AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budjet 2024 : दक्षिण भारताला स्वतंत्र देश करा, का आणि कुणी केली मागणी? अर्थसंकल्पाचा संबंध काय?

कर्नाटकला केंद्राकडून पुरेसा निधी मिळत नाही असा दावा करतानाच दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करण्याशिवाय पर्याय नाही अशी मागणी करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला उत्तर देताना ही मागणी करण्यात आली.

Budjet 2024 : दक्षिण भारताला स्वतंत्र देश करा, का आणि कुणी केली मागणी? अर्थसंकल्पाचा संबंध काय?
NIRMALA SITARAMNImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Feb 01, 2024 | 10:44 PM
Share

नवी दिल्ली | 1 फेब्रुवारी 2024 : कर्नाटकला केंद्राकडून पुरेसा निधी मिळत नाही. त्यामुळे दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करण्याशिवाय पर्याय नाही असे सांगत संसदेत एका खासदाराने वेगळा वाद निर्माण केला आहे. अर्थसंकल्पाबाबत दक्षिण भारतावर अन्याय होत आहे. जो पैसा दक्षिण भारतात पोहोचायला हवा होता. तो वळवून उत्तर भारतात वितरित केला जात आहे असा आरोपही या खासदाराने केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला उत्तर देताना कॉंग्रेस खासदार डीके सुरेश यांनी हा आरोप केला आहे.

हिंदी पट्टय़ाने दक्षिण भारतावर लादलेल्या अटींमुळे वेगळ्या देशाची मागणी करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करण्याशिवाय पर्याय नाही. कर्नाटकला केंद्राकडून पुरेसा निधी मिळत नाही, असा आरोप काँग्रेस खासदार डीके सुरेश यांनी केला.

खासदार डीके सुरेश यांच्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी कॉंग्रेसवरच टीका केली. काँग्रेस पक्षाचा इतिहास ‘फोडा आणि राज्य करा’ असा राहिला आहे. पण, त्यांचे खासदार डीके सुरेश पुन्हा तीच खेळी खेळत आहेत. त्यांना देशाचे उत्तर आणि दक्षिण असे विभाजन करायचे आहे अशी टीका केलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये कर्नाटकला देण्यात आलेल्या कराचा वाटा वाढला आहे. एकीकडे त्यांचे नेते राहुल गांधी त्यांच्या ‘जोडो’ यात्रेद्वारे देशाला ‘एकत्र’ करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे देश तोडण्यासाठी वाकलेला खासदार आपल्याकडे आहे. ‘फूट पाडा आणि राज्य करा’ हा काँग्रेसचा विचार आहे, असे खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले.

वसाहतवाद्यांनी स्वीकारलेल्या परिस्थितीपेक्षा ही वाईट विचारसरणी आहे. कन्नड जनता असे कधीही होऊ देणार नाही. लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ आणि काँग्रेसमुक्त भारताची मोहीम यशस्वी होईल याची काळजी घेऊ, असा टोलाही सूर्या यांनी लगावला.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण