AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मातीशिवाय घरीच पिकवा भाज्या, कमी जागेत लाखोंनी कमावाल!

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी जागेत जास्त पैसे कमवण्याचा हा एक उत्तम पर्याय झाला आहे.

आता मातीशिवाय घरीच पिकवा भाज्या, कमी जागेत लाखोंनी कमावाल!
| Edited By: | Updated on: Jan 14, 2021 | 10:53 PM
Share

मुंबई : सध्या लोकसंख्या वेगाने वाढत आहे तर शेती व्यवसाय कुठेतरी कमी होताना दिसत आहे. अशात भविष्यासाठी लोक आता नव्या पद्धतीने शेती करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी जागेत जास्त पैसे कमवण्याचा हा एक उत्तम पर्याय झाला आहे. सध्या अनेक जण मातीशिवाय शेती (Soilless farming) करण्यासाठी पुढे येत आहेत. आता तुम्ही म्हणाल मातीशिवाय शेती कशी होणार? पण हे खरं आहे. कृषी शास्त्रज्ञांनी असं करून दाखवलं आहे. (business idea you can do soilless farming a farming without soil know about vegetables indo israel)

इंडो-इस्त्राईल सेंटर फॉर एक्सलन्स (Indo-Israel Center for Excellence) यासंबंधी अनेक प्रयोग केले आहेत. काही शेतकर्‍यांनीही याची लागवड केली आहे. त्यातून हा शेतीचा आणि नफा मिळवण्याचा उत्तम पर्याय असल्याचं समोर आलं आहे. खरंतर, आपण शहरात राहून बाजारात मिळणाऱ्या अनेक केमिकल भाज्या खातो. पण अशात तुमच्या टेरेस आणि बालकनीमध्ये तुम्ही उत्तम शेती करू शकता. ज्यामध्ये जास्त खत किंवा कीटकनाशक नसतील.

जर तुम्ही खेड्यात राहुन शेती करत असाल तर तुमच्यासाठीही हा एक उत्तम पर्याय आहे. या पद्धतीने शेती करून तुम्ही कोट्यावधी रुपये कमवू शकता. यासाठी तुम्ही पॉली हाऊस बांधलं तर आणखीनच चांगली बाब आहे.

माती नसेल तर कशी होणार शेती?

मातीशिवाय शेती करण्यासाठी आयएआरआयमध्ये अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासंबंधी डॉ. नीलम पटेल यांनी टीव्ही -9 डिजिटलला सविस्तर माहिती दिली आहे. हे मॉडेल जरी इंडो इस्त्राईल सेंटर फॉर एक्सलन्समध्ये असलं तरी ही भारतीय पद्धत आहे.

– या शेतीसाठी मातीच्या जागी कोकोपीट (नारळ पावडर), गांडूळ आणि पेरलाइट वापरतात.

– मातीमुळे वनस्पतींना जे रोग येतात ते या पद्धतीमुळे येत नाहीत.

– या पद्धतीच्या शेतीसाठी फार कमी पाणी लागतं. यामध्ये दुसरं खत म्हणून सेंद्रिय किंवा इतर खत वापरलं जातं

– याला व्हरटिकल शेती (vertical farming) असंही म्हणतात. कारण, ही कमी जागेत केली जाते. आणि यातून जास्त नफा होतो.

कशी आहे या शेतीची रचना?

– या पद्धतीने शेती करण्यासाठी तुम्ही भांड्यात, पॉलिथीनमध्ये किंवा कोणत्याही कंटेनरमध्ये बियाणे ठेवू शकता. ते मोठे होतील

– यासाठी अनेक बनवलेली भांडी आणि कंटेनरही बाजारात मिळतात.

– कोकोपीट 19-20 रुपये किलोने मिळतं. तर गांडूळ आणि पेरलाइट एक किलो 80-90 रुपयांना उपलब्ध आहेत.

Soilless-farming

– तीन भाग कोकोपीट आणि दोन भाग गांडूळ आणि पेरलाइट असं मिश्रण करायचं. कोकोपीटच्या तीन बादल्यांवर व्हर्मीक्युलाइट आणि पेरलाइटच्या दोन बादल्या मिसळायच्या आणि नंतर धान्य पेरायचं. (business idea you can do soilless farming a farming without soil know about vegetables indo israel)

संबंधित बातम्या – 

बचत खात्यात महिन्याला जमा करा फक्त 1 रुपया, 2 लाखांचा होईल फायदा

क्रेडिट आणि डेबिट कार्डवर मोफत मिळतात ‘या’ सेवा, आताच जाणून घ्या

(business idea you can do soilless farming a farming without soil know about vegetables indo israel)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली