AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural Pump : चोरटेही शेतकऱ्यांच्या मुळावर, रात्रीतून 10 कृषिपंप लंपास

यंदा उन्हाळी हंगामातही जलस्त्रोतांचे पाणी हे टिकून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांचा प्रयोग केला आहे. उत्पादनवाढीसाठी हंगामी पिकांवर शेतकऱ्यांचा भर राहिला असून आता कडाक्याच्या उन्हामध्ये पाणी हे गरजेचेच आहे.

Agricultural Pump : चोरटेही शेतकऱ्यांच्या मुळावर, रात्रीतून 10 कृषिपंप लंपास
कृषीपंप
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: May 29, 2022 | 2:38 PM
Share

पुणे : नैसर्गिक संकटाचा सामना करीत शेतकरी उत्पन्न वाढीचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच (Summer Crop) उन्हाळ्यातही हंगामी पिकांचे उत्पादन घेण्यावर भर देण्यात आला असताना (Pune District) शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळी हंगामातील पिके पाण्याला आली असतानाच आमदाबाद गावातील तब्बल 10 (Agricultural Pump) कृषिपंप हे चोरीला गेले आहेत. त्यामुळे ही कसली दुश्मनी असा सवाल उपस्थित झाला असून पिकेही पाण्याविना करपून जात आहेत. त्यामुळे कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकट हे शेतकऱ्यांवर कायम राहिले असून त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. ऐन उन्हाच्या तडाख्यात कृषिपंपाची चोरी झाल्याने शेतीमालाला पाणी द्यायचं कसं याच्याच चिंतेने शेतकरी हतबल झाले आहेत.

पाणी असूनही उपयोग नाही, डोळ्यादेखत पिकांची राख

यंदा उन्हाळी हंगामातही जलस्त्रोतांचे पाणी हे टिकून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांचा प्रयोग केला आहे. उत्पादनवाढीसाठी हंगामी पिकांवर शेतकऱ्यांचा भर राहिला असून आता कडाक्याच्या उन्हामध्ये पाणी हे गरजेचेच आहे. असे असताना विहिरींवरील कृषीपंपच गायब झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आतापर्यंत सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्याने पिके धोक्यात होती आणि पाणी आहे, विद्युत पुरवठाही सुरळीत होत आहे असे असतानाही शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

शेतकऱ्यांची पोलिसांत धाव

एकाच रात्रीचत 10 कृषिपंपाची चोरी झाल्याने गावातील इतर शेतकऱ्यांचाही झोप उडाली आहे. शिवाय चोरट्यांना जेरबंद करावे व भविष्यात अशा घटनांना आळा बसवण्य़ासाठी पोलीस प्रशासनाने यंत्रणा राबवण्याची मागणी शेतकऱ्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांकडे केली आहे. सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये कृषी विकत आणायचे तरी कसे असा सवाल उपस्थित होत आहे. आता कुठे नैसर्गिक संकटाने पाठ सोडली तर शेतकऱ्यांसमोर नवेच संकट उभे राहिले आहे.

शेतकऱ्यांकडून रात्रीचा पहारा

चोरट्यांनी थेट कृषीपंपावरच डल्ला मारण्याचा धडाका सुरु केल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कृषीपंपाची चोरी होऊ नये म्हणून शेतकरी शेतामध्ये रात्र जागून काढू लागले आहेत. दिवसभऱ शेतीचे काम आणि रात्री पंपाचे संरक्षण. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करुन शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करण्याची मागणी आहे. पाण्याअभावी उन्हाळी पिकांचे मात्र नुकसान सुरु आहे.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन