AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्पादनापुर्वीच हळद पिवळी, साचलेल्या पाण्यामुळे कंदही जमिनीतच सडले

नांदेड जिल्ह्यात हळद हे मुख्य पिक आहे. ऊसाला पर्याय आणि उत्पादनाची हमी यामुळे दरवर्षी हळदीच्या उत्पादनात वाढ ही ठरलेलीच. यंदा जिल्ह्यात तब्बल 25 हजार हेक्टरावर हळदीची लागवड करण्यात आली होती. मात्र, गोदाकाठच्या नदी परिसरात पावसाचे पाणी साचल्याने हा हळद पिवळी पडली आहे तर हळदीचे कंदही जमिनीतच सडून गेले आहेत.

उत्पादनापुर्वीच हळद पिवळी, साचलेल्या पाण्यामुळे कंदही जमिनीतच सडले
शेतामध्ये पाणी साचल्याने हळदीचे नुकसान
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 10:05 AM
Share

नांदेड : नांदेड जिल्ह्यात हळद हे मुख्य पिक आहे. ऊसाला पर्याय आणि उत्पादनाची हमी यामुळे दरवर्षी हळदीच्या उत्पादनात वाढ ही ठरलेलीच. यंदा जिल्ह्यात तब्बल 25 हजार हेक्टरावर हळदीची लागवड करण्यात आली होती. मात्र, गोदाकाठच्या नदी परिसरात पावसाचे पाणी साचल्याने हा हळद पिवळी पडली आहे तर हळदीचे कंदही जमिनीतच सडून गेले आहेत. कोरडीला असलेल्या पिकाचे यामुळे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी उभे पिक वावरातून बाहेर काढत आहे.

पोषक वातावरण आणि कमी पाण्यात हळदीचे ऊत्पन्न पदरी पडते म्हणून वर्षागणिस जिल्ह्यात हळदीचे उत्पादन हे वाढत आहे. गतवर्षी 20 हजार हेक्टरावर लागवड झाली तर यंदा 25 हजार हेक्टरावर लागवड झाली. सर्व काही सुरळीत असताना मध्यंतरी झालेल्या पावसामुळे हळदीचे नुकसान झाले आहे. पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. पुराचे बॅकवॅाटर हे गेल्या चार दिवसांपासून साचून राहिल्याने हळदीची कंदमुळे ही सडली आहेत त्यामुळे मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी वावरातील उभे पिक कापण्यास सुरवात केली आहे.

गतआठवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पाला पूर आला होता. शहरालगत असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु झालब होती. या जलसाठ्याचे नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पातील पाणी नदीत सोडण्यात आले होते. त्यामुळे नदीला पूर आल्याने मुदखेड तालुक्यातील वसंतवाडी, रोहीपिंपळगाव येथील हळद ही पाण्यातच आहे. त्यामुळे त्याची कंदमुळे ही सडत असल्याने याचा उर्वरीत पिकावर परिणाम होऊ नये म्हणून सडलेली हळद ही काढून टाकली जात आहे. Turmeric in Nanded district rotten due to rainwater logging

बागायतीसह खरिपातील पिकाचे नुकसान

पाऊस होऊन गेला तरी गोदावरी नदी काठच्या उपनद्या आणि नाल्याचा पूर यामुळे पाणी साचून राहते. परिणामी साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील हजारो एकरातील पिके ही पाण्यात आहेत. केळी, हळद या बागायती बरोबरच खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांनाही साचलेल्या पाण्याचा फटका बसलेला आहे. विशेष: मुदखेड तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

म्हणून शेतकऱ्यांनी वावरातून हळद बाहेर काढली

यंदा हळदीतून अधिकचे उत्पादन पदरी पडेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. पोषक वातावरणामुळे हे शक्यही होते. मात्र, गतआठवड्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आतापर्यंत शेतकऱ्यांनी एकरी 40 हजार खर्च केले आहेत. आता अधिकचा खर्च करुनही पिक पदरी पडते की नाही याची शंका असल्याने हळद काढून इतर पिक घेण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.

पाणी साचल्याने कंद सडले अन् हळदही पिवळी पडली

पावसाचे तसेच गोदा नदीचे बॅकवॅाटरचे पाणी थेट मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साचलेले आहे. त्यामुळे पहिल्या एक-दोन दिवसांमध्ये हळद ही पिवळी पडली तर अधिकचा काळ पाणी साचून राहिल्याने कंदमुळेही सडली आहेत.

इतर बातम्या :

टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मुलीचा मृत्यू

चक्क पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण, नाशकात खळबळ

मित्राची हत्या करुन खिशातल्या पाचशे रुपयांची दारु आणली, गावभर बोंबलले ‘आज दो लोगो को टपका डाला’

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....