Share : Nykaa आणि Paytm ची पडझड रोखण्यासाठी धडपड! गुंतवणूकदारांवर पाडला सवलतींचा पाऊस

| Updated on: Dec 18, 2022 | 6:03 PM

Share : Nykaa आणि Paytm ची बाजारात टिकून राहण्यासाठी निकराची लढाई सुरु झाली आहे..

Share : Nykaa आणि Paytm ची पडझड रोखण्यासाठी धडपड! गुंतवणूकदारांवर पाडला सवलतींचा पाऊस
घसरगुंडी थांबविण्यासाठी प्रयत्न
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : गेल्यावर्षी दिग्गज सौंदर्यप्रसाधने आणि फॅशन जगातील ई-रिटेलर ब्रँड Nykaa ने बाजारात दमदार पदार्पण केले होते. त्याबरोबरच Paytm ही ढोल-ताशांच्या गजरात बाजारात दाखल झाले होते. या दोघांचा IPO बाजारात दाखल झाला होता. त्यावर गुंतवणूकदारांच्या डोळे झाकून उड्या पडल्या होत्या. शेअर बाजारात (Share Market) सूचीबद्ध झाल्यानंतर या शेअरमध्ये सातत्याने घसरण (Share Down) सुरु आहे. त्यामुळे गुंतवणूकदारच नाही तर कंपनीचाही जीव टांगणीला लागला आहे. ही घसरण रोखण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी कंबर कसली आहे.

ही घसरण रोखण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना विविध सवलती घोषीत केल्या आहेत. एवढेच नाही तर गुंतवणूकदारांसाठी बायबॅक आणि बोनस शेअरचाही भडीमार सुरु केला आहे. त्यामुळे या घसरणीला आणि विक्रीला आळा बसवण्याची कंपनीची योजना आहे.

Nykaa ने 11 नोव्हेंबर रोजी बोनस इश्यू करण्याची घोषणा केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार पुन्हा कंपनीकडे ओढून आणण्यासाठी कंपनीने हे रणनीती आखली आहे. बोनस इश्यू हे गुंतवणूकदारांना दिलेले मोफत अतिरिक्त शेअर आहे. सूचीबद्ध कंपन्या त्यांच्या शेअरधारकांसाठी ही ऑफर आणतात.

हे सुद्धा वाचा

Nykaa ने सध्या 5:1 या प्रमाणात गुंतवणूकदारांना बोनस इश्यू करणार आहे. याचा अर्थ जर शेअरधारकाकडे 1 शेअर असेल तर त्याला त्या बदल्यात 5 शेअर देण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीओ दरम्यान गुंतवणूकदारांनी जी रक्कम गुंतवली आणि घसरणीनंतर त्याचा जो भ्रमनिरास झाला, त्याची भरपाई करता येईल.

Paytm ची मूळ कंपनी One97 Communications च्या संचालक मंडळाने शेअर बायबँकला मंजूरी दिली आहे. यामुळे कंपनी खूल्या बाजारातून 850 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी करणार आहे. कमीत कमी बायबॅक साईज आणि जास्तीत जास्त बायबॅक प्राईस या धोरणाचा कंपनी अवलंब करणार आहे.

Paytm ने कमीत कमी 5,246,913 इक्विटी शेअर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बायबॅक धोरणानुसार कंपनी 810 रुपयांवर प्रत्येक शेअरची खरेदी करणार आहे. पण एवढे करुनही नाराज गुंतवणूकदार पुन्हा कंपनीकडे परत फिरणार का हा मुद्दा आहे.