AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार?

रब्बी हंगामात येणारा कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी करुन साठवून ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. (Central Govt control on onion rates)

पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार?
Onion Rate cheaper
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Dec 16, 2020 | 4:54 PM
Share

नवी दिल्ली: कांद्याच्या दरामुळे कधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. कांद्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांना सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अधिक दरानं कांदा खरेदी करावा लागला होता. यामुळे केंद्र सरकारनं ग्राहकांना कमी दरात कांदा मिळावा म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याचा मोठ्या प्रमाणात साठा करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. ज्यावेळी बाजारात दर वाढतील त्यावेळी सरकार कांदा बाजारत आणेल. रब्बी हंगामात येणारा कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी करुन साठवून ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. (Central Govt make new plan to control price of onion in next year)

कांद्याचा साठा वाढवणार

ग्राहक मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने कांदा साठवण्याची मर्यादा एक लाख टनांवरुन वाढवून 1.5 लाख टन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी कांद्याचे दर वाढल्यामुळे सरकारला अफगाणिस्तानातून कांदा आयात करावा लागला होता. सरकारने दर स्थिरीकरण निधीअंतर्गत 99 हजार टन कांदा खरेदी केला आहे. आतापर्यंत 63 हजार110 टन कांदा राज्यांना पुरवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. (Central Govt make new plan to control price of onion in next year)

कांदा साठवणुकीवर मर्यादा

ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा घातली होती. केंद्रानं हा निर्णय 23 ऑक्टोबरला घेतला होता. सरकारनं किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांवर कांदा साठवणुकीवर मर्यादा घातली होती. किरकोळ व्यापारी 2 टन कांदा साठवू शकतात, तर ठोक व्यापारी 25 टनांपर्यंत कांदा साठवूण ठेऊ शकतात.

कांदा निर्यातीवर बंदी

केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्यानंतर कांदा निर्यातीबाबत मोठा निर्णय घेतला होता. कांद्याच्या निर्यातीवर केंद्रानं बंदी घातली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयावर शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी टीकास्त्र सोडले होते. (Central Govt make new plan to control price of onion in next year)

वातावरण बदलाचा कांदा उत्पादकांना अकराशे ते बाराशे कोटींचा फटका

कांदा म्हटला की वांदा हा शब्द येतोच, बदलत्या वातावरणाचा फटका बसल्याने कांदा उत्पादकांचे वांदे झाले आहे. दक्षिणेकडील अरबी समुद्रात तसेच हिंदी महासागरामध्ये सुरु असलेल्या चक्रीवादळाचा थेट परिणामामुळे पाऊस झाला. पावसाच्या हलक्या सरी ,ढगाळ वातावरण तसेच धुक्यामुळे कांदा पिकावर मावा आणि करप्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. यामुळे लागवडीवर परिणाम होत उत्पादन घटल्याने अंदाजे अकराशे ते बाराशे कोटी रुपयांचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या:

इजिप्त, इराण आणि इराकमधून कांद्याची आवक, लासलगाव बाजारात कांद्याचे दर गडगडले

तुर्कस्तानचा 100 टन आयात कांदा पिंपळगाव बसवंत इथं दाखल, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

(Central Govt make new plan to control price of onion in next year)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...