AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळीनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा घास हिरावून घेतला; मका,तूर, ज्वारीसह सगळं पीक मातीत…

अवकाळीमुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबत पिकांसोबतच केळी आणि पपई यांचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.

अवकाळीनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा घास हिरावून घेतला; मका,तूर, ज्वारीसह सगळं पीक मातीत...
Rain
| Edited By: | Updated on: Mar 13, 2023 | 9:49 PM
Share

नंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. रब्बी हंगामामध्येच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांकडे सरकारनेही दुर्लक्ष केल्याने आता शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज सायंकाळी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.  सायंकाळची वेळी वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह नवापूर तालुक्यातील खांडबारा आणि नंदुरबार तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसाला सुरुवात होताच शेतकऱ्यांची यावेळी प्रचंड धावपळ उडाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि नवापूर तालुक्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसापूर्वीही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला होता.

त्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे.

आज पुन्हा दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाल्याने नंदूरबार, नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Nandurbar

नंदूरबार, नवापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची पीकंही काढणीला आली असून शेतमालही शेतात पडून आहे. यामध्ये मका , तूर , गहू , कापूस , ज्वारी या पिकांच्या समावेश असून अवकाळीमुळे बाजारभाव कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अवकाळीमुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबत पिकांसोबतच केळी आणि पपई यांचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

तर अवकाळी पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील विद्युत पुरवठादेखील काही भागात खंडित करण्यात आल्याची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे मायबाप सरकारने कागदी घोडे न नाचवता बळीराजाला सरसकट मदत करावी अशी मागणी आता शेतकरीवर्गातून केली जात आहे.

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.