AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘डीएपी’ कृत्रिम टंचाई, नांदेडमध्ये दोन विक्रेत्यांचे परवाने निलंबित, कृषी विभागाची कारवाई

केंद्र सरकारकडून पुरवठा होऊनही स्थानिक पातळीवर 18:46 खताचा तुटवडा भासत होता. शिवाय नांदेड जिल्ह्यात कृत्रिम टंचाई नसल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. त्यानंतर आता अधिकची कमाई करण्याच्या उद्देशाने कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील दोन खतविक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

'डीएपी' कृत्रिम टंचाई, नांदेडमध्ये दोन विक्रेत्यांचे परवाने निलंबित, कृषी विभागाची कारवाई
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 5:08 PM
Share

नांदेड : ऐन रब्बी हंगामाची लगबग सुरु असतानाच गेल्या काही दिवसांपासून राज्यात डीएपी अर्थात 18:46 या खताचा तुटवडा निर्माण झाला होता. दरवर्षी ऐन हंगामातच टंचाई निर्माण होत असते. यावेळी मात्र, केंद्र सरकारकडून पुरवठा होऊनही स्थानिक पातळीवर 18:46 खताचा तुटवडा भासत होता. शिवाय नांदेड जिल्ह्यात कृत्रिम टंचाई नसल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. त्यानंतर आता अधिकची कमाई करण्याच्या उद्देशाने कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील दोन खतविक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

डीएपी खताचा पुरवठा हा जिल्ह्याच्या मागणीनुसार महिन्याकरिता केंद्र सरकारकडून पाठविला जातो. यंदा मागणीपेक्षा अधिकचा साठा हा महाराष्ट्राला देण्यात आलेला आहे. मात्र, उत्तरप्रदेश येथील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या राज्यात अधिकचे खत पाठवले असल्याचा आरोप होत आहे.

डीएपी (18:46) खतालाच अधिकची मागणी

खताच्या माऱ्याशिवाय उत्पादनात वाढ होत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण आजही डीएपी खतालाच अधिकची मागणी आहे. ज्याला अधिकची मागणी त्याचाच पुरवठा कमी असेच गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. पण या खतामुळे उत्पादनात वाढ होते असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. अनेक पर्याय समोर असतानाही डीएपी खतालाच अधिकची मागणी असते.

काल निर्वाळा आज कारवाई

नांदेड जिल्ह्यात कृत्रिम टंचाई नाही तर महिन्याकाठी होणारा पुरवठाच झाला नसल्याचे सीड्‌स फर्टिलायझर व खत विक्रेत्यांनी सांगितले होते. मात्र, अचानक निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे कृषी विकास अधिकारी डॉ.तानाजी चिमनशेट्टे यांनी धर्माबाद तालुका कृषी अधिकारी सुरेंद्र पवार, पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्‍वास अधापुरे यांना खत विक्रेत्यांची तपासणी केली असता यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे धर्माबाद येथील राजेश सीड्‌स अँड फर्टिलायझर आणि महाजन ट्रेडर्स यांचे खत परवाण्याचे निलंबन केले आहे.

18:46 (डीएपी) वर काय पर्याय आहे

शेतकऱ्यांची मानसिकताच झाली आहे की 18:46 या खतानेच पिकाला चांगला उतार येतो. याच मानसिकतेचा फायदा खत विक्रेते घेत आहेत. या खताची कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या दराने त्याची विक्री करतात. मात्र, 18:46 हे खत जरी सहज उपलब्ध नाही झाले तरी 10:26:26, 12:32:16, 15:15, 20:20:00 या खतांचा पर्यांय शेतकऱ्यांकडे आहे. शिवाय मिश्र खतांचा वारर करुनही भरघोस उत्पादन घेता येते. मात्र शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलण्यााची आवश्यकता आहे. अखेर कृषी विद्यापीठाने शिफारस केलेसे रेशिओ खते आहेत त्यामध्ये नायट्रोजन, फॅास्परस यांचे मिश्रण करुनही वापर करता येत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

केळी बागांना ‘बंची टॅाप’ विषाणूचा धोका, योग्य व्यवस्थापन गरजेचे अन्यथा उत्पादनात घट

तारण योजनेने शेतकऱ्यांना ‘तारले’, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा भर सोयाबीनवर

Positive News: शेतकऱ्यांच्या मनात तेच होणार का बाजारात ? सोयाबीनच्या दराबाबत आशादायी चित्र

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.