AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhirubhai Ambani यांनी संघर्षातून उभं केलं रिलायन्सचं साम्राज्य, मुलांसाठी मागे सोडून गेले इतकी संपत्ती

Dhirubhai Ambani Birthday | गुजरातमधील एका सर्वसामान्य कुटुंबात धीरुभाई अंबानी यांचा जन्म झाला. रिलायन्स समूहाचा आजचा डोलारा पाहिला तर कोणाला ही विश्वास बसणार नाही की शून्यातून ही सुरुवात झाली होती म्हणून. मोठा संघर्ष आणि कुटुंबात पैशांची तंगी असतानाही त्यांनी रिलायन्सचे रोपटे लावले.

Dhirubhai Ambani यांनी संघर्षातून उभं केलं रिलायन्सचं साम्राज्य, मुलांसाठी मागे सोडून गेले इतकी संपत्ती
| Updated on: Dec 28, 2023 | 2:58 PM
Share

नवी दिल्ली | 28 डिसेंबर 2023 : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचा आज 28 डिसेंबर रोजी जन्मदिन. जर ते हयात असते तर आज 91 वर्षांचे असते. गुजरातमधील एका सर्वसाधारण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांची व्यावसायिक जगतातील सुरुवात एकदम कठिण होती. त्यांना हे साम्राज्य उभं करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. कुटुंबाकडे पैशांची चणचण होती. त्यामुळे त्यांना इयत्ता दहावीनंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांना नोकरीसाठी कमी वयातच यमनला जावे लागले. त्यांनी पेट्रोल पंपावर नोकरी केली. त्यांची व्यवसायाची बाराखडी पक्की होती. तावून सलाखून धीरजलाल हिराचंद नंतर धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) झाले.

500 रुपयांत कंपनीची स्थापना

खिशात 500 रुपये घेऊन धीरुभाई मुंबईत दाखल झाले. चंपकलाल दिमानी यांच्यासोबत त्यांनी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून पश्चिमी देशात अद्रक, हळद आणि इतर मसाले पाठविण्याचे काम सुरु केले. भविष्यात काळात पॉलिस्टर कपड्यांची मागणी वाढणार हे हेरुन त्यांनी यामध्ये नशीब आजमावण्याचा विचार केला. त्यातूनच पुढे पेट्रोकेमिकल, रिफायनिंग, टेलिकॉम आणि इतर क्षेत्रात त्यांचा व्यवसाय वाढला.

आयुष्याचा सारीपाट

  1. धीरुभाई अंबानी यांचा जन्म 28 डिसेंबर 1933 रोजी गुजरातमधील एका गावात झाला.
  2. त्यांचे वडील शिक्षक तर आई गृहिणी होती. पाच भाऊ आणि बहिण असे त्यांचे कुटुंब होते.
  3. गिरनार पर्वतावर ते खाद्यपदार्थाची विक्री करत होते. आलेला पैसा ते आई-वडिलांना द्यायचे.
  4. दहावी परीक्षा पास झाल्यावर 1949 मध्ये ते भाऊ रमणीकलाल यांच्याकडे यमन देशात गेले.
  5. त्यांनी एका पेट्रोल पंपावर नोकरी केली. 300 रुपये महिना पगार होता.
  6. त्यांनी पॉलिस्टर कपड्यांचे उत्पादन आणि विक्री सुरु केली. त्यांनी पहिला ब्रँड Vimal सुरु केला.
  7. रिलायन्स कॉमर्स कॉर्पोरेशनसाठी मुंबईत 350 वर्ग फुटाचे कार्यालय भाडेतत्वावर घेतले.
  8. या कार्यालयात एक टेबल, तीन खुर्च्या, रायटिंग पॅड एवढ्याच वस्तू होत्या.
  9. 1966 मध्ये त्यांनी गुजरात राज्यात अहमदाबाद येथे एक कापड मिल सुरु केली.
  10. या मिलचे नाव त्यांनी रिलायन्स टेक्सटाईल्स असे ठेवले.
  11. 1977 मध्ये त्यांची कंपनी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाली.

किती संपत्तीचे होते मालक

धीरुभाई अंबानी हे त्यांच्या काळात भारतातील सर्वात मोठे श्रीमंत होते. 2002 मध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला तेव्हा ते जगातील 138 वे श्रीमंत होते. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, तेव्हा त्यांची एकूण संपत्ती 2.9 अब्ज डॉलर इतकी होती. आताच्या डॉलर-रुपयात त्याचे मूल्य 24 हजार कोटी रुपये होते. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारातील भांडवल 17.50 लाख कोटी रुपये पोहचले आहे. तर त्यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्य 60 हजार कोटी रुपेय होते.

Follow Us
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका