AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Crop : पिकांची उगवण होताच कशाचा धोका? वेळीच व्यवस्थापन करा अन् उत्पादनात वाढवा, काय आहे कृषिज्ञांचा सल्ला?

गोगलगायीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नाशकाचा वापर करावा लागणार आहे. याचा वापर करताना शेतकऱ्यांनी सुरक्षतेसाठी हातमोजे घालणे गरजेचे आहे. ज्या भागात शंखी गोगलगायचा अधिकचा प्रादुर्भाव आहे त्या क्षेत्रावर अशा पध्दतीने उपाययोजना केल्यास त्याचा अधिकचा फायदा होणार आहे.

Kharif Crop : पिकांची उगवण होताच कशाचा धोका? वेळीच व्यवस्थापन करा अन् उत्पादनात वाढवा, काय आहे कृषिज्ञांचा सल्ला?
शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव खरीप हंगामातील पिकांवर होत आहे.
| Edited By: | Updated on: Jul 08, 2022 | 1:16 PM
Share

नांदेड : पावसाने ओढ दिल्याने (Kharif Sowing) खरिपातील पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे मराठवाड्यात जूनच्या अखेरीस झालेल्या पेरणी झालेल्या सोयाबीन, कापसाची (Germination of crops) उगवण आता कुठे झाली आहे. मात्र, पावसाचे संकट मिटताच आता पिकांना (Pest disease) कीड रोगराईचा सामना करावा लागत आहे. खरिपातील पिकांसह भाजीपाल्यावर सध्या शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोपअवस्थेतच प्रादुर्भाव वाढत असल्याने पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. योग्य वेळीच उपाययोजना केली तरच पिकांवर त्याचा परिणाम होणार नाही अन्यथा आगोदर पावसामुळे आणि आता किडीच्या प्रादिर्भावमुळे नुकसान होईल अशी स्थिती सध्या मराठवाड्यात पाहवयास मिळत आहे.

असे करा एकात्मिक व्यवस्थापन

पिकांची उगवण होताच किडीचा प्रादुर्भाव झाला तर मात्र वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांध हे तणविरहीत ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे गोगलगाईला थांबण्यासाठी सुरक्षित जागा राहणार नाही. सकाळी किंवा संध्याकाळी ह्या गोगलगायी ह्या साबणाचे किंवा मिठाचे पाणी घेऊन त्यामध्ये मारुन टाकाव्यात. पिकाच्या क्षेत्रात 7 ते 8 मीटरवर वाळलेल्या गवताचे बुचाडे उभा करावेत. जेणेकरुन गोगलगायी त्याच्या आश्रयाला येतील आणि मग त्या अंडी घालण्यास एकत्र आल्यावर त्या नष्ट कराव्या लागणार आहेत. लहान शंखीसाठी मिठाची किंवा कॅल्शिअम क्लोराईडचासुध्दा वापर करता येणार आहे.

सुरक्षतेसाठी प्लॅस्टिक हातमोज्यांचा वापर

गोगलगायीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नाशकाचा वापर करावा लागणार आहे. याचा वापर करताना शेतकऱ्यांनी सुरक्षतेसाठी हातमोजे घालणे गरजेचे आहे. ज्या भागात शंखी गोगलगायचा अधिकचा प्रादुर्भाव आहे त्या क्षेत्रावर अशा पध्दतीने उपाययोजना केल्यास त्याचा अधिकचा फायदा होणार आहे. शिवाय लवकरात लवकर उपाययोजना केल्यास त्याचा प्रादुर्भाव तर कमी होईलच पण पिकांच्या वाढीतील अडथळाही दूर होणार असल्याचा सल्ला परभणी कृषी विद्यापीठातील डॉ. डी.डी. पाटईत यांनी दिला आहे.

फळबागांचे रक्षणासाठी हा आहे पद्धत

मुळात गोगलगायीला झाडावर चढूच द्यायचे नाही. त्यासाठी फळांच्या झाडांच्या खोडास 10 टक्के बोंडपेस्ट करावे लागणार आहे. तर गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड या दाणेदार नाशकाचा वापर करावा लागणार आहे. सोयाबीन व कापसू यासारख्या पिकांसाठी मेटाल्डिहाईड हे दोन किलो प्रति एकरसाठी असे प्रमाण ठेवावे लागणार आहे. ही गोगलगाय पपईची रोपे आणि झेंडूच्या रोपांकडे आककर्षित होतात. त्यामुळे मेटाल्डिहाईडच्या गोळ्या ह्या पपईच्या पानाजवळ ठेवल्या तरी या गोगलगायीचा बंदोबस्त होणार आहे.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....