मोठ्या पगाराचे दिवस देशात परतणार; वेतनवाढ पूर्वीपेक्षा जास्त होणार, कंपन्यांमध्ये बंपर भरती

अहवालात म्हटले आहे की, भारताला पुढील वर्षी आशिया-पॅसिफिकमध्ये सर्वाधिक वेतनवाढ दिसेल. या दरम्यान येथील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 9.3 टक्के वाढ अपेक्षित आहे. यासह अहवालात असे म्हटले आहे की, पुढील 12 महिन्यांत व्यवसाय दृष्टिकोनात सुधारणा पाहणे सोपे आहे. हे अर्धवार्षिक सर्वेक्षण मे आणि जून 2021 दरम्यान आशिया-पॅसिफिकच्या विविध उद्योग क्षेत्रातील 1,405 कंपन्यांमध्ये करण्यात आले, यापैकी 435 कंपन्या भारतातील आहेत.

मोठ्या पगाराचे दिवस देशात परतणार; वेतनवाढ पूर्वीपेक्षा जास्त होणार, कंपन्यांमध्ये बंपर भरती
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 7:17 PM

मुंबई : कोरोनाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीतून सावरल्यानंतर भारतात मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांचे दिवस परत येतील. पुढील वर्षापासून लोकांना जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळू लागतील, अशी अपेक्षा आहे. एका अहवालात असे म्हटले आहे की, 2021 च्या दरम्यान भारतातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 8 टक्के वाढ होईल. कर्मचाऱ्यांना आकर्षित करणे आणि त्यांना कायम ठेवणे हे कंपन्यांसमोरचे आव्हान आहे, असे जागतिक सल्लागार, ब्रोकिंग आणि सोल्युशन्स कंपनी विलिस टॉवर्स वॉटसनच्या ‘सॅलरी बजेट प्लॅनिंग रिपोर्ट’ मध्ये म्हटले. अशा स्थितीत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पगारवाढ देतील.

पगार किती वाढू शकतो?

अहवालात म्हटले आहे की, भारताला पुढील वर्षी आशिया-पॅसिफिकमध्ये सर्वाधिक वेतनवाढ दिसेल. या दरम्यान येथील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 9.3 टक्के वाढ अपेक्षित आहे. यासह अहवालात असे म्हटले आहे की, पुढील 12 महिन्यांत व्यवसाय दृष्टिकोनात सुधारणा पाहणे सोपे आहे. हे अर्धवार्षिक सर्वेक्षण मे आणि जून 2021 दरम्यान आशिया-पॅसिफिकच्या विविध उद्योग क्षेत्रातील 1,405 कंपन्यांमध्ये करण्यात आले, यापैकी 435 कंपन्या भारतातील आहेत.

तीन वेळा कंपन्या नेमणुका करतील

वेतन बजेट योजनेच्या अहवालानुसार, 52 टक्के भारतीय कंपन्यांचा असा विश्वास आहे की, पुढील 12 महिन्यांत त्यांचा महसूल दृष्टिकोन सकारात्मक असेल. वर्ष 2020 च्या चौथ्या तिमाहीत असे मानणाऱ्या कंपन्यांची संख्या 37 टक्के होती. व्यवसायाच्या स्थितीत सुधारणा झाल्यामुळे नोकऱ्यांची परिस्थितीही सुधारेल. अहवालात असे म्हटले आहे की, 30 टक्के कंपन्या पुढील एका वर्षात नवीन नियुक्त्यांच्या तयारीत आहेत. 2020 च्या तुलनेत हे जवळपास तिप्पट आहे.

तुम्हाला कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या मिळतील?

अभियांत्रिकी क्षेत्र 57.5 टक्के, माहिती तंत्रज्ञान 53.3 टक्के, तांत्रिक कौशल्य 34.2 टक्के, विक्री क्षेत्र 37 टक्के आणि वित्त क्षेत्र 11.6 टक्के कंपन्यांना जास्तीत जास्त नवीन भरती दिसेल. या सर्व क्षेत्रात कंपन्या नवीन कर्मचाऱ्यांना जास्त पगार देतील. त्याचबरोबर जुन्या कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीपेक्षा जास्त वाढेल. अहवालात असे सांगण्यात आले आहे की, भारतात नोकरी कमी होण्याचे प्रमाण आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील उर्वरित देशांच्या तुलनेत कमी आहे. संबंधित बातम्या

देशातील सरकारी आणि खासगी रिफायनरी कंपन्यांचा समूह सरकार तयार करणार, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार

Stock Market Closing : सेन्सेक्स 456 अंकांनी तुटला, निफ्टी 18,266 च्या वर बंद, दूरसंचार क्षेत्राचे समभाग वाढले

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.