AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grape Damage : ज्याची भीती तेच झाले, व्यापाऱ्यांनीच द्राक्ष खरेदी थांबवली, निसर्गापुढे शेतकरी हताश

नैसर्गिक संकटावर मात करीत उत्तर महाराष्ट्र आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा जोपासल्या खऱ्या मात्र अंतिम टप्प्यात या शर्यतीमध्ये शेतकरीच हताश झाला आहे. द्राक्ष तोडणीच्या दरम्यान सांगली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम थेट द्राक्षावर झाला आहे. बदलत्या वातावरणामुळे द्राक्षाला तडे गेले आहेत. ऊन-पावसाच्या खेळात द्राक्ष उत्पादकांचे मात्र न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

Grape Damage : ज्याची भीती तेच झाले, व्यापाऱ्यांनीच द्राक्ष खरेदी थांबवली, निसर्गापुढे शेतकरी हताश
अवकाळी आणि बदलत्या वातावरणामुळे सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागांचे नुकासान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 27, 2022 | 3:27 PM
Share

सांगली : नैसर्गिक संकटावर मात करीत उत्तर महाराष्ट्र आणि (Sangali District) सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (Vineyard) द्राक्ष बागा जोपासल्या खऱ्या मात्र अंतिम टप्प्यात या शर्यतीमध्ये शेतकरीच हताश झाला आहे. द्राक्ष तोडणीच्या दरम्यान सांगली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम थेट (Grape) द्राक्षावर झाला आहे. बदलत्या वातावरणामुळे द्राक्षाला तडे गेले आहेत. ऊन-पावसाच्या खेळात द्राक्ष उत्पादकांचे मात्र न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. याचा परिणाम उत्पादनावर तर होणारच आहे पण द्राक्ष तडकण्याच्या भीतीने व्यापाऱ्यांनी थेट द्राक्ष खरेदीच बंद केली आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीपासून सुरु झालेले संकट आता संपल्यावरच मिटणार अशी अवस्था आहे.

दुष्काळात तेरावा

उत्पादनात घट झाल्यावर दर वाढणार हे बाजारपेठेचे सूत्र आहे. पण द्राक्षाच्या बाबतीत यंदा सर्वकाही उलटे होताना दिसत आहे. कारण यंदा उत्पादन घटले असताना हंगाम सुरु होताच द्राक्षाच्या दरात कमालीची घट झाली होती. वाढत्या उन्हाबरोबर द्राक्ष मागणीत वाढ होऊ लागली होती. मात्र, अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे. अजूनही शेकडो एकरावरील द्राक्ष हे बागेतच आहेत. विशेषत: तासगाव तालुक्यात अवकाळीने थैमान घातल्याने बागांमध्ये पाणी साचले होते.

थेट उत्पादनावर परिणाम

ज्या शेतकऱ्यांच्या द्राक्ष तोडणी झाली आहे त्यांच्यासाठी हा पाऊस चांगलाच आहे. पण ज्या बागांमध्ये द्राक्ष अजूनही वेलीवरच आहेत त्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वी बागा जोपासण्यासाठी एकरी हजारो रुपये केवळ औषध फवारणीसाठी खर्ची केले आहेत. आता अंतिम टप्प्यात उत्पन्ना ऐवजी अशी निराशा होत असेल तर आगामी काळात द्राक्ष बागा ठेवल्या जातात की नाही अशी परस्थिती निर्माण होईल.

व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीच थांबवली

बदलत्या वातावरणामुळे द्राक्षांना तडे जाण्याची भीती असते. हेच गेल्या आठ दिवसांपासून सुरु आहे. अगोदर ऊन आणि त्यानंतर अवकाळी यामुळे द्राक्षामध्ये गोडवा उतरण्याऐवजी द्राक्षाला तडे जाण्याचीच अधिकची भीती आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. शिवाय दर कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांचा हा डाव असल्याचाही आरोप काही शेतकरी करीत आहेत. मात्र, बदलत्या वातावरणाचा परिणाम काय असतो याची प्रचिती द्राक्ष उत्पादकांच्या अवस्थेवरुन लक्षात येत आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : ऊसाची फडातच राख, बीडमध्ये हंगामात 500 एकरातील ऊस जळून खाक

निसर्गाचा लहरीपणा त्यात बाजारपेठेतील अस्थिरता, गव्हाची विक्री की साठवणूक, पुन्हा शेतकरी संभ्रमात

Weather Report : अवकाळीचे संकट टळले, आता वाढत्या ऊन्हाचा चटका, मार्चच्या अखेरीस होणार अंगाची लाहीलाही

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.