AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात वाईट आणि चांगले ड्रायव्हर असलेल्या देशांची यादी, भारतात आघाडीचं शहर कोणतं?

जगात सर्वात वाईट ड्रायव्हर या देशात, भारतात या शहरात वाईट ड्रायव्हर, मुंबईचं स्थान कितवं? यादीच पाहा, चांगले वाईट ड्रायव्हरमध्ये देश आणि शहरांची यादी लावताना कोणते निकष लावले आहेत, आणि ही यादी का बनवण्यात आली आहे, हे देखील रंजक असलं तरी विषय मात्र गंभीरच, पाहा

सर्वात वाईट आणि चांगले ड्रायव्हर असलेल्या देशांची यादी, भारतात आघाडीचं शहर कोणतं?
| Updated on: Feb 21, 2023 | 5:59 PM
Share

मुंबई : भारतामध्ये आता कुठे चांगले रस्ते होताना दिसत आहेत. चार पदरी एक्सप्रेस वे आणि त्याच्यासोबतच सर्व्हिस रोडही तयार केले जात आहेत. रस्ते विकास खातं देशामध्ये आता आणखी नवीन रोड करण्यासाठी योजना आखत आहेत. मात्र याआधी भारतात रस्त्यांचा विकास म्हणावा असा झाला नव्हता. मात्र आता जरी मोठमोठे रोड बनत असले तरी अपघातांचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. पण तुम्हाला माहित आहे का? जगात सर्वात वाईट चालक कोणत्या देशात आहेत? यामध्ये भारताचा कितवा नंबर आहे. एका इन्शुरन्स कंपनीने एक सर्व्हे केला आहे, त्यामध्ये त्यांनी जगातील सर्वात वाईट चालक असणाऱ्या देशाबद्दल माहिती दिली आहे.

इन्शुरन्स कंपनीने हा अभ्यास करताना, वाहतूक जागरुकता, रस्ते वाहतूकी दरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी आणि इतर समस्या विचारात घेतल्या आहेत. इतकंच नाहीतर चालकांच्या रक्तातील अल्कहोलचे प्रमाण, रस्त्यांची अवस्था, सोशल मीडियावर सरकारकडून रस्त्यांबाबत देण्यात आलेली माहिती आणि देशामध्ये वर्षात अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येवरून हा सर्वे करण्यात आला आहे.

अभ्यासानुसार एक यादी तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये जगातील सर्वात सुरक्षित चालक असणारा देश हा जपान असल्याचं सांगितलं गेलं आहे. वरील सर्व गोष्टी लक्षात घेत जपानचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सुरक्षित चालकच नाहीतर पादचाऱ्यांसाठीही जपान देश फार सुरक्षित आहे. सर्वात सुरक्षित चालक असलेल्या देशामध्ये  10 युरोपीय देशांचा समावेश आहे.

याच यादीनुसार थायलंडमध्ये सर्वात वाईट चालक आहेत. थायलंडमध्ये जगातील सर्वात वाईट वाहतूक परिस्थिती आहे. सर्वात वाईट चालकांच्या यादीत पेरू देशाचा दुसरा तर लेबनॉनचा तिसरा क्रमांक आहे. भारत चौथ्या क्रमांकावर आहे. जपानच्या तुलनेत भारताला ४.५७ गुणांच्या तुलनेत केवळ २.३४ गुण मिळाले आहेत.

दरम्यान, भारतात सर्वाधिक अपघात होणाऱ्या शहरांमध्ये नवी दिल्ली अग्रस्थानी आहे. त्यानंतर मुंबई, बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबाद या शहराचा क्रमांक लागतो. नवी दिल्ली अपघाताचं प्रमाण 20.3 टक्के, मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असून अपघाताचं प्रमाण 18.8 टक्के आहे. दुसरीकडे, बंगळुरुत सर्वाधिक ट्राफिक होतं. बंगळुरू हे वाहतुकीच्या यादीत सर्वात धीमं शहर आहे. या शहरात 10 किमीसाठी अर्धा तास मोजावा लागतो. कर्नाटकातील बंगळुरु या शहराच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद झाली आहे. जागतिक स्तरावर लंडन पहिल्या क्रमांकावर तर बंगळुरू दुसऱ्या क्रमांकाचं वाहतूक कोंडी असलेलं शहर आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.