AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील 10 आयकॉनिक एक्स्प्रेस-वे, ज्यांनी इंधन आणि प्रवासाच्या वेळेची होते मोठी बचत

देशात अनेक राज्यातून एक्सप्रेस वे जात आहेत. या एक्सप्रेस वे मुळे प्रवासांचा वेळ कमी झाला आहे. अनेक एक्स्रेसवेमध्ये भारतीय वायू दलांसाठी आपात्कालिन स्थितीत विमानांना उतरण्यासाठी धावपट्टी उभारण्यात आल्या आहेत. अनेक एक्स्रेस-वेना बांधताना पर्यावरणाचा विचार केलेला असून प्राण्यांच्या वहिवाटीसाठी देखील रस्ता तयार करण्यात आला आहे.

भारतातील 10 आयकॉनिक एक्स्प्रेस-वे, ज्यांनी इंधन आणि प्रवासाच्या वेळेची होते मोठी बचत
Express way in india
| Updated on: Jun 11, 2026 | 3:48 PM
Share

1. दिल्ली ते डेहराडून एक्स्प्रेस ( Delhi Dehradun Expressway ) –

दिल्ली ते डेहराडून एक्स्प्रेस उत्तर भारतातील महत्वाचा नव्याने विकसित केलेला एक्सप्रेस-वे आहे. या एक्सप्रेस- वे मुळे दिल्ली ते डेहराडून हे सहा तासांचे अंतर २.५ ते ३ तासात कापता येते. या एक्स्प्रेसवेचे बांधकाम करताना त्यावर वाईल्डलाईफ एलिवेटेड कॉरिडॉर आणि ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर वापरल्याने पर्यावरणाची कमीत कमी नुकसान झाले आहे.

2. गंगा एक्स्रेस-वे ( Ganga Expressway) –

नुकताच उद्घाटन झालेल्या हा एक्स्रेसवे भारतातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस-वे पैकी एक आहे. हा एक्सप्रेस-वे मेरठ ते प्रयागराज असा संपूर्ण उत्तर प्रदेशातून गेलेला आहे. या एक्स्रेसवे च्या निर्मितीमुळे १२ तासांचा प्रवास आता ६ ते ७ तासांत करता येत आहे. या गंगा एक्स्प्रेस वे वर आपात्कालिन स्थितीत विमान उतरवरण्यासाठी कायमस्वरुपी धावपट्टी तयार केली आहे.

3. यमूना एक्स्रेस-वे ( Yamuna Expressway) –

ग्रेटर नोएडा ते आग्रा असा जोडणारा हा एक्स्रेस -वे प्रचंड प्रसिद्ध झाला आहे. या एक्स्रेस-वे मुळे दिल्ली ते आग्रा हे ४ ते ५ तासांचे अंतर आता २ ते २.५ तासांवर आले आहे.या एक्सप्रेस-वे ची स्मूद सरफेस आणि वाईड लेन्समुळे ड्रायव्हींग आरामात आणि जलद होते. प्रवाशांना या एक्स्रेसवरुन सुर्योदय आणि सुर्यास्ताचे सौदर्य देखील पाहाता येते.

4. मुंबई ते पुणे एक्स्रेस-वे ( Mumbai Pune Expressway) –

हा भारताचा पहिला सहा पदरी काँक्रीट एक्सप्रेसवे असून पश्चिम भारतातील हा एक्स्रेसवे एक महत्वाचा एक्स्रेसवे आहे.यामुळे मुंबई ते पुणे हे ३.५ ते ४ तासांचे अंतर आता सुमारे २ ते २.५ तासांवर आले आहे. हा प्रवास वेस्टर्न घाटाचे सौदर्य दाखवतो. पश्चिम घाट, सह्याद्रीचे डोंगर आणि दऱ्या तसेच बोगदे आणि पावसाळ्यात येथे फेसाळते धबधबे पहायला मिळतात.

5. आग्रा ते लखनऊ (Agra Lucknow Expressway) –

हा एक्सप्रेस वे या दोन शहरातील सीमलेस कनेक्टिव्हीटी आणि त्याच्या उत्कृष्ठ बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. या एक्स्रेसवे मुळे दोन शहरातील ६ ते ७ तासांचे अंतर साडेतीन ते ४ तासांवर आले आहे. प्रवाशांना कमी त्रास आणि आरामात वाहतूक करता येते. या एक्सप्रेसवेवर आपात्कालनिन स्थितीत विमान लँड करण्यासाठी धावपट्टी उभारण्यात आली आहे.

6. पूर्वाचल एक्सप्रेस-वे ( Purvanchal Expressway ) –

या पूर्वाचल एक्स्प्रेसवे संपूर्ण उत्तर प्रदेशातील सौदर्य दाखवणारा एक्सप्रेस आहे. यामुळे लखनऊ ते गाझीपूर हे ६ ते ७ तासांचे अंतर आता साडेतीन ते ४ तासांवर आले आहे.या एक्स्रेस वे वर देखील इमर्जन्सीसाठी विमाने उतरवण्यासाठी धावपट्टी तयार करण्यात आली आहे.

7. मुंबई नागपूर एक्सप्रेस वे ( Mumbai Nagpur Expressway ) –

समृद्धी महामार्ग नावाने ओळखला जाणारा हा भारताची सर्वात महत्वाकांक्षी आणि अत्याधुनिक एक्स्रेस-वे आहे. मुंबई ते नागपूर हे १६ तासांचे अंतर या मार्गामुळे जवळपास ८ तासांवर आले आहे. हा मार्ग शेतजमीन, जंगले आणि छोट्या शहरातून जातो. लांबपल्ल्याच्या या मार्गावर अनेक सोयी सुविधा केल्या आहेत.

8. दिल्ली ते मेरठ एक्स्रेस-वे ( Delhi Meerut Expressway) –

राजधानी दिल्ली ते मेरठ हे अडीच चे ३ तासांचे अंतर या मार्गाने ४५ मिनिटे ते एक तासांवर आले आहे. या मार्गामुळे स्वच्छ आणि नियोजित ड्रायव्हींगचा अनुभव मिळतो. या लहान मार्गावरील प्रवास या मार्गामुळे सुखदायक केलेला आहे.

9. द्वारका एक्सप्रेस वे ( Dwarka Expressway) –

दिल्ली एनसीआर, द्वारका एक्स्रेसवे मुळे दिल्ली आणि गुरुग्राम दरम्यानचा प्रवास सोपा झाला आहे. पिक ट्रॅफीकमध्ये दीड तासांचा प्रवास यामुळे २० ते ३० मिनिटांत संपतो. नागरी भागातून जाणारा हा मार्गा स्मूथ आणि ईजी ड्रायव्हींगचा अनुभव देतो.

10. दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वे ( Delhi Mumbai Expressway ) –

या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम टप्प्या टप्प्याने होत आहे. या मार्गामुळे २४ तासांचे अंतर १२ ते १३ तासात कापता येणार आहे. प्रवाशांना येथे जागतिक दर्जाच्या सेवा आणि सुविधांचा अनुभव घेता येणार आहे.

Follow Us
घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule | घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा
Chandrashekhar Bawankule | कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा; नेमका काय फायदा होणार?
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या शिफारस पत्रात नेमकं काय?
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या अंतिम चर्चेत नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं?
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा तर, आणखी नेते सोडणार पक्ष?
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता