AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसामुळे आंब्याचे उत्पादन घटले, कोकणाला अवकाळी पावसाने झोडपले

कोकणात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने त्याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून ढगा हवामान पाहायला मिळत आहे. सकाळपासून कोकण किनारपट्टी वरती सुद्धा ढगाळ हवामान आहे.

अवकाळी पावसामुळे आंब्याचे उत्पादन घटले, कोकणाला अवकाळी पावसाने झोडपले
Alphonso mangoes
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 08, 2023 | 3:22 PM
Share

महाराष्ट्र : कोकणातील हापूस (Alphanso Mango) महाग अन् आता तोही कमी प्रमाणात आला आहे. त्यामुळे नागरिकांना यंदा मद्रास, कर्नाटकातील आंब्यावरच अवलंबून राहावं लागत आहे . त्याचेही दर यावर्षी १०० ते १५० रुपये प्रती डझन वाढले आहेत. दरम्यान, वादळी वारे, गारपीट अन् ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. आंबट कैरीची सुद्धा आवक कमी झाली असून सध्या बाजारात कैरी 40 ते ५० रूपाये किलोने विक्री होत आहे. वादळी वाऱ्याने आणि गारपीटने (Unseasonal rain) झाडावरील कच्चे आंबे झडल्याने यावर्षी आवक सुरूच झाली नाही. सुरुवातीला आंब्याच्या झाडाला मोहोर आला अन् ढगाळ वातावरणामुळे मोहोर गळून पडला. त्यामुळे आंबे बाजारात येण्यास उशीर होत आहे. त्यापूर्वीच कलमी आंबे बाजारात दाखल होत असून कोकणातही (kokan mango) हापूस चे उत्पादन कमी झाले आहे.

कोकणात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने त्याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून ढगा हवामान पाहायला मिळत आहे. सकाळपासून कोकण किनारपट्टी वरती सुद्धा ढगाळ हवामान आहे. सध्या दुपारपर्यंत आकाशात काळे ढग दाटून आलेले पाहायला मिळाले. सध्या मळभ असल्याने हवेतील आद्रता देखील वाढली आहे. पावसाची शक्यता वर्तवल्याने अंबा बागायतदार मात्र हवालदिल झाले आहेत. शेवटच्या टप्प्यातील तरी आंबा मिळावा यासाठी आंबा बागायतदारांची धडपड पाहायला मिळते.

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामात कांद्याची लागवड केली जात असते. मात्र नंदुरबार जिल्ह्यात स्वतंत्र कांदा विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत असते. त्यामुळे आता बाजार समितीने निर्णय घेतला आहे. कांदा विक्रीसाठी नवीन बाजारपेठ तयार करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी फक्त कांद्याच्या लिलाव होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याच्या मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी स्वातंत्र्य मार्केट नसल्यामुळे अनेक शेतकरी बाहेरगावी जाऊन कांदा विक्री करत होते. त्यामुळे त्यांना परवडत नव्हतं, मात्र आता नंदुरबार जिल्ह्यातच बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना आपल्या मालाला योग्य भाव मिळणार असल्याने दोन पैसे शेतकऱ्यांचे वाचणार आहेत.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ