महागाईचा भडका, इंधनदरवाढीपाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती गगनाला, दर काय?

दुसरीकडे जीवनावश्यक खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. (Edible Cooking Oil Price)

महागाईचा भडका, इंधनदरवाढीपाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती गगनाला, दर काय?
खाद्यतेल दर
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 7:36 AM

मुंबई : देशभरात इंधन दरवाढीमुळे सर्वसामन्य हैराण झाले आहे. तर दुसरीकडे जीवनावश्यक खाद्यतेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. काही महिन्यापूर्वी 500 ते 600 रुपये दराने मिळणारा पाच लिटर तेलाचा डबा हा आता हजार रुपये किंमतीने विकला जात आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. (Edible Cooking Oil Price Today)

घराघरात दैनंदिन वापरातला अविभाज्य घटक म्हणून तेल आणि तूप याकडे पाहिलं जातं. देवासमोरची दिवाबत्ती करण्यापासून ते दररोजचा स्वयंपाक करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी तेलाची गरज भासते. पण कोरोना काळात घरगुती वापरातील तेलाचा अक्षरक्षः भडका उडाला आहे. शेंगदाणा तेल, राईचे तेल, वनस्पती, सोयाबीन, सूर्यफुलाचे तेल आणि पामतेल या तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे. गेल्या मे महिन्यात या सहा प्रकारच्या तेलाची रिटेल किंमत 11 वर्षांत प्रथमच सर्वाधिक आहे. एकीकडे कोरोनामुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. तर दुसरीकडे जीवनावश्यक खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

खाद्यतेलाच्या किंमतीत अचानक वाढ का?

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उत्पादक देशांमधून खाद्यतेलाच्या पुरवठय़ावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना प्रादुर्भावातही खाद्यतेलाची मागणी कमी झालेली नाही. मागणी आणि पुरवठा यातील फरक वाढल्या या किमतीत वाढ होत आहे. अमेरिका आणि ब्राझीलसह काही देश खाद्यतेलाचा वापर बायोफ्युअल करण्यासाठी करीत आहेत. त्यामुळे तेलाचा तुटवडा जाणवत आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

देशात होणारे खाद्यतेलाचे उत्पादन पुरेसे नाही. भारतात एकूण गरजेच्या केवळ 40 टक्के खाद्यतेलाचे उत्पादन होते. मागणी आणि पुरवठय़ातील दरी भरून काढण्यासाठी जवळपास 60 टक्के खाद्यतेल बाहेरील देशांतून आयात करावे लागते. तसेच दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढत आहेत. त्यामुळे देशातील तेलाच्या दरात वाढ झाली आहे.

वर्षभरात तेलाच्या दर किती वाढला?

देशातील विविध राज्यांत जेवणात वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरले जाते. त्यानुसार, कन्झ्युमर अफेयर्स विभाग सहा प्रकारच्या तेलाचे दर निश्चित करतात. यात शेंगदाणा तेल, राईचे तेल, वनस्पती, सोयाबीन, सूर्यफुलाचे तेल आणि पामतेलाचा समावेश आहे. गेल्या एका वर्षात या सर्व प्रकारच्या तेलाच्या दरात 20 ते 60 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सद्यस्थितीत तेलाचे दर काय? 

तेलाचे प्रकार – किंमत (5 लीटरप्रमाणे)

सोयाबीन तेल – 980 सूर्यफूल तेल – 1000 शेंगदाणा तेल – 959 राईचे तेल  – 980 पामतेल – 160 (एक लीटर)

(Edible Cooking Oil Price Today)

संबंधित बातम्या : 

लाखभर पगार असूनही बचत शून्य, जाणून घ्या गुंतवणूकीच्या सोप्या टिप्स

मॅनेजमेंट बदलताच ‘या’ कंपनीचे शेअर होल्डर्स मालामाल, एका शेअरची किंमत 100 रुपयांहून कमी

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.