‘या’ जिल्ह्यात पुन्हा अवकाळी; बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार

शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहेत तर दुसरीकडे आसमानी संकटापासून शेतकऱ्यांची सुटका होत नाही. त्यामुळे आता शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात आहे .

'या' जिल्ह्यात पुन्हा अवकाळी; बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 6:25 PM

नंदूरबार : महाराष्ट्रातील शेतकरीवर्ग अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. कधी पडलेल्या बाजारभावामुळे शेतमाल रस्त्यात फेकून द्यावा लागतो नाही तर कधी त्याच पिकावर नांगर फिरवावा लागत आहे. एकीकडे बाजारभावामुळे शेतकरी अडचणीत सापडला असतानाच दुसरीकडे मात्र निसर्गानेही शेतकऱ्यांना हैराण केले आहे. अशीच परिस्थिती नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक मातीत जाण्याची वेळ बळीराजावर आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची उभी पिकं आता वाया जाण्याची वेळ आली आहे. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने नंदुरबार,नवापूर,तळोदा,धडगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेले मका, गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर फळबागातील पपया आणि केळीच्या बागांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसाने आज तिसऱ्यांदा हजेरी लावल्याने या पावसात झालेल्या नुकसानीनंतर आता पंचनामा होणार की नाही याची चिंताही शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

कारण शासकीय कर्मचारी संपावर गेल्यामुळे आता पंचनाम्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवकाळीनंतर जर पंचनामा झाला नाही तर शेतकऱ्यांना मदत मिळणार कशी असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहेत तर दुसरीकडे आसमानी संकटापासून शेतकऱ्यांची सुटका होत नाही. त्यामुळे आता सामोरे जात आहे .

त्यामुळे शेतकऱ्यासमोरील आव्हान दिवसात दिवस वाढत आहे त्यात शेतकऱ्याने मदत केली तर काहीसा दिलासा मिळेल अशीच अपेक्षा आता शेतकरी करत आहे. त्यामुळे अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.