‘इलेक्ट्रिक टू-व्हीलर’ ला आगीच्या घटनांबाबत शासन गंभीर; निष्काळजी कंपन्यांवर होणार कारवाई….केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे ‘ट्विट’ द्वारे दिली माहिती

इलेक्ट्रिक टू-व्हीलरला आग लागण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता, चूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध शासन गंभीर असून, या कंपन्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश काढण्यात येणार आहे. तज्ज्ञ समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार अशा प्रकरणांमध्ये आवश्यक ते आदेश जारी करेल, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली.

‘इलेक्ट्रिक टू-व्हीलर’ ला आगीच्या घटनांबाबत शासन गंभीर; निष्काळजी कंपन्यांवर होणार कारवाई....केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे ‘ट्विट’ द्वारे दिली माहिती
वाढत्या ऊस क्षेत्रावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे.Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 12:33 AM

इलेक्ट्रिक टू-व्हीलर (ई व्हेईकल) मधील आगीच्या वाढत्या घटना (Increasing incidence of fires) लक्षात घेता, सरकार संबधित, कंपन्यांविरुद्ध आवश्यक आदेश जारी करणार आहे. अशा प्रकरणांमध्ये तज्ञ समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार आवश्यक ते पाऊल उचलेल, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले. गडकरींनी ट्विटद्वारे सांगितले की, गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकींशी (With electric bikes) संबंधित अनेक अपघात समोर आले आहेत. गडकरी म्हणाले की, या घटनांची चौकशी करण्यासाठी आणि उपाययोजना करून, शिफारस करण्यासाठी त्यांनी एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. अहवालाच्या आधारे ते निष्काळजी कंपन्यांवर आवश्यक आदेश जारी करतील. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की ते लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे जारी करतील. कोणत्याही कंपनीने आपल्या कार्यपद्धतीत निष्काळजीपणा (Negligence) दाखविल्यास त्याला मोठा दंड ठोठावला जाईल आणि सर्व सदोष वाहने परत घेण्याचे आदेशही देण्यात येतील. (Government will take action against negligent companies regarding fire incidents of electric two wheeler Information given by Union Minister Nitin Gadkari through tweet)

गडकरींनी ट्विट करून दिली माहिती

गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकींशी संबंधित अनेक अपघात समोर आले आहेत. त्यांनी ट्विटर हँडलवर लिहिले की, काही लोकांना आपला जीव गमवावा लागला हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि या घटनांमध्ये काही लोक जखमी झाले आहेत. यादरम्यान कंपन्या सर्व सदोष वाहनांच्या बैच तात्काळ परत मागवण्याची कारवाई करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील त्यांचे सरकार प्रत्येक प्रवाशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी ट्विटमधून जाहीर केले आहे.

अहमदाबादमध्ये पहिले चार्जिंग स्‍टेशन सुरू

अदानी टोटल गॅस लिमिटेडने अहमदाबादमध्‍ये पहिले इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्‍टेशन सुरू करून इलेक्ट्रिक मोबिलिटीच्‍या पायाभूत सुविधा क्षेत्रात प्रवेश केला आहे. कंपनी अदानी समूह आणि फ्रेंच ऊर्जा कंपनी Total Energies SE यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. अदानी टोटलने एका निवेदनात म्हटले आहे की, हे चार्जिंग स्टेशन अहमदाबादच्या मणिनगर येथील ATGL च्या CNG स्टेशनवर सुरू करण्यात आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे ईव्ही चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिक वाहनांच्या मालकांना सर्वोत्तम-इन-क्लास चार्जिंग सुविधेसह आणि सोयीस्कर पद्धतीने डिजिटल प्लॅटफॉर्म वापरण्यास सक्षम करेल. (Government will take action against negligent companies regarding fire incidents of electric two wheeler Information given by Union Minister Nitin Gadkari through tweet)

इतर बातम्या

Apple MagSafe Charger : Apple ने आणला एक नवीन ‘बॅटरी पॅक’, वायरलेस पद्धतीने, डिवाइस होईल काही मिनीटांतच चार्ज

Gaming Smartphones : वीस हजाराच्या आत सर्वोत्कृष्ट गेमिंग फोन; Redmi ते Poco पर्यंत, स्मार्टफोन कूलिंग टेक्नॉलॉजीसह अनेक पर्याय उपलब्ध !

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.