Car : पाण्यात कार फसल्यावर चुकूनही ‘या’ चुका करुन नका… इंजिनपासून गिअर बॉक्सपर्यत होईल नुकसान

जास्त पाउस झाल्यावर रस्त्यालाच नद्यांचे स्वरुप येत असते. अशात अनेकदा कार ड्रायव्हिंग करायला समस्या निर्माण होत असते.

Car : पाण्यात कार फसल्यावर चुकूनही ‘या’ चुका करुन नका... इंजिनपासून गिअर बॉक्सपर्यत होईल नुकसान
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 11:41 AM

मुंबई : उन्हाळा (Summer) संपण्यात जमा आहे. सर्वांनाच पावसाळ्याचे वेध लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये मान्सून केरळात दाखल होणार आहे. मान्सून आल्याने नागरिकांना गर्मीपासून काही प्रमाणात आराम मिळत असला तरी अनेक ठिकाणी पूर, अतिवृष्टीमुळे (Heavy rain) नागरिकांची दाणादाण उडत असते. अनेक वेळा नालेसफाई नीट झालेली नसल्याने मुंबई, पुणेसारख्या मेट्रो सिटीमध्ये रस्त्यावरच पाणी साचत असते. जास्त पाउस झाल्यावर रस्त्यालाच नद्यांचे स्वरुप येत असते. अशात अनेकदा कार ड्रायव्हिंग (Car driving) करायला समस्या निर्माण होत असते. जर अशात तुमच्या चारचाकीला संपूर्णपणे पाण्याने वेढल्यास तुमच्यासमोर अनेक समस्या निर्माण होत असतत. यातून वाचण्यासाठी व कारचे नुकसान टाळण्यासाठी आम्ही काही टीप्स सांगणार आहोत.

पाण्याने वेढलेला रस्ता टाळा

काही रस्त्यांवर पावसाळ्यात नेहमीच पाणी तुंबत असते. अशा वेळी तुम्ही अशा रस्त्यांवर पाणी साचलेले असताना त्या ठिकाणाहून जाणे टाळले पाहिजे. अनेक एसयुव्ही कार निर्मात्या कंपन्यांचा दावा आहे की, त्यांची कार ठराविक पाणी पातळी असलेल्या रस्त्यावरुनही सहज जाउ शकते. परंतु खरे तर अर्धाफूटापेक्षा जास्त पाणी असलेल्या ठिकाणाहून कुठल्याही कारला जाणे सहज शक्य नसते. अशा वेळी तुम्ही रस्त्याचा आढावा घेउनच त्यावरुन जावे.

हे सुद्धा वाचा

सलग प्रवास सुरु ठेवा

जर तुम्हाला पाण्याने वेढलेल्या रस्त्यावरुन जावेच लागत असेल तर, पाण्यात कधीही गाडी थांबवू नका, रस्त्यावर पाणी असले तरी कार चालवत रहा. कार चालवताना अचानक स्पीड वाढवणे, कमी करणे यापासून वाचून रहा. कार पाण्यात एका जागी थांबवू नका, अशाने कारच्या इंटेक एक्जहॉस्टमध्ये पाणी जाण्याचा धोका वाढू शकतो.

कार बंद झाल्यावर रिस्टार्ट करु नका

पाण्यात जर कार अचानक बंद झाली तर तीला पुन्हा रिस्टार्ट करु नका. पाण्यामुळे इंजिनच्या कनेक्टिंग रोडवर दबाव पडतो. तसेच इंटेक किंवा एक्जहॉस्टमध्ये पाणी भरले गेल्यानेही कार मध्येच बंद पडू शकते. जर अशात तुम्ही पुन्हा रिस्टार्ट केल्यास इंजिनचे नुकसान होउ शकते.

कारमध्ये अडकल्यावर घाबरु नका

पुरामुळे जर तुम्ही कारमध्ये फसले असाल तर, पाण्याच्या दबावामुळे कारचे दरवाजे उघडत नाहीत. अशा वेळी न घाबरता मन शांत ठेवून दोन्ही पायांच्या मदतीने कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करा. या शिवाय कारमधील कुठल्याही कडक वस्तूने दरवाजाच्या खिडक्या तोडण्याचा प्रयत्न करा.

ब्रेक दाबून पाणी काढा बाहेर

पाण्याने वेढलेल्या रस्त्यात जर तुमची कार अडकली असेल तर कारच्या विविध भागात पाणी शिरण्याचा धोका असतो. अशा वेळी तुम्ही ब्रेकचा चांगल्या पध्दतीने वापर करुन शकतात. ब्रेक दाबून त्या ठिकाणी जमा झालेले पाणी तुम्ही गाडीच्या बाहेर काढू शकतात. पाणी जर त्याच ठिकाणी साचून राहिले तर, नंतर ब्रेक लावायला अडचणी येउ शकतात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.