AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kokan : जांभूळ पिकल्या झाडाखाली..! अहो, यंदा जांभूळ पिकले नाहीतर सुकले, कशामुळे उत्पादन घटले?

कोकणातील डहाणू परिसरातील काही गावांमध्ये बहाडोलीच्या जांभळाचे उत्पादन घेतले जाते. इतर भागात जशी पिकांची जोपासणा केली जाते तशी येथे जांभळाची. जांभळाच्या विशिष्ट चवीमुळे केवळ मुंबईतच नाहीतर राज्यभर या जांभळाला मागणी असते. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या जांभळांची आवक सुरु होते.

Kokan : जांभूळ पिकल्या झाडाखाली..! अहो, यंदा जांभूळ पिकले नाहीतर सुकले, कशामुळे उत्पादन घटले?
वातावरणातील बदलामुळे कोकणातील जांभळाच्या उत्पदनात घट झाली आहे.
| Updated on: Jun 19, 2022 | 12:35 PM
Share

डहाणू : निसर्गाचा लहरीपणा केवळ (Mango Production) आंबा उत्पादनापर्यंतच मर्यादित राहिला नाही तर त्याची झळ (Jamun Production) जांभळापर्यंत येऊन ठेपली आहे. अवकाळीमुळे सर्वाधिक नुकसान हे फळबागांचे झाले होते तर कडाक्याच्या उन्हाचा परिणाम यंदा बहाडोलीच्या टपोरी जांभळावर झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यच्या तोंडावर ही जांभळ बाजारपेठेत दाखल होत असतात पण यंदा (Climate Change) हवामानातील बदलामुळे कोकणाती तब्बल 90 टक्के उत्पादन घटले आहे. केवळ उत्पादनच घटले असे नाहीतर डहाणू भागातील तीन गावच्या ग्रामस्थांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कारण येथे पिकणाऱ्या बहाडोलीच्या जांभळाला हजार रुपये किलो असा दर मिळतो. पण यंदा मागणी असतानाही घटलेल्या उत्पादनामुळे बाजारपेठेत ही जांभळ दाखलच झाली नाहीत.

बहाडोलीच्या जांभळाला देशभर मागणी

कोकणातील डहाणू परिसरातील काही गावांमध्ये बहाडोलीच्या जांभळाचे उत्पादन घेतले जाते. इतर भागात जशी पिकांची जोपासणा केली जाते तशी येथे जांभळाची. जांभळाच्या विशिष्ट चवीमुळे केवळ मुंबईतच नाहीतर राज्यभर या जांभळाला मागणी असते. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या जांभळांची आवक सुरु होते. शिवाय हंगामाच्या सुरवातीला प्रतिकिलो 8 ते 10 हजार रुपये किलो असा विक्रमी दर मिळतो. यंदा मात्र, 90 टक्के उत्पादन घटल्याने अजून मुंबई मार्केटमध्येच मागणीच्या तुलनेत आवक झालेली नाही.

तीन गावांवर उपासमारीची वेळ

कोकणातील बहाडोली, धुकटन आणि खामलोली या गावच्या शिवारात केवळ जांभळाच्या उत्पादनावर भर दिला जातो. या भागातील 400 शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा 4 हजार जांभळावरच असतो. प्रत्येक झाडामधून 40 ते 50 हजार रुपयांचे उत्पन्न हे ठरलेले असते. यंदा मात्र, अवकाळी पावसाने उत्पादन प्रक्रियेच अडथळा निर्माण झाला तर जांभूळ पोसण्याच्या दरम्यान कडाक्याच्या उन्हामुळे जांभळ अक्षरश: करपली गेली. त्यामुळे 3 ते 4 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. केवळ 10 उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे.

ना भरपाई ना महोत्सव

जांभळाचे झाड जोपासण्यासाठी 15 हजार रुपये खर्च येतो तर यंदा उत्पादनच न मिळाल्याने कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. शिवाय या शेतकऱ्यांना पीक विम्याचाही लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे पण वैभवात भर टाकणारा जांभूळ महोत्सवही यंदा रद्द झाला आहे. जांभळाचा मोहरच करपल्याने महोत्सावासाठीही जांभळे मिळणे अशक्य झाले आहे. जांभळाच्या संवर्धनाकडे कृषी विभागानेही दुर्लक्ष केल्याने ही वेळ आल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

Follow Us
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.