AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati : बाजार समितीमधील शेतीमालाच्या नुकसानीला जबाबदार कोण ? प्रकरण थेट पणन मंत्र्यांपर्यंत..!

सध्या खरीप हंगामाची लगबग सुरु असून आता अमरावती जिल्ह्यातील शेतकरी हे पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. खरिपातील खर्चासाठी शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या सोयाबीन आणि हरभरा विक्रीवर भर दिला आहे. कमी दर असतानाही शेतकऱ्यांनी हे धाडस दाखविले आहे. असे असताना दुष्काळात तेरावा याप्रमाणेच शेतकऱ्यांचा माल हा पावसाच्या पाण्यात वाहून गेला.

Amravati : बाजार समितीमधील शेतीमालाच्या नुकसानीला जबाबदार कोण ? प्रकरण थेट पणन मंत्र्यांपर्यंत..!
अमरावती बाजार समितीमधील शेतीमालाचे पावसामुळे असे नुकसान झाले होते.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 19, 2022 | 2:00 PM
Share

अमरावती : राज्यात पावसाच्या लहरीपणाचे दर्शन घडत असले तरी (Amravati) अमरावतीमध्ये सातत्य राहिले आहे. असे असताना देखील शनिवारी दुपारी झालेल्या पावसामध्ये (Market Committee) बाजार समितीमध्ये दाखल झालेल्या शेतीमालाचे मोठे नुकसान झाले होते. हजारो क्विटल माल पाण्यात अशी स्थिती निर्माण झाली होती. भर दुपारीच मुसळधार पावासामध्ये सोयाबीन, हरभरा, तुर हा वाहत गेल्याचे चित्र होते. (Loss of agricultural goods) शेतीमालाच्या नुकसानीला बाजार समिती प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे. मालाच्या साठवणूकीसाठी साधे शेडही उभारण्यात आलेले नाही. एकदा का शेतीमाल बाजार समितीच्या आवारात आला तर जबाबदारी ही समिती प्रशासनाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पणन मंत्री यांना देखील पत्रव्यवहार कऱण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

खरिपाच्या तोंडावर वाढली होती आवक

सध्या खरीप हंगामाची लगबग सुरु असून आता अमरावती जिल्ह्यातील शेतकरी हे पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. खरिपातील खर्चासाठी शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या सोयाबीन आणि हरभरा विक्रीवर भर दिला आहे. कमी दर असतानाही शेतकऱ्यांनी हे धाडस दाखविले आहे. असे असताना दुष्काळात तेरावा याप्रमाणेच शेतकऱ्यांचा माल हा पावसाच्या पाण्यात वाहून गेला. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने हे संकट ओढावले असले तरी बाजार समिती प्रशासनाने शेतीमालाच्या सुरक्षतेच्या दृष्टीने सोय कऱणे गरजेचे आहे.

नुकसान भरपाईची मागणी पणन मंत्र्याकडे

अमरावती येथील बाजार समितीमध्ये सबंध जिल्हाभरातून शेतीमाल दाखल होत असतो. शिवाय सोयाबीन आणि कापूस या पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आवकही होते. शिवाय गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील पावसामध्ये सातत्य आहे. असे असताना देखील शेतकऱ्यांचा शेतीमाल वाऱ्यावर अन् व्यापाऱ्यांचा सुरक्षित ही स्थिती आहे. त्यामुळे निसर्गामुळे नुकसान झाले असले तरी याला प्रशासन जबाबदार आहे. शासनाने किंवा बाजार समितीच्या प्रशासनाने भरपाई देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना पत्रव्यवहार करण्याच्या सूचना बोंडे यांनी दिल्या आहेत.

कवडीमोल दर त्यात नुकसान

सध्या खरिपात होणारा खर्च भागविण्यासाठा शेतीमालाची आवक सुरु आहे. पण सोयाबीनला 6 हजार 400 तर हरभऱ्याला 4 हजार 500 असा दर आहे. मात्र, शेतकऱ्यांची आर्थिक परस्थिती ही हालाकिची असल्याने शेतीमालाची विक्री करुन खरीप हंगामाची तयारी केली जात आहे. असे असतानाच झालेले नुकसान म्हणजे दुष्काळात तेरावा अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासन नुकसान भरपाई देतंय की बाजार समिती प्रशासन हे पहावे लागणार आहे.

फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.