AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदानी यांच्या पावलामुळे चीनची झोप उडणार, चीनवर वर्चस्व मिळवण्याची तयारी

गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी यांनी सांगितले की, विझिंजम बंदराचे काम 2045 पर्यंत पूर्ण करण्याचे होते. परंतु ते आता 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या क्षेत्रात चीनकडून होणारी प्रगती पाहिल्यानंतर हे काम लवकर करण्याकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे.

अदानी यांच्या पावलामुळे चीनची झोप उडणार, चीनवर वर्चस्व मिळवण्याची तयारी
gautam adani
| Updated on: Jul 16, 2024 | 8:53 AM
Share

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी उद्योगाचा विस्तार करत आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांच्या कंपन्याची चांगलीच भरभराट झाली. आता अदानी यांनी आपले लक्ष दक्षिण भारतातील महत्वाचे बंदर असलेल्या विझिंजमकडे केंद्रीत केले आहे. या ठिकाणावरील गुंतवणूक अदानी वाढवणार आहे. ही गुंतवणूक जवळपास 20 हजार कोटी रुपयांची करण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून विझिंजम बंदराचा विस्तार आणि विकास करण्याचा प्रयत्न आहे. जगातील मोठी जहाज या ठिकाणी येऊ शकतील, या पद्धतीने या बंदराचा विकास या बंदरचा अदानी ग्रुप करणार आहे.

बंदराची क्षमता पाच पट वाढणार

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेडचे एमडी करण अदानी यांनी सांगितले की, 2028 पर्यंत विझिंजम आंतरराष्ट्रीय ट्रांसशिपमेंट टर्मिनलमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा आहे. त्यामुळे या बंदराची क्षमताही पाच पट वाढणार आहे. या बंदराचे काम 2045 पर्यंत करण्याचे होते. परंतु आता हे काम 2028 पर्यंतच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे चीनमधील समुद्र व्यापार भारताकडे घेता येणार आहे.

गुंतवणूक रक्कम केली दुप्पट

दक्षिण भारतात असलेल्या विझिंजम बंदर हे आंतरराष्ट्रीय समुद्र मार्गांचा जवळ आहे. त्या ठिकाणी मोठे जहाज सहज येऊ शकतात, असे शिपिंग चॅनल आहेत. अदान ग्रुप या ठिकाणी दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. परंतु आता ही रक्कम दुप्पट करत वीस हजार कोटी करण्यात आली आहे. त्यात जहाज इंधन सुविधा, एक लक्झरी क्रूझ टर्मिनल आणि दोन मिलियन टन सिमेंट दळणारे युनिट आहे.

चीनला मिळणार मोठे आव्हान

गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी यांनी सांगितले की, विझिंजम बंदराचे काम 2045 पर्यंत पूर्ण करण्याचे होते. परंतु ते आता 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या क्षेत्रात चीनकडून होणारी प्रगती पाहिल्यानंतर हे काम लवकर करण्याकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर मोठे जहाज येऊ शकतील. त्यामुळे चीनच्या व्यापाऱ्यास आव्हान देता येणार आहे.

विझिंजम बंदराच्या कामाचे उद्धघाटन मागील वर्षी ऑक्टोंबर महिन्यात झाले होते. अदानी ग्रुपचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. सध्या मोठे जहाज भारतीय बंदरांमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे ते कोलंबो, दुंबई, सिंगापूर या शहरांची निवड करतात. परंतु विझिंजम बंदराचे काम पूर्ण झाल्यावर ही अडचण दूर होणार आहे.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....