AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budjet 2024 : दक्षिण भारताला स्वतंत्र देश करा, का आणि कुणी केली मागणी? अर्थसंकल्पाचा संबंध काय?

कर्नाटकला केंद्राकडून पुरेसा निधी मिळत नाही असा दावा करतानाच दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करण्याशिवाय पर्याय नाही अशी मागणी करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला उत्तर देताना ही मागणी करण्यात आली.

Budjet 2024 : दक्षिण भारताला स्वतंत्र देश करा, का आणि कुणी केली मागणी? अर्थसंकल्पाचा संबंध काय?
NIRMALA SITARAMNImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Feb 01, 2024 | 10:44 PM
Share

नवी दिल्ली | 1 फेब्रुवारी 2024 : कर्नाटकला केंद्राकडून पुरेसा निधी मिळत नाही. त्यामुळे दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करण्याशिवाय पर्याय नाही असे सांगत संसदेत एका खासदाराने वेगळा वाद निर्माण केला आहे. अर्थसंकल्पाबाबत दक्षिण भारतावर अन्याय होत आहे. जो पैसा दक्षिण भारतात पोहोचायला हवा होता. तो वळवून उत्तर भारतात वितरित केला जात आहे असा आरोपही या खासदाराने केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला उत्तर देताना कॉंग्रेस खासदार डीके सुरेश यांनी हा आरोप केला आहे.

हिंदी पट्टय़ाने दक्षिण भारतावर लादलेल्या अटींमुळे वेगळ्या देशाची मागणी करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करण्याशिवाय पर्याय नाही. कर्नाटकला केंद्राकडून पुरेसा निधी मिळत नाही, असा आरोप काँग्रेस खासदार डीके सुरेश यांनी केला.

खासदार डीके सुरेश यांच्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी कॉंग्रेसवरच टीका केली. काँग्रेस पक्षाचा इतिहास ‘फोडा आणि राज्य करा’ असा राहिला आहे. पण, त्यांचे खासदार डीके सुरेश पुन्हा तीच खेळी खेळत आहेत. त्यांना देशाचे उत्तर आणि दक्षिण असे विभाजन करायचे आहे अशी टीका केलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये कर्नाटकला देण्यात आलेल्या कराचा वाटा वाढला आहे. एकीकडे त्यांचे नेते राहुल गांधी त्यांच्या ‘जोडो’ यात्रेद्वारे देशाला ‘एकत्र’ करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे देश तोडण्यासाठी वाकलेला खासदार आपल्याकडे आहे. ‘फूट पाडा आणि राज्य करा’ हा काँग्रेसचा विचार आहे, असे खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले.

वसाहतवाद्यांनी स्वीकारलेल्या परिस्थितीपेक्षा ही वाईट विचारसरणी आहे. कन्नड जनता असे कधीही होऊ देणार नाही. लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ आणि काँग्रेसमुक्त भारताची मोहीम यशस्वी होईल याची काळजी घेऊ, असा टोलाही सूर्या यांनी लगावला.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.