AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय अर्थसंकल्पाकडून विदर्भाला नेमक्या अपेक्षा काय?; विदर्भातील शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ येणार का?

केंद्र सरकारनं विदर्भाला झुकते माप देणे अपेक्षित आहे. तेलबीया आयात करावं लागते. तेलबीयांसाठी सरकारने अनुदान दिल्यास तेलबीया आयात कराव्या लागणार नाही, अशी अपेक्षा आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाकडून विदर्भाला नेमक्या अपेक्षा काय?; विदर्भातील शेतकऱ्यांना 'अच्छे दिन' येणार का?
धानाची शेती
| Updated on: Jan 31, 2023 | 5:23 PM
Share

नागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या उद्या, १ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारचं हे पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. कारण २०२४ ला लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील. अर्थसंकल्पाचा परिणाम हा शेतीवर मोठ्या प्रमाणात होत असतो. विदर्भात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होईल, अशा काही घोषणांची वैदर्भीय जनतेला आस आहे. अतिवृष्टीमुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भातील सोयाबीन, कापूस या पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची अपेक्षा आहे.

विदर्भात १६ लाख हेक्टर क्षेत्र कापसाचं आहे. सोयाबीनचंही जवळपास येवढचं क्षेत्र आहे. २५ ते ३० टक्के घट अपेक्षित आहे. कापसाचे भावही गडगडले. आपण कापूस, सोयाबीन आयात करतो. यामुळं आपल्या कापूस,सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही.

खर्चावर आधारित भाव मिळावा

विदर्भात ७ लाख हेक्टर क्षेत्र धानाचं आहे. धानाच्या बाबतीत सरकारनं खर्चावर आधारित भाव देणं अपेक्षित आहे. खर्चावर आधारित भाव शेतकऱ्यांना मिळावा. असं केल्यास खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असं कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शरदराव निंबाळकर म्हणाले.

संत्रा उत्पादकांचं असं झालं नुकसान

संत्रा यावर्षी कमी आला. बांग्लादेशानं ६० रुपये किलोवर आयात शुल्क लावलं. त्यामुळं तिथं संत्रा गेला नाही. २२५ टन संत्रा निर्यात केला जात असे. आयात शुल्कामुळं २५ ट्रकही माल बांग्लादेशात गेला नाही. संत्रा उत्पादकांचंही नुकसान झालं आहे.

विदर्भाला झुकते माप देणे अपेक्षित

केंद्र सरकारनं विदर्भाला झुकते माप देणे अपेक्षित आहे. तेलबीया आयात करावं लागते. तेलबीयांसाठी सरकारने अनुदान दिल्यास तेलबीया आयात कराव्या लागणार नाही, अशी अपेक्षा आहे.

सरकारने शेतकऱ्यांना देणी द्यावीत. अशी अपेक्षा असल्याचं अकोला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शरदराव निंबाळकर म्हणाले.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.