AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार?

रब्बी हंगामात येणारा कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी करुन साठवून ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. (Central Govt control on onion rates)

पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार?
Onion Rate cheaper
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Dec 16, 2020 | 4:54 PM
Share

नवी दिल्ली: कांद्याच्या दरामुळे कधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. कांद्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांना सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अधिक दरानं कांदा खरेदी करावा लागला होता. यामुळे केंद्र सरकारनं ग्राहकांना कमी दरात कांदा मिळावा म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याचा मोठ्या प्रमाणात साठा करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. ज्यावेळी बाजारात दर वाढतील त्यावेळी सरकार कांदा बाजारत आणेल. रब्बी हंगामात येणारा कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी करुन साठवून ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. (Central Govt make new plan to control price of onion in next year)

कांद्याचा साठा वाढवणार

ग्राहक मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने कांदा साठवण्याची मर्यादा एक लाख टनांवरुन वाढवून 1.5 लाख टन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी कांद्याचे दर वाढल्यामुळे सरकारला अफगाणिस्तानातून कांदा आयात करावा लागला होता. सरकारने दर स्थिरीकरण निधीअंतर्गत 99 हजार टन कांदा खरेदी केला आहे. आतापर्यंत 63 हजार110 टन कांदा राज्यांना पुरवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. (Central Govt make new plan to control price of onion in next year)

कांदा साठवणुकीवर मर्यादा

ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा घातली होती. केंद्रानं हा निर्णय 23 ऑक्टोबरला घेतला होता. सरकारनं किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांवर कांदा साठवणुकीवर मर्यादा घातली होती. किरकोळ व्यापारी 2 टन कांदा साठवू शकतात, तर ठोक व्यापारी 25 टनांपर्यंत कांदा साठवूण ठेऊ शकतात.

कांदा निर्यातीवर बंदी

केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्यानंतर कांदा निर्यातीबाबत मोठा निर्णय घेतला होता. कांद्याच्या निर्यातीवर केंद्रानं बंदी घातली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयावर शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी टीकास्त्र सोडले होते. (Central Govt make new plan to control price of onion in next year)

वातावरण बदलाचा कांदा उत्पादकांना अकराशे ते बाराशे कोटींचा फटका

कांदा म्हटला की वांदा हा शब्द येतोच, बदलत्या वातावरणाचा फटका बसल्याने कांदा उत्पादकांचे वांदे झाले आहे. दक्षिणेकडील अरबी समुद्रात तसेच हिंदी महासागरामध्ये सुरु असलेल्या चक्रीवादळाचा थेट परिणामामुळे पाऊस झाला. पावसाच्या हलक्या सरी ,ढगाळ वातावरण तसेच धुक्यामुळे कांदा पिकावर मावा आणि करप्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. यामुळे लागवडीवर परिणाम होत उत्पादन घटल्याने अंदाजे अकराशे ते बाराशे कोटी रुपयांचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या:

इजिप्त, इराण आणि इराकमधून कांद्याची आवक, लासलगाव बाजारात कांद्याचे दर गडगडले

तुर्कस्तानचा 100 टन आयात कांदा पिंपळगाव बसवंत इथं दाखल, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

(Central Govt make new plan to control price of onion in next year)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?