आनंदाचा शिधा देण्याबाबतच्या घोषणेवरूनही त्यांनी राज्य सरकारची भूमिका सांगितली. राज्य सरकारने आनंदाच्या शिधा देण्याची घोषणा केली आहे मात्र अनेक जिल्ह्यात आधुनिक आनंदाच्या शिधा पोहोचला नाही.
नंदुरबार जिल्ह्यात जवळपास १ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज आहे. नंदुरबार तालुक्याचा पश्चिम पट्टा आणि त्याला लागून असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते.
नंदुरबार जिल्ह्यात पाचव्या दिवशी अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, मका, ज्वारी आणि कांदा पिकांचे नुकसान झाल्याने आता नुकसान भरपाई मिळणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
शासनाने मदतीची घोषणा केली असली तरी शासनाला नुकसानीचे पंचनामे करून आकडेवारी कोण देणार असा देखील सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
शेतकरी लावलेल्या उभ्या पिकावर अवकाळी पावसाचा मारा झाल्याने आता प्रचंड नुकसान झाले आहे. ज्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याची विदारक परिस्थिती दाखवणारे हे काही फोटो...
शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहेत तर दुसरीकडे आसमानी संकटापासून शेतकऱ्यांची सुटका होत नाही. त्यामुळे आता शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात आहे .
एकीकडे राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत, मात्र त्यातून आताच्या घडीला शेतकऱ्यांना काय मिळणार असा सवाल सरकारला केला जात आहे.
अवकाळीमुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबत पिकांसोबतच केळी आणि पपई यांचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.
बाजार भाव नसल्याने डांगर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. डांगर आणि टरबूजला प्रति किलो तीन ते पाच रुपयाचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
दुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा आणि नंदुरबार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पन्न घेतले जात असते. मात्र जिल्ह्यात बाजारपेठ नसल्याने दलाल आणि व्यापारी मनमानी भावाने शेतकऱ्यांकडून केळी खरेदी करत आहेत.