वे वाढ झाली आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांनाच होतो असे नाहीतर ग्राहक आणि शेतकरी यांच्या मधला दुवा असलेले व्यापारीच अधिक फायद्यात राहत आहेत. शिवाय श्रावण महिन्यात मांसाहार केला जात नाही. परिणामी भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत तुटवडा असल्याने दरात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

सर्वच भाजीपाल्याच्या दरात वाढ

पावसाचा परिणाम एका विशिष्ट भाजीपाल्यावर नाहीतर सर्वच भाजीपाल्यावर झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात दर हे वाढलेले असतात. यंदा मात्र, 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. शिवाय पावसामुळे नव्या भाजीपाल्याची लागवडही करणे शक्य़ नाही. त्यामुळे भविष्यात दरात आणखी वाढ होणार असल्याचे व्यापारी अशोक आग्रवाल यांनी सांगितले आहे. कोथिंबीर,शिमला मिरची,गिलके,दोडके,वांगे,कोबी अशा सर्वच भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भाव वाढ झाल्याचं नाशिकच्या बाजार समितीत दिसून येत आहे.

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

एकीकडे प्रत्येक गोष्टीमध्ये दरवाढ ही ठरलेलीच आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच दुसरीकडे रोजचा लागणारा भाजीपालाही चांगलाच भाव खात आहे. सर्वच भाजीपाल्याचे दर 80 ते 100 रुपये किलोवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे महिला आता डाळीवरच भर देत आहेत. जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. घटत्या उत्पादनाबरोबर वाहतूकीचाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ ही सुरुच आहे.

Follow Us
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....