AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Crop : पिकांची उगवण होताच कशाचा धोका? वेळीच व्यवस्थापन करा अन् उत्पादनात वाढवा, काय आहे कृषिज्ञांचा सल्ला?

गोगलगायीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नाशकाचा वापर करावा लागणार आहे. याचा वापर करताना शेतकऱ्यांनी सुरक्षतेसाठी हातमोजे घालणे गरजेचे आहे. ज्या भागात शंखी गोगलगायचा अधिकचा प्रादुर्भाव आहे त्या क्षेत्रावर अशा पध्दतीने उपाययोजना केल्यास त्याचा अधिकचा फायदा होणार आहे.

Kharif Crop : पिकांची उगवण होताच कशाचा धोका? वेळीच व्यवस्थापन करा अन् उत्पादनात वाढवा, काय आहे कृषिज्ञांचा सल्ला?
शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव खरीप हंगामातील पिकांवर होत आहे.
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 08, 2022 | 1:16 PM
Share

नांदेड : पावसाने ओढ दिल्याने (Kharif Sowing) खरिपातील पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे मराठवाड्यात जूनच्या अखेरीस झालेल्या पेरणी झालेल्या सोयाबीन, कापसाची (Germination of crops) उगवण आता कुठे झाली आहे. मात्र, पावसाचे संकट मिटताच आता पिकांना (Pest disease) कीड रोगराईचा सामना करावा लागत आहे. खरिपातील पिकांसह भाजीपाल्यावर सध्या शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोपअवस्थेतच प्रादुर्भाव वाढत असल्याने पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. योग्य वेळीच उपाययोजना केली तरच पिकांवर त्याचा परिणाम होणार नाही अन्यथा आगोदर पावसामुळे आणि आता किडीच्या प्रादिर्भावमुळे नुकसान होईल अशी स्थिती सध्या मराठवाड्यात पाहवयास मिळत आहे.

असे करा एकात्मिक व्यवस्थापन

पिकांची उगवण होताच किडीचा प्रादुर्भाव झाला तर मात्र वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांध हे तणविरहीत ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे गोगलगाईला थांबण्यासाठी सुरक्षित जागा राहणार नाही. सकाळी किंवा संध्याकाळी ह्या गोगलगायी ह्या साबणाचे किंवा मिठाचे पाणी घेऊन त्यामध्ये मारुन टाकाव्यात. पिकाच्या क्षेत्रात 7 ते 8 मीटरवर वाळलेल्या गवताचे बुचाडे उभा करावेत. जेणेकरुन गोगलगायी त्याच्या आश्रयाला येतील आणि मग त्या अंडी घालण्यास एकत्र आल्यावर त्या नष्ट कराव्या लागणार आहेत. लहान शंखीसाठी मिठाची किंवा कॅल्शिअम क्लोराईडचासुध्दा वापर करता येणार आहे.

सुरक्षतेसाठी प्लॅस्टिक हातमोज्यांचा वापर

गोगलगायीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नाशकाचा वापर करावा लागणार आहे. याचा वापर करताना शेतकऱ्यांनी सुरक्षतेसाठी हातमोजे घालणे गरजेचे आहे. ज्या भागात शंखी गोगलगायचा अधिकचा प्रादुर्भाव आहे त्या क्षेत्रावर अशा पध्दतीने उपाययोजना केल्यास त्याचा अधिकचा फायदा होणार आहे. शिवाय लवकरात लवकर उपाययोजना केल्यास त्याचा प्रादुर्भाव तर कमी होईलच पण पिकांच्या वाढीतील अडथळाही दूर होणार असल्याचा सल्ला परभणी कृषी विद्यापीठातील डॉ. डी.डी. पाटईत यांनी दिला आहे.

फळबागांचे रक्षणासाठी हा आहे पद्धत

मुळात गोगलगायीला झाडावर चढूच द्यायचे नाही. त्यासाठी फळांच्या झाडांच्या खोडास 10 टक्के बोंडपेस्ट करावे लागणार आहे. तर गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड या दाणेदार नाशकाचा वापर करावा लागणार आहे. सोयाबीन व कापसू यासारख्या पिकांसाठी मेटाल्डिहाईड हे दोन किलो प्रति एकरसाठी असे प्रमाण ठेवावे लागणार आहे. ही गोगलगाय पपईची रोपे आणि झेंडूच्या रोपांकडे आककर्षित होतात. त्यामुळे मेटाल्डिहाईडच्या गोळ्या ह्या पपईच्या पानाजवळ ठेवल्या तरी या गोगलगायीचा बंदोबस्त होणार आहे.

Follow Us
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...