AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदानी यांच्या पावलामुळे चीनची झोप उडणार, चीनवर वर्चस्व मिळवण्याची तयारी

गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी यांनी सांगितले की, विझिंजम बंदराचे काम 2045 पर्यंत पूर्ण करण्याचे होते. परंतु ते आता 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या क्षेत्रात चीनकडून होणारी प्रगती पाहिल्यानंतर हे काम लवकर करण्याकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे.

अदानी यांच्या पावलामुळे चीनची झोप उडणार, चीनवर वर्चस्व मिळवण्याची तयारी
gautam adani
| Updated on: Jul 16, 2024 | 8:53 AM
Share

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी उद्योगाचा विस्तार करत आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांच्या कंपन्याची चांगलीच भरभराट झाली. आता अदानी यांनी आपले लक्ष दक्षिण भारतातील महत्वाचे बंदर असलेल्या विझिंजमकडे केंद्रीत केले आहे. या ठिकाणावरील गुंतवणूक अदानी वाढवणार आहे. ही गुंतवणूक जवळपास 20 हजार कोटी रुपयांची करण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून विझिंजम बंदराचा विस्तार आणि विकास करण्याचा प्रयत्न आहे. जगातील मोठी जहाज या ठिकाणी येऊ शकतील, या पद्धतीने या बंदराचा विकास या बंदरचा अदानी ग्रुप करणार आहे.

बंदराची क्षमता पाच पट वाढणार

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेडचे एमडी करण अदानी यांनी सांगितले की, 2028 पर्यंत विझिंजम आंतरराष्ट्रीय ट्रांसशिपमेंट टर्मिनलमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा आहे. त्यामुळे या बंदराची क्षमताही पाच पट वाढणार आहे. या बंदराचे काम 2045 पर्यंत करण्याचे होते. परंतु आता हे काम 2028 पर्यंतच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे चीनमधील समुद्र व्यापार भारताकडे घेता येणार आहे.

गुंतवणूक रक्कम केली दुप्पट

दक्षिण भारतात असलेल्या विझिंजम बंदर हे आंतरराष्ट्रीय समुद्र मार्गांचा जवळ आहे. त्या ठिकाणी मोठे जहाज सहज येऊ शकतात, असे शिपिंग चॅनल आहेत. अदान ग्रुप या ठिकाणी दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. परंतु आता ही रक्कम दुप्पट करत वीस हजार कोटी करण्यात आली आहे. त्यात जहाज इंधन सुविधा, एक लक्झरी क्रूझ टर्मिनल आणि दोन मिलियन टन सिमेंट दळणारे युनिट आहे.

चीनला मिळणार मोठे आव्हान

गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी यांनी सांगितले की, विझिंजम बंदराचे काम 2045 पर्यंत पूर्ण करण्याचे होते. परंतु ते आता 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या क्षेत्रात चीनकडून होणारी प्रगती पाहिल्यानंतर हे काम लवकर करण्याकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर मोठे जहाज येऊ शकतील. त्यामुळे चीनच्या व्यापाऱ्यास आव्हान देता येणार आहे.

विझिंजम बंदराच्या कामाचे उद्धघाटन मागील वर्षी ऑक्टोंबर महिन्यात झाले होते. अदानी ग्रुपचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. सध्या मोठे जहाज भारतीय बंदरांमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे ते कोलंबो, दुंबई, सिंगापूर या शहरांची निवड करतात. परंतु विझिंजम बंदराचे काम पूर्ण झाल्यावर ही अडचण दूर होणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.