AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhim App : डिजिटल स्पर्धेत ‘भीम’ मागे, सरकार कमी पडले की वापरनं किचकट? जाणून घ्या…

ऑनलाईन व्यवहारात सध्या गुगल पे अ‍ॅपने 54 टक्के मार्केटवर ताबा मिळवला आहे. दुसऱ्या स्थानावर 11.9 टक्क्यांवर फोन पे आहे.

Bhim App : डिजिटल स्पर्धेत 'भीम' मागे, सरकार कमी पडले की वापरनं किचकट? जाणून घ्या...
डिजिटल स्पर्धेत 'भीम' मागेImage Credit source: social
| Edited By: | Updated on: Jun 07, 2022 | 10:31 AM
Share

मुंबई : आता कोणताही व्यवहार करायचं असेल तर कुणीही रोख रक्कम वापरत नाही. किंवा पगार झाला की तो बँकेतून (Bank) देखील काढला जात नाही. फोन-पे (PhonePay) आणि गुगल पे (Google Pay) सारख्या ऑनलाईन व्यवहाराच्या सुविधा अल्याने आजकाल व्यवहार देखील ऑनलाइन झाले आहेत. आपण अगदी कितीही रुपयांचा व्यवहार अगदी सहज या अ‍ॅपमधून करू शकतो. त्याला कोणताही अडथळा येत नाही. मात्र, या डिजिटल स्पर्धेत केंद्र सरकारने तयार केलेलं भीम अ‍ॅप (Bhim App) मागे पडलंय. लोकांची या अ‍ॅपला फारशी पसंती नसल्याचं दिसतंय. सरकार या अ‍ॅपला युजर फ्रेंडली देखील करू शकलेलं नाही. त्यामुळे लोकांना अडचण आली की ते लगेच सोप्या आणि साध्या अ‍ॅपचा उपयोग करू लागतात. त्यामुळे गुगल पे आणि फोन पे हे दोन्ही अ‍ॅप वापरनं लोक जास्त पसंत करतायेत. दरम्यान, या डिजिटल युगात भीम अ‍ॅपचा प्रभाव चांगलाच कमी झाल्याचं दिसतयं.

काय आहे कारण?

डिजिटल व्यवहार वाढावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीम अ‍ॅप सादर केलं होतं. विशेष म्हणजे हे अ‍ॅप इंटरनेटशिवाय देखील काम करतं. याला आधार कार्डची गरज असते. या अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांना पैसे देता किंवा घेता येतात. परंतु लोक याचा फारसा वापर करताना दिसत नाहीत. एकीकडे डिजिटल व्यवहारांना पसंती मिळत आहे. मात्र, दुसरीकडे भीम अ‍ॅपला लोक फार पसंत करत नसल्याचं दिसतंय. ऑनलाईन व्यवहारांमध्ये दिवसागणिक वाढत होत आहे. 2022 मध्ये ऑनलाईन व्यवहारांचा आकडा एक हजार बिलियन डॉलरपर्यंत पोहोचलाय. ऑनलाईन व्यवहारांचा सर्वाधिक वापर प्रवासादरम्यान करण्यात येत आहे. ऑनलाईन व्यवहारात सध्या गुगल पे अ‍ॅपने 54 टक्के मार्केटवर ताबा मिळवला आहे. दुसऱ्या स्थानावर 11.9 टक्क्यांवर फोन पे आहे. तिसऱ्या स्थानावर 9.7 टक्के पेटीएम आहे. त्यानंतर 8.5 टक्क्यांवर व्हॉट्सअ‍ॅप आणि पाचव्या स्थानी म्हणजे शेवटी भीम अ‍ॅप आहे.

भीम अ‍ॅपमध्ये काय सुधारणा व्हाव्यात?

  1. अ‍ॅप युजर फ्रेंडली असावं
  2. गेट वे मिळण्यात आडचणी आहेत, त्या दूर व्हाव्यात
  3. अ‍ॅप वापरताना कॅशबॅक सुविधा देखील द्याव्यात
  4. अ‍ॅपची अपेक्षित प्रसिद्धी गरजेची आहे
  5. तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे सुधारणा गरजेच्या
  6. सातत्याने युजरला येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात

कोणते अ‍ॅप कोणत्या स्थानी? किती वापर?

  1. पहिल्या स्थानी गुगल पे – 54 टक्के
  2. दुसऱ्या स्थानावर फोन पे –  11.9 टक्क्यांवर
  3. तिसऱ्या स्थानावर पेटीएम –  9.7 टक्के
  4. चौथ्या स्थानी – Bhim App : डिजिटल स्पर्धेत ‘भीम’ मागे, सरकार कमी पडले की वापरनं किचकट? जाणून घ्या…व्हॉट्सअ‍ॅप – 8.5 टक्के
  5. पाचव्या स्थानी – भीम अ‍ॅप
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.