AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : अजित पवारांनी मिटवला खरिपाचा प्रश्न, पीक पध्दतीबाबतही शेतकऱ्यांना लाखमोलाचा सल्ला..!

शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी राज्य सरकारही अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांच्या परिश्रमाला निसर्गाची साथ मिळाली तर शेती तोट्यात नाही उलट शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल अशीच शेती आहे. गतवर्षी पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. यंदा आता पाऊसकाळ चांगला होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रत्यक्षात असे झाले तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल.

Kharif Season : अजित पवारांनी मिटवला खरिपाचा प्रश्न, पीक पध्दतीबाबतही शेतकऱ्यांना लाखमोलाचा सल्ला..!
उपमुख्यमंत्री अजित पवारImage Credit source: tv9
| Updated on: May 14, 2022 | 2:52 PM
Share

पुणे : खरीप हंगामात (Chemical Fertilizer) रासायनिक खतांचा पुरवठा आणि कीटकनाशक व तणनाशकांच्या दराला घेऊन शेतकऱ्यांच्या मनात एक ना अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. त्यामुळे उत्पन्नापेक्षा उत्पादनावरच अधिकचा खर्च असे चित्र निर्माण होत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. (Kharif Season) खरीपपूर्व मशागतीची कामे पूर्ण करुन तुम्ही कामाला लागा शेतकऱ्यांना कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही ही राज्य सरकारची जाबाबदारी असल्याचे त्यांनी अश्वस्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात का होईना मिटलेली आहे. केवळ खत, बियाणांचा पुरवठाच नाही तर उत्पादन वाढीसाठी त्यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे.

यंदा उत्पादन वाढीची संधी

शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी राज्य सरकारही अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांच्या परिश्रमाला निसर्गाची साथ मिळाली तर शेती तोट्यात नाही उलट शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल अशीच शेती आहे. गतवर्षी पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. यंदा आता पाऊसकाळ चांगला होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रत्यक्षात असे झाले तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनो सर्वतोपरी प्रयत्न करा कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली जाणार नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पाण्याची उपलब्धताच महत्वाची

पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे फळबागांचे उत्पादन वाढत आहे. एकाने शेती प्रयोग यशस्वी केला म्हणजे प्रत्येकाचाच होईल असे नाही. शेतकऱ्यांनी जिरायत भागातील पाण्याची उपलब्धता, एकरी उत्पादन आणि त्यासाठी लागणारे कष्ट या सर्व बाबींचा अभ्यास करुन पीक पध्दती ठरविणे गरजेचे आहे. अन्यथा उत्पादन तर सोडाच नुकसानीचाच सामना करावा लागेल असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला. पाणी हे सगळ्यांचेच आहे. त्याचा योग्य़ वापर झाला तरच उद्देशही साध्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोमवारी 5 जिल्ह्यांची खरीप आढावा बैठक

सध्या खरीप हंगामावर कृषी विभाग आणि प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. शेतकऱ्यांना वेळेत खत आणि बियाणे पुरवठा तसेच वाढीव उत्पादनाच्या अनुशंगाने मार्गदर्शन आदी कार्यक्रम राबिवणे गरजेचे आहे. सध्या जिल्हानिहाय खरीप हंगाम आढावा बैठका पार पडत आहे. यामधून अंदाजित बियाणे, खते ठरवले जाते. त्यानुसार पुरवठा करुन शेतकऱ्यांची सोय केली जाते. त्याच अनुशंगाने सोमवारी 5 जिल्ह्यातील आढावा बैठक पार पडणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.